शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

सरकारी गोंधळात एमएचटी-सीईटीची संधी हुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सप्टेंबर महिन्यात एमएचटी-सीईटीचे आयोजन करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सप्टेंबर महिन्यात एमएचटी-सीईटीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उशिरा लागला व एमएचटी-सीईटीच्या नोंदणीची मुदत जुलैमध्येच संपली. निकालासंदर्भातील सरकारच्या गोंधळामुळे काही विद्यार्थ्यांची नोंदणीची संधी हुकली आहे. सरकारकडून या सर्व बाबींचे अगोदर नियोजन का करण्यात आले नाही? असा सवाल संतप्त विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे.

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्रासह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यपातळीवर एमएचटी-सीईटी ही परीक्षा घेण्यात येते. राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून सर्व नियोजन होते. कोरोनामुळे या परीक्षेबाबत सुरुवातीपासूनच संभ्रम आहे. जेईई-मेन्सच्या वेळापत्रकातदेखील बदल झाला व परीक्षा पुढे ढकलल्या गेली. त्यामुळे हा संभ्रम आणखी वाढीस लागला.

एमएचटी-सीईटीसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत १५ जुलै ही होती, तर दुसरीकडे बारावीचा निकाल ४ ऑगस्ट रोजी जाहीर झाला. निकालासाठी प्रतीक्षा करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी अर्जच भरला नाही. त्याचा त्यांना फटका बसला.

मुदतवाढ का दिली नाही ?

राज्य सामाईक प्रवेशप्रक्रिया कक्षातर्फे ८ जून रोजी एमएचटी-सीईटीचे वेळापत्रक जारी करण्यात आले. या वेळापत्रकानुसार ७ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करायची होती, तर १५ जुलैपर्यंत विलंब शुल्कासह नोंदणी करता येणार होती. ७ जुलै रोजी सूचना जारी करण्यात आली व विलंबशुल्काशिवाय १५ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली. तोपर्यंत एमएचटी-सीईटी कधी होणार हे स्पष्ट झाले नव्हते. आता सप्टेंबर महिन्यात दोन टप्प्यांमध्ये हे आयोजन होणार आहे. अशा स्थितीत संधी हुकलेल्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ का दिली नाही? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या वर्षाचा विचार व्हावा

अगोदरच कोरोनामुळे आमच्या बारावीच्या वर्षात निकालाचा खेळखंडोबा झाला आहे. एमएचटी-सीईटी आणि बारावीचा निकाल घोषित करणाऱ्या यंत्रणांमध्ये समन्वय नव्हता हेच दिसून आले आहे. कमीत कमी निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवस तरी अर्ज भरण्याची संधी द्यायला हवी होती. विद्यार्थ्यांच्या वर्षाचा विचार व्हायला हवा होता, असे मत नीलेश वाघ या विद्यार्थ्याने व्यक्त केले.