शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी गोंधळात एमएचटी-सीईटीची संधी हुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सप्टेंबर महिन्यात एमएचटी-सीईटीचे आयोजन करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सप्टेंबर महिन्यात एमएचटी-सीईटीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उशिरा लागला व एमएचटी-सीईटीच्या नोंदणीची मुदत जुलैमध्येच संपली. निकालासंदर्भातील सरकारच्या गोंधळामुळे काही विद्यार्थ्यांची नोंदणीची संधी हुकली आहे. सरकारकडून या सर्व बाबींचे अगोदर नियोजन का करण्यात आले नाही? असा सवाल संतप्त विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे.

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्रासह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यपातळीवर एमएचटी-सीईटी ही परीक्षा घेण्यात येते. राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून सर्व नियोजन होते. कोरोनामुळे या परीक्षेबाबत सुरुवातीपासूनच संभ्रम आहे. जेईई-मेन्सच्या वेळापत्रकातदेखील बदल झाला व परीक्षा पुढे ढकलल्या गेली. त्यामुळे हा संभ्रम आणखी वाढीस लागला.

एमएचटी-सीईटीसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत १५ जुलै ही होती, तर दुसरीकडे बारावीचा निकाल ४ ऑगस्ट रोजी जाहीर झाला. निकालासाठी प्रतीक्षा करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी अर्जच भरला नाही. त्याचा त्यांना फटका बसला.

मुदतवाढ का दिली नाही ?

राज्य सामाईक प्रवेशप्रक्रिया कक्षातर्फे ८ जून रोजी एमएचटी-सीईटीचे वेळापत्रक जारी करण्यात आले. या वेळापत्रकानुसार ७ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करायची होती, तर १५ जुलैपर्यंत विलंब शुल्कासह नोंदणी करता येणार होती. ७ जुलै रोजी सूचना जारी करण्यात आली व विलंबशुल्काशिवाय १५ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली. तोपर्यंत एमएचटी-सीईटी कधी होणार हे स्पष्ट झाले नव्हते. आता सप्टेंबर महिन्यात दोन टप्प्यांमध्ये हे आयोजन होणार आहे. अशा स्थितीत संधी हुकलेल्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ का दिली नाही? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या वर्षाचा विचार व्हावा

अगोदरच कोरोनामुळे आमच्या बारावीच्या वर्षात निकालाचा खेळखंडोबा झाला आहे. एमएचटी-सीईटी आणि बारावीचा निकाल घोषित करणाऱ्या यंत्रणांमध्ये समन्वय नव्हता हेच दिसून आले आहे. कमीत कमी निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवस तरी अर्ज भरण्याची संधी द्यायला हवी होती. विद्यार्थ्यांच्या वर्षाचा विचार व्हायला हवा होता, असे मत नीलेश वाघ या विद्यार्थ्याने व्यक्त केले.