शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

सरकारी गोंधळात एमएचटी-सीईटीची संधी हुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सप्टेंबर महिन्यात एमएचटी-सीईटीचे आयोजन करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सप्टेंबर महिन्यात एमएचटी-सीईटीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उशिरा लागला व एमएचटी-सीईटीच्या नोंदणीची मुदत जुलैमध्येच संपली. निकालासंदर्भातील सरकारच्या गोंधळामुळे काही विद्यार्थ्यांची नोंदणीची संधी हुकली आहे. सरकारकडून या सर्व बाबींचे अगोदर नियोजन का करण्यात आले नाही? असा सवाल संतप्त विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे.

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्रासह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यपातळीवर एमएचटी-सीईटी ही परीक्षा घेण्यात येते. राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून सर्व नियोजन होते. कोरोनामुळे या परीक्षेबाबत सुरुवातीपासूनच संभ्रम आहे. जेईई-मेन्सच्या वेळापत्रकातदेखील बदल झाला व परीक्षा पुढे ढकलल्या गेली. त्यामुळे हा संभ्रम आणखी वाढीस लागला.

एमएचटी-सीईटीसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत १५ जुलै ही होती, तर दुसरीकडे बारावीचा निकाल ४ ऑगस्ट रोजी जाहीर झाला. निकालासाठी प्रतीक्षा करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी अर्जच भरला नाही. त्याचा त्यांना फटका बसला.

मुदतवाढ का दिली नाही ?

राज्य सामाईक प्रवेशप्रक्रिया कक्षातर्फे ८ जून रोजी एमएचटी-सीईटीचे वेळापत्रक जारी करण्यात आले. या वेळापत्रकानुसार ७ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करायची होती, तर १५ जुलैपर्यंत विलंब शुल्कासह नोंदणी करता येणार होती. ७ जुलै रोजी सूचना जारी करण्यात आली व विलंबशुल्काशिवाय १५ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली. तोपर्यंत एमएचटी-सीईटी कधी होणार हे स्पष्ट झाले नव्हते. आता सप्टेंबर महिन्यात दोन टप्प्यांमध्ये हे आयोजन होणार आहे. अशा स्थितीत संधी हुकलेल्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ का दिली नाही? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या वर्षाचा विचार व्हावा

अगोदरच कोरोनामुळे आमच्या बारावीच्या वर्षात निकालाचा खेळखंडोबा झाला आहे. एमएचटी-सीईटी आणि बारावीचा निकाल घोषित करणाऱ्या यंत्रणांमध्ये समन्वय नव्हता हेच दिसून आले आहे. कमीत कमी निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवस तरी अर्ज भरण्याची संधी द्यायला हवी होती. विद्यार्थ्यांच्या वर्षाचा विचार व्हायला हवा होता, असे मत नीलेश वाघ या विद्यार्थ्याने व्यक्त केले.