शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

क्षण आनंदचा अन् दु:खचा!

By admin | Updated: June 3, 2014 03:00 IST

मुंबईमध्ये सुरू असलेल्या मेअर कप इंटरनॅशनल ग्रॅण्डमास्टर

श्‍वेता गोळे : खेळ आणि शिक्षणातही ठेवले सातत्य

राहुल भडांगे नागपूर

मुंबईमध्ये सुरू असलेल्या मेअर कप इंटरनॅशनल ग्रॅण्डमास्टर टुर्नामेंटमध्ये उझबेकिस्तान विरुद्ध नागपूरच्या श्‍वेता गोळेचा सामना सुरू होता. सामना रंगात आला असतानाच तिच्या मैत्रिणीने १२ वीत नेत्रदीपक यश मिळविल्याची गोड बातमी दिली. या बातमीमुळे आनंदात हरवून गेलेल्या श्‍वेताची सामन्यावरची पकड सैल झाली आणि श्‍वेताला सामना गमवावा लागला. शिक्षणाच्या पटलावर यशस्वी झालेल्या श्‍वेताला बुद्धिबळाच्या पटलावर मिळालेली मात दु:ख देऊन गेली. आयुष्यात एकाच दिवशी आलेले हे सुखदु:खाचे क्षण कधीही विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया श्‍वेताने दिली.

बुद्धिबळाची आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून श्‍वेता प्रसिद्ध आहे. गेल्या दहा वर्षात तिने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत. लंडन, सिंगापूर, ब्राझील येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अनेक राष्ट्रीय स्पर्धेत तिने उत्कृष्ट प्रदर्शन करीत सुवर्णपदक पटकाविले आहे. अनेक प्रसिद्ध खेळाडूंचा शैक्षणिक आलेख बघितल्यास, ते शिक्षणात अपयशी ठरल्याचे दिसून येतात. मात्र श्‍वेताने खेळ आणि अभ्यासात गुणवत्ता कायम ठेवली. ती विविध गटात ९ वेळा स्टेट चॅम्पियन राहिली आहे. सिंगापूर, ब्राझीलमध्ये झालेल्या ग्रॅण्डमास्टर स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकाविले आहे. खेळाचा सराव, स्पर्धा यामुळे शिक्षणाला खंड पडत असतानाही तिने दहावीत ८0 टक्के गुण घेतले. बारावीतही तिच्या डिसेंबरपर्यंत स्पर्धाच सुरू होत्या. अभ्यासासाठी तिला केवळ दीड महिन्याचा अवधी मिळाला. कॉर्मसमध्ये ती बारावी करीत असल्याने अकाऊंट तिच्या डोक्यावरून जात होते. ट्यूशनमध्ये घ्यायला कोणी तयार नव्हते. अशा परिस्थितीत एका शिक्षिकेने तिची मदत केली.

या अल्पावधीत दिवस-रात्र मेहनत घेऊन बारावी उत्तीर्ण झाली. पुढे तिला आयएएसची तयारी करायची आहे.

बुद्धिबळामुळे शिक्षणातही मिळाले यश

आयुष्यात खेळणे अतिशय महत्त्वाचे आहे. खेळण्यामुळे शारीरिकदृष्ट्या माणूस मजबूत असतो, एकाग्रता वाढते, जिद्द निर्माण होते. त्यामुळे खेळाडूंसाठी कुठलेही क्षेत्र कठीण नाही. बुद्धिबळामुळे माझी एकाग्रता वाढली. स्मरणशक्ती वृद्धिंगत झाली. मला मिळालेल्या अवधीत जो काही अभ्यास केला त्याचा मला फायदा झाला. आयुष्यात कधीही खेळ सोडणार नसल्याचे श्‍वेताने सांगितले.