शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

तीन वर्षानंतरही दुकाने खाली करण्यास मनपा अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जयस्तंभ चौक ते मानस चौकदरम्यान राष्ट्रीय रस्ते निधी(सीआरएफ)मधून सहा पदरी रस्ता बनविण्याची योजना तीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जयस्तंभ चौक ते मानस चौकदरम्यान राष्ट्रीय रस्ते निधी(सीआरएफ)मधून सहा पदरी रस्ता बनविण्याची योजना तीन वर्षांपूर्वी मंजूर झाली. परंतु आतापर्यंत गणेश टेकडी उड्डाणपुलाखालील दुकाने मनपा खाली करू शकलेली नाही. रेल्वेस्टेशनजवळ बनविण्यात येत असलेल्या प्लाझामध्ये २०० दुकाने प्रस्तावित आहेत. परंतु तिथे जाण्यासही दुकानदार तयार नाहीत. सुनावणी पूर्ण झाल्यानंतरही सहमती होऊ शकली नाही. त्यामुळे मनपाने नुकसान भरपाई देण्याचा नवीन फाॅर्म्युला तयार केला आहे. या फाॅर्म्युल्याला येणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

मनपाने २००८ मध्ये मानस चौक ते जयस्तंभ चौकदरम्यान ८१२ मीटर लांब आणि १०.५ मीटर रुंद उड्डाणपूल तयार केला होता. उड्डाणपुलाखाली १७५ दुकाने व शौचालय बनविण्यात आले होते. या उड्डाणपुलावर १६.२३ कोटी रुपये खर्च आला होता. १७५ पैकी १६० दुकानदारांनीच ताबा घेतला होता. दरम्यान, भविष्यातील वाहतूक व्यवस्था लक्षात घेऊन उड्डाणपूल पाडून सहा पदरी रस्ता बनविण्याच्या योजनेला २०१८ मध्ये मंजुरी देण्यात आली. यासोबतच या मार्गाला जोडून जयस्तंभ चौक ते श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स वाय शेपमध्ये जोडमार्ग व उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. संबंधित उड्डाणपुलाचे कााम सुरू झाले आहे. तर सहा पदरी रस्त्याचे काम दुकानदारांनी दुकाने खाली न केल्यामुळे अडकून पडले आहे. सीआरएफअंतर्गत १९ जुलै २०१८ रोजी २३४.२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महामेट्रोला कामाची जबाबदारी देण्यात आली आहे.

-बॉक्स

-दुकानदारांची सुनावणी पूर्ण झाली

- मनपातर्फे १६० दुकानदारांपैकी १२९ दुकानदारांना नोटीस देण्यात आली. सुनावणीत सर्व दुकानदार उपस्थित होते. ४७ दुकानदारांनी चक्रवाढ व्याजदर किंवा आजच्या बाजारभावानुसार भरपाई देण्याची मागणी केली.

- ३० दुकानदारांनी पर्यायी जागा घेण्याची इच्छा व्यक्त केेली. परंतु महामेट्रोने तयार करून दिलेल्या ७० तात्पुरत्या दुकानांची स्थिती पाहता, त्यांनी दुकान घेण्यास नकार दिला.

- एकूणच दुकानदारांना दुसऱ्या ठिकाणची दुकाने पसंत आलेली नाहीत. काही जण न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मनपा दुकानदारांनी जमा केलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम व्याजासह परत करण्याच्या तयारीत आहे. मनपा सभागृहात याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला जाईल.

बॉक्स

- मनपाचा फाॅर्म्युला

गणेश टेकडी उड्डाणपुलाखाली १६० दुकानदारांनी मनपाच्या तिजोरीत ११.९६ कोटी रुपये जमा केले. दुकानासह उड्डाणपूल बनविण्यावर १६.२३ कोटी रुपये खर्च झाले. दुकानदारांनी दुकानांचा १२ वर्षे वापर केला. या वापराची रक्कम सोडून जर ८.५० टक्के व्याजासह दुकानदारांना रक्कम परत केली गेली तर एकूण १९.८४ कोटी रुपये परत करावे लागतील. वर्ष २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात या रकमेचे विनियोजन करावे लागेल.