शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

‘मिशन क्लीन गंगा’ यशस्वी करणारच

By admin | Updated: November 18, 2014 00:51 IST

गंगा नदीच्या पाण्याला शुद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने गंगा स्वच्छता योजनेला सुरुवात केली आहे. गंगेच्या पुनरुज्जीवनाच्या या भगीरथ प्रयत्नात ‘नीरी’चा (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग

सतीश वटे : पर्यावरणाचा अपमान न करण्याचा विद्यार्थ्यांना सल्लानागपूर : गंगा नदीच्या पाण्याला शुद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने गंगा स्वच्छता योजनेला सुरुवात केली आहे. गंगेच्या पुनरुज्जीवनाच्या या भगीरथ प्रयत्नात ‘नीरी’चा (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) मोलाचा वाटा राहणार आहे. या मोहिमेसाठी ‘वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंग’चा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ १५ महिन्यात तयार करण्याचे आव्हान आमच्या संशोधकांपुढे असून, कुठल्याही परिस्थितीत ‘मिशन क्लीन गंगा’ यशस्वी करणारच, असा विश्वास ‘नीरी’चे संचालक डॉ. सतीश वटे यांनी व्यक्त केला. स्वरसाधना व सरकारी आणि गैरसरकारी स्वयंसेवी संस्थांच्या वतीने श्रीमंत पूर्णचंद्र बुटी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ह्यआपली वसुंधराह्ण या पर्यावरण प्रदर्शनादरम्यान त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी ‘नीरी’शी संबंधित निरनिराळ्या बाबींवर प्रकाश टाकलापवित्र गंगा नदीत होणारा सांडपाण्याचा निचरा थांबविण्याचे सर्वात कठीण आव्हान आहे. गंगा स्वच्छता योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ‘नीरी’कडे ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ‘नीरी’चे वैज्ञानिक अगदी गोमुखापासून ते हुगलीपर्यंत ‘वॉटर क्वॉलिटी मॉनिटरिंग’संदर्भातील निरनिराळ्या बाबींवर अभ्यास करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याव्यतिरिक्त ‘नीरी’च्या देशभरात सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पांवरदेखील त्यांनी प्रकाश टाकला.‘नीरी’च्या संशोधन प्रकल्पांत विद्याशाखेचा फार मोठा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी मान्य केले. निरनिराळ्या विद्याशाखा अन् संशोधन हे दोघेही एकमेकांना पूरक आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति जागरूकता निर्माण करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो, असे एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान डॉ. वटे यांनी सांगितले. ‘नीरी’ सदैव नागपूरसाठी कार्यरत राहील, असे ते म्हणाले. शुभांगी रायलू यांनी डॉ.वटे यांची मुलाखत घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात शाळकरी विद्यार्थी व निसर्गप्रेमी नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)नागपूर तूर्तास सुरक्षित, पण...नागपुरात प्रदूषणाची स्थिती काय आहे, यासंदर्भात डॉ.वटे यांना विचारणा केली असता त्यांनी सखोल उत्तर दिले. आजच्या तारखेत नागपुरात वायू तसेच जलप्रदूषणाची पातळी इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत कमी आहे. परंतु भविष्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर, नागरिकांनी पुढाकार घेऊन घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा. जर पर्यावरणाचा अपमान केला तर निसर्गदेखील तुम्हाला सोडणार नाही, या शब्दांत त्यांनी भविष्यातील धोक्यांची कल्पना उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.