शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. नंतर त्याचा स्वाभाविक मृत्यू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. नंतर त्याचा स्वाभाविक मृत्यू झाल्याचा कांगावा केला. मात्र, वैद्यकीय अहवालानंतर पत्नीचे बिंग फुटले अन् तिला तसेच तिच्या प्रियकराला पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे.

शेखर बब्बू कनोजिया (वय ४७) शारदानगर, एमआयडीसी येथे राहत होता. तो आणि त्याची पत्नी सरिता (वय ३८) प्रेस (लॉन्ड्री) करून उदरनिर्वाह करीत होते. व्यवसाय चांगला चालत असल्याने लोकांचे कपडे आणून नेऊन देण्यासाठी त्यांनी गेल्या वर्षी आरोपी पंकज चंद्रकांत कडू (वय २५, रा. सोनेगाव जुनी वस्ती) याला ठेवून घेतले. वयाने १३ वर्षे लहान असलेल्या पंकजसोबत सरिताचे पाच महिन्यांपूर्वी अनैतिक संबंध जुळले. त्यामुळे शेखरवर वेगवेगळे आरोप लावून सरिता त्याच्याशी वाद घालू लागली. पत्नीची कटकट वाढल्याने आणि तिने भंडावून सोडल्याने शेखर त्याच्या भावाकडे खामला-देवनगरजवळच्या दंतेश्वरीनगरात राहायला गेला. पाच महिन्यांपासून तो तेथेच राहात होता. त्यामुळे सरिता-पंकजला रान मोकळे झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेखर परत आपल्या घरी अधूनमधून येऊ-जाऊ लागला. त्यामुळे सरिता आणि पंकजच्या अनैतिक संबंधात अडसर निर्माण झाला. त्यामुळे हे दोघे अस्वस्थ झाले. त्यांनी शेखरचा काटा काढण्याचा कट रचला. ठरल्याप्रमाणे ७ फेब्रुवारीच्या रात्री शेखर घरी येताच सरिता आणि पंकजने त्याला गोडीगुलाबीने भरपूर दारू पाजली. नंतर त्याला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो मृत झाल्याचा कांगावा केला. शेखरचा भाऊ सुनील याने पोलिसांना शेखरच्या मृत्यूची सूचना दिली. त्यानंतर वैद्यकीय अहवालात शेखरचा मृत्यू डोक्यावर जबर वार केल्याने झाल्याचे डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालात नमूद केले. त्यामुळे एमआयडीसीचे ठाणेदार युवराज हांडे, पीएसआय विकास जाधव यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सरिता तसेच पंकजच्या हालचालीवर लक्ष केंद्रित केले. संशय पक्का होताच त्यांना शुक्रवारी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यांनी शेखरच्या हत्येची कबुली दिल्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा पीसीआर मागितला जाणार आहे.

---

आप्त स्वकीयांनाही जबर धक्का

अनैतिक संबंधात गुरफटलेल्या सरिताला दोन मुली होत्या. त्यातील एकीचा अपघाती मृत्यू झाला तर दुसरीने प्रेमविवाह करून संसार थाटला आहे. सरिताच्या या कृत्यामुळे तिच्या, शेखरच्या कुटुंबीयांना आणि आप्त स्वकीयांनाही जबर धक्का बसला आहे.

---