शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

मातृत्व हे मातृत्वच असते, नैसर्गिक, सरोगेट, दत्तक असा भेदभाव नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:11 IST

नागपूर : अत्यंत हळव्या अशा मातृत्वाच्या विषयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भावनांना हात घालणारा निर्णय दिला. मातृत्व हे ...

नागपूर : अत्यंत हळव्या अशा मातृत्वाच्या विषयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भावनांना हात घालणारा निर्णय दिला. मातृत्व हे मातृत्वच असते. त्यात नैसर्गिक, सरोगेट, दत्तक असा भेदभाव करायला नको, अशी भूमिका न्यायालयाने निर्णयात मांडली. या निर्णयाद्वारे सरोगसीद्वारे आई झालेल्या शिक्षिकेला मातृत्व रजा आणि रजा कालावधीच्या वेतनासाठी पात्र ठरवून दिलासा देण्यात आला.

न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी हा निर्णय दिला. त्यात न्यायालय म्हणाले, महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार सरोगेट मातेलाही मातृत्व रजा नाकारता येणार नाही. हे नियम सरोगेट, नैसर्गिक व दत्तक मातांमध्ये फरक करीत नाही. ते सर्व मातांना व त्यांच्या मातृत्वाला समान वागणूक व सन्मान देतात. त्यामुळे नैसर्गिक व सरोगेट मातृत्वामध्ये भेदभाव करता येणार नाही. मातृत्व नैसर्गिक असो की, सरोगसीद्वारे प्राप्त असो, मातृत्व हे मातृत्वच असते. नैसर्गिक मातेप्रमाणे सरोगेट मातेलाही आपल्या बाळाची चिंता सतावते व तिला प्रसूती वेदनादेखील सहन कराव्या लागतात. याशिवाय न्यायालयाने दत्तक मातांसाठी २८ जुलै १९९५ रोजीच्या शासन निर्णयाचे उदाहरण दिले. या निर्णयानुसार मूल दत्तक घेणाऱ्या आईलाही मातृत्व रजा लागू आहेत, असे न्यायालयाने नमूद केले.

----------

...असे आहे प्रकरण

शुभांगिनी हेडाऊ, असे न्यायालयाकडून दिलासा मिळालेल्या शिक्षिकेचे नाव असून, त्या अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील रहिवासी आहेत. मंगरूळपीर येथील अभिमानजी काळमेघ विद्यालयात कार्यरत असलेल्या हेडाऊ यांनी सरोगसीद्वारे मातृत्वप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी ११ ऑगस्ट २०१५ ते १० फेब्रुवारी २०१६ पर्यंत मातृत्व रजा मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता; परंतु प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना २० जानेवारी २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार रजा मंजूर करण्यास नकार दिला, तसेच रजा कालावधीचे वेतनही दिले नाही. त्यामुळे हेडाऊ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका मंजूर करण्यात आली. हेडाऊतर्फे ॲड. एन.आर. साबू, तर विद्यालयातर्फे ॲड. कुलदीप महल्ले यांनी कामकाज पाहिले.

-------------------

शिक्षणाधिकाऱ्यांना फटकारले

उच्च न्यायालयाने प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना फटकारून रजा नाकारण्याच्या विवादित निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. यासंदर्भातील नियम स्पष्ट असताना शैक्षणिक क्षेत्रातील जबाबदार अधिकारी अशी बेकायदेशीर कृती कशी करू शकतात, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.