शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

‘मिशन क्लीन गंगा’ यशस्वी करणारच

By admin | Updated: November 18, 2014 00:51 IST

गंगा नदीच्या पाण्याला शुद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने गंगा स्वच्छता योजनेला सुरुवात केली आहे. गंगेच्या पुनरुज्जीवनाच्या या भगीरथ प्रयत्नात ‘नीरी’चा (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग

सतीश वटे : पर्यावरणाचा अपमान न करण्याचा विद्यार्थ्यांना सल्लानागपूर : गंगा नदीच्या पाण्याला शुद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने गंगा स्वच्छता योजनेला सुरुवात केली आहे. गंगेच्या पुनरुज्जीवनाच्या या भगीरथ प्रयत्नात ‘नीरी’चा (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) मोलाचा वाटा राहणार आहे. या मोहिमेसाठी ‘वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंग’चा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ १५ महिन्यात तयार करण्याचे आव्हान आमच्या संशोधकांपुढे असून, कुठल्याही परिस्थितीत ‘मिशन क्लीन गंगा’ यशस्वी करणारच, असा विश्वास ‘नीरी’चे संचालक डॉ. सतीश वटे यांनी व्यक्त केला. स्वरसाधना व सरकारी आणि गैरसरकारी स्वयंसेवी संस्थांच्या वतीने श्रीमंत पूर्णचंद्र बुटी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ह्यआपली वसुंधराह्ण या पर्यावरण प्रदर्शनादरम्यान त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी ‘नीरी’शी संबंधित निरनिराळ्या बाबींवर प्रकाश टाकलापवित्र गंगा नदीत होणारा सांडपाण्याचा निचरा थांबविण्याचे सर्वात कठीण आव्हान आहे. गंगा स्वच्छता योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ‘नीरी’कडे ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ‘नीरी’चे वैज्ञानिक अगदी गोमुखापासून ते हुगलीपर्यंत ‘वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंग’संदर्भातील निरनिराळ्या बाबींवर अभ्यास करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याव्यतिरिक्त ‘नीरी’च्या देशभरात सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पांवरदेखील त्यांनी प्रकाश टाकला.‘नीरी’च्या संशोधन प्रकल्पांत विद्याशाखेचा फार मोठा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी मान्य केले. निरनिराळ्या विद्याशाखा अन् संशोधन हे दोघेही एकमेकांना पूरक आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति जागरूकता निर्माण करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो, असे एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान डॉ. वटे यांनी सांगितले. ‘नीरी’ सदैव नागपूरसाठी कार्यरत राहील, असे ते म्हणाले. शुभांगी रायलू यांनी डॉ.वटे यांची मुलाखत घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात शाळकरी विद्यार्थी व निसर्गप्रेमी नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)नागपूर तूर्तास सुरक्षित, पण...नागपुरात प्रदूषणाची स्थिती काय आहे, यासंदर्भात डॉ.वटे यांना विचारणा केली असता त्यांनी सखोल उत्तर दिले. आजच्या तारखेत नागपुरात वायू तसेच जलप्रदूषणाची पातळी इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत कमी आहे. परंतु भविष्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर, नागरिकांनी पुढाकार घेऊन घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा. जर पर्यावरणाचा अपमान केला तर निसर्गदेखील तुम्हाला सोडणार नाही, या शब्दांत त्यांनी भविष्यातील धोक्यांची कल्पना उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.