शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

निश्चयाने मोदींनी गाठले मौदा

By admin | Updated: August 22, 2014 01:37 IST

प्रतिकूल हवामानामुळे एटीसी, पायलट यांनी पंतप्रधानांना मौदा येथे घेऊन जाणारे हेलिकॉप्टर उडविण्यास नकार दिला. धुंवाधार पाऊस ऐकायला तयार नव्हता. शेवटी सुरक्षा अधिकाऱ्यांनी (एसपीजी)

प्राईम मिनिस्टर बाय रोड : मोदींना मौद्याला न्यायचे कसे? नरेश डोंगरे - नागपूर प्रतिकूल हवामानामुळे एटीसी, पायलट यांनी पंतप्रधानांना मौदा येथे घेऊन जाणारे हेलिकॉप्टर उडविण्यास नकार दिला. धुंवाधार पाऊस ऐकायला तयार नव्हता. शेवटी सुरक्षा अधिकाऱ्यांनी (एसपीजी) पंतप्रधानांना बाय रोड मौद्याला नेण्याचे ठरवले. एसपीजींच्या या निर्णयाने नागपूर-महाराष्ट्राची सुरक्षा यंत्रणा हादरली. कारण मौद्याच्या कार्यक्रमस्थळापासून पाच किलोमीटरचा रस्ता गर्दीने फुलला होता. अशास्थितीत पंतप्रधानांना रस्त्यावरून नेणे म्हणजे ‘हाय रिस्क’! ती पत्करण्याची पोलीस यंत्रणेची तयारी नव्हती. वरिष्ठांचे मतभेद होण्यापर्यंतची वेळ आली अन् ... पाऊस ऐकला (थांबला!). वातावरण अनुकूल झाले. त्यामुळे पंतप्रधानांना घेऊन हेलिकॉप्टरचा ताफा मौद्याकडे रवाना झाला. मात्र, तो दीड-पावणे दोन तासांचा कालावधी अवघ्या सुरक्षा यंत्रणेची धाकधुक वाढवणारा ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नियोजित वेळेनुसार विशेष विमानाने रांची (झारखंड) येथून आज दुपारी ३.०५ वाजता नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. पंतप्रधानांचे विमान धावपट्टीवर उतरत असतानाच धुंवाधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना विमानतळावरील व्हीआयपी लाऊंजमध्ये नेण्यात आले. तेथेच राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अतिमहत्त्वांचे व्यक्ती मा. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी यांनाही विमानतळावरून नेण्यात आले. दरम्यान, पंतप्रधानांना मौदा येथे नेण्यासाठी चार हेलिकॉप्टरचा ताफा तयार होता. परंतु अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, एक तास झाला तरी पाऊस थांबायला तयार नव्हता. हवामान प्रतिकूल झाल्यामुळे एटीसीसह विमानतळावरील वरिष्ठ, पायलट यांनी अशा हवामानात हेलिकॉप्टर उडविण्यास नकार दिला. पंतप्रधान मोदींना मौद्याला न्यायचे कसे, असा प्रश्न सुरक्षा अधिकाऱ्यांना अस्वस्थ करीत होता. आकाशातून शक्य नसल्यामुळे पंतप्रधानांना मौद्याला रस्त्याने (बाय कार) नेण्याचा निर्णय एसपीजीने घेतला. सुरक्षा यंत्रणेवर दडपणया निर्णयामुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रचंड दडपण आले. कारण मौद्याच्या कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी एकच रस्ता होता. पंतप्रधान येणार म्हणून हा रस्ता सुमारे पाच किलोमीटरपर्यंत अक्षरश: फुलला होता. मिळेल त्या वाहनाने कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी नागगरिकांची, भाजपा कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. अशास्थितीत या रस्त्यावरून पंतप्रधानांना वाहनाने नेणे अत्यंत धोक्याचे (हाय रिस्क) होते. हा धोका पत्करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा तयार नव्हती. सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये ‘आॅन एअर’ गंभीर चर्चा सुरू झाली. पंतप्रधानांना रस्त्याने नेण्याला अनेक अधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला होता. सुरक्षा व्यवस्थेची अग्निपरीक्षापंतप्रधानांना नागपूर विमानतळावरून मौदा येथील कार्यक्रमस्थळी वाहनातून नेण्याचे दिव्य नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण पोलीस या दोघांनाही पार पाडायचे होते. कारण नागपूर शहरातील सुरक्षेची जबाबदारी शहर पोलीस दल तर, नागपूर बाहेरची नेण्या-आणण्याची सुरक्षा व्यवस्था नागपूर ग्रामीण पोलिसांना सांभाळायची होती. नाही म्हणायला ही व्यवस्था (अर्धीअधुरी) शहर आणि ग्रामीण पोलिसांनी करूनही ठेवली होती. मात्र, सकाळपासून दुपारी २.३० पर्यंत वातावरण स्वच्छ असल्यामुळे या व्यवस्थेकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्यात पावसाने रस्ता खराब केला, अन् सुरक्षा व्यवस्थेची अग्निपरीक्षा घेणे सुरू केल्यामुळे शहर आणि ग्रामीण पोलिसांवर अचानक मोठे दडपण आले. सुरक्षा अधिकाऱ्यांमधील कुजबूज वाढली. मोठा धोका नजरेसमोर असल्यामुळे अखेर मौद्याचा कार्यक्रम (पंतप्रधानांचा दौरा) रद्द करण्यावर दुपारी ४.१५ च्या सुमारास एकमत होऊ लागले. वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, मौदा दौरा रद्द करण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांची अनुमती घेण्याचीही तयारी केली. मात्र, पंतप्रधान मोदींना मौद्यात जायचेच होते.