शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘जय’ च्या ‘रेडिओ कॉलर’ चे गूढ वाढले!

By admin | Updated: September 10, 2016 02:11 IST

मागील चार महिन्यापूर्वी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून अचानक गायब झालेल्या ‘जय’ चा अद्याप सुगावा लागला नसला,

चार महिने उलटले : शोधमोहिम थंडावली नागपूर : मागील चार महिन्यापूर्वी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून अचानक गायब झालेल्या ‘जय’ चा अद्याप सुगावा लागला नसला, तरी त्याच्या गळ्यातील बंद पडलेल्या ‘रेडिओ कॉलर’ चे गूढ मात्र निश्चितच वाढले आहे. त्याचवेळी ‘जय’ च्या प्रकरणाची सीआयडी व सीबीआयच्या माध्यमातून चौकशी सुरू होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र यासंबंधी वन मुख्यालयाला अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे. ‘जय’ च्या गळ्यातील ‘रेडिओ कॉलर’ ने गत १९ एप्रिलपासून सिग्नल देणे बंद केले असल्याचे स्वत: वन विभागाने मान्य केले आहे. मात्र त्याचवेळी ‘जय’ हा ब्रह्मपुरी आणि नागभीडच्याही पुढे सुमारे ५८० चौ. किलो मीटरच्या परिसरात भटकंती करीत होता, असाही वन विभागाने दावा केला आहे. यातच १९ एप्रिल रोजी ‘जय’ ची रेडिओ कॉलर बंद पडली आणि त्याचा वन विभागाशी संपर्क तुटला. अधिकाऱ्यांन्ांी केले दुर्लक्षनागपूर : मात्र असे असताना पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने तब्बल अडीच महिन्यांपर्यंत ती माहिती दडपून ठेवली. वास्तविक ‘जय’ ची रेडिओ कॉलर बंद पडली, त्याच दिवसापासून तो गायब झाला आहे. याची पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाणीव असताना त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर जुलै महिन्यात संपूर्ण प्रकरणाचा भंडाफोड झाला आणि वन विभागाची झोप उडाली. वर्तमानपत्रात बातम्या झळकताच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) आणि राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालायने पेेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयास ताबडतोब ‘जय’ चा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने पाच शोध पथके तयार करून वेगवेगळ्या दिशेने रवाना केले. या सर्व पथकांनी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या सभोवताल असलेल्या भंडारा, ब्रह्मपुरी, नागभीड व वडसा परिसरातील जंगल पिंजून काढले. मात्र तरी ‘जय’ चा कुठेही शोध लागला नाही. यामुळे वन विभागाने गडचिरोलीपर्यंत धाव घेऊन शोधाशोध केली, परंतु तरी ‘जय’ सापडला नाही. त्यामुळे वन विभागाची शोधमोहिम ही केवळ औपचारिकता सुरू असल्याचा वन्यजीव क्षेत्रातून सूर व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, सध्या व्याघ्र राजधानीचा सर्वत्र गवगवा होत आहे. अशा स्थितीत राज्याचा वन विभाग एका वाघाचा शोध घेण्यात अपयशी ठरत आहे. मात्र असे असताना वन मंत्रालय गप्प का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)