शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्राने वार करून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क बडेगाव : जंगल परिसरात धारदार शस्त्राने वार करीत खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह खापा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

बडेगाव : जंगल परिसरात धारदार शस्त्राने वार करीत खून करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगाव-खेकरानाला मार्गावरील महारकुंड शिवारातील पुलाच्या पायलीत फेकण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २१) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आला. हा खून चार ते पाच दिवसांपूर्वी बाहेर करण्यात आला असावा, अशी शक्यता ठाणेदार अजय मानकर यांनी व्यक्त केली.

प्रदीप जनार्दन बागडे (४७, रा. अजनी, नागपूर) असे मृताचे नाव आहे. खेकरानाल्यामुळे या भागात पर्यटकांचा वावर वाढल्याने खापा-बडेगाव-खेकरानाला या मार्गावर सतत वर्दळ असते. दरम्यान, मंगळवारी सकाळी याच मार्गावरील महारकुंड शिवारातील पुलाखाली मृतदेह आढळून आल्याने नागरिकांनी लगेच पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खापा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात पाठविला.

खिशातील ओळखपत्रावरून मृताची लगेच ओळख पटली. हा मृतदेह पुलाच्या सिमेंटच्या पायलीत ठेवला हाेता. मात्र, या भागात वन्यप्राण्यांचा वावर करण्याने प्राण्यांनी ताे ओढत बाहेर आणला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात वृत्त लिहिस्ताे कुणालाही चाैकशीसाठी ताब्यात घेण्यात आले नव्हते किंवा अटक करण्यात आली नव्हती. याप्रकरणी खापा पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद बन्सोड प पाेलीस शिपाई अंकुश चरपे करीत आहेत.

...

अवैध धंद्यात वाढ

हा परिसर मध्य प्रदेशच्या सीमालगत आहे. पर्यटकांची वर्दळ वाढल्याने या भागात धाब्यांची संख्याही बरीच आहे. संपूर्ण परिसरत जंगली असल्याने येथे जुगार खेळणे, दारू पार्टी करणे, अवैध दारूविक्री करणे यासह अन्य प्रकार वाढले आहे. याच भागातून दारूची अवैध वाहतूकही माेठ्या प्रमाणात केली जात असून, यात नागपूर शहरातील काही मंडळी गुंतली आहे. प्रदीप बागडे याचा खूनही याच अवैध धंद्यातून झाला असावा, अशी शक्यता ठाणेदार अजय मानकर यांनी व्यक्त केली आहे.

...

छातीवर वार

प्रदीपच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खाेल जखमा आढळून आल्या आहेत. आराेपींनी त्याचा खून इतरत्र केला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह या भागात फेकला. या परिसरात वाहनांची २४ तास वर्दळ सुरू असते. त्यामुळे खापा पाेलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी चेकपाेस्ट तयार करून वाहनांची नियमित तपासणी करावी, अशी मागणी टेंभूरडाेह-महारकुंडचे सरपंच दीपक सहारे यांनी केली आहे.