शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

तीन वर्षानंतरही दुकाने खाली करण्यास मनपा अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जयस्तंभ चौक ते मानस चौकदरम्यान राष्ट्रीय रस्ते निधी(सीआरएफ)मधून सहा पदरी रस्ता बनविण्याची योजना तीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जयस्तंभ चौक ते मानस चौकदरम्यान राष्ट्रीय रस्ते निधी(सीआरएफ)मधून सहा पदरी रस्ता बनविण्याची योजना तीन वर्षांपूर्वी मंजूर झाली. परंतु आतापर्यंत गणेश टेकडी उड्डाणपुलाखालील दुकाने मनपा खाली करू शकलेली नाही. रेल्वेस्टेशनजवळ बनविण्यात येत असलेल्या प्लाझामध्ये २०० दुकाने प्रस्तावित आहेत. परंतु तिथे जाण्यासही दुकानदार तयार नाहीत. सुनावणी पूर्ण झाल्यानंतरही सहमती होऊ शकली नाही. त्यामुळे मनपाने नुकसान भरपाई देण्याचा नवीन फाॅर्म्युला तयार केला आहे. या फाॅर्म्युल्याला येणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

मनपाने २००८ मध्ये मानस चौक ते जयस्तंभ चौकदरम्यान ८१२ मीटर लांब आणि १०.५ मीटर रुंद उड्डाणपूल तयार केला होता. उड्डाणपुलाखाली १७५ दुकाने व शौचालय बनविण्यात आले होते. या उड्डाणपुलावर १६.२३ कोटी रुपये खर्च आला होता. १७५ पैकी १६० दुकानदारांनीच ताबा घेतला होता. दरम्यान, भविष्यातील वाहतूक व्यवस्था लक्षात घेऊन उड्डाणपूल पाडून सहा पदरी रस्ता बनविण्याच्या योजनेला २०१८ मध्ये मंजुरी देण्यात आली. यासोबतच या मार्गाला जोडून जयस्तंभ चौक ते श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स वाय शेपमध्ये जोडमार्ग व उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. संबंधित उड्डाणपुलाचे कााम सुरू झाले आहे. तर सहा पदरी रस्त्याचे काम दुकानदारांनी दुकाने खाली न केल्यामुळे अडकून पडले आहे. सीआरएफअंतर्गत १९ जुलै २०१८ रोजी २३४.२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महामेट्रोला कामाची जबाबदारी देण्यात आली आहे.

-बॉक्स

-दुकानदारांची सुनावणी पूर्ण झाली

- मनपातर्फे १६० दुकानदारांपैकी १२९ दुकानदारांना नोटीस देण्यात आली. सुनावणीत सर्व दुकानदार उपस्थित होते. ४७ दुकानदारांनी चक्रवाढ व्याजदर किंवा आजच्या बाजारभावानुसार भरपाई देण्याची मागणी केली.

- ३० दुकानदारांनी पर्यायी जागा घेण्याची इच्छा व्यक्त केेली. परंतु महामेट्रोने तयार करून दिलेल्या ७० तात्पुरत्या दुकानांची स्थिती पाहता, त्यांनी दुकान घेण्यास नकार दिला.

- एकूणच दुकानदारांना दुसऱ्या ठिकाणची दुकाने पसंत आलेली नाहीत. काही जण न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मनपा दुकानदारांनी जमा केलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम व्याजासह परत करण्याच्या तयारीत आहे. मनपा सभागृहात याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला जाईल.

बॉक्स

- मनपाचा फाॅर्म्युला

गणेश टेकडी उड्डाणपुलाखाली १६० दुकानदारांनी मनपाच्या तिजोरीत ११.९६ कोटी रुपये जमा केले. दुकानासह उड्डाणपूल बनविण्यावर १६.२३ कोटी रुपये खर्च झाले. दुकानदारांनी दुकानांचा १२ वर्षे वापर केला. या वापराची रक्कम सोडून जर ८.५० टक्के व्याजासह दुकानदारांना रक्कम परत केली गेली तर एकूण १९.८४ कोटी रुपये परत करावे लागतील. वर्ष २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात या रकमेचे विनियोजन करावे लागेल.