शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

मनरेगा कर्मचाऱ्याचा रामगिरीवर मोर्चा

By admin | Updated: August 28, 2016 02:25 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कर्मचारी आणि ग्रामरोजगार सेवकांना नोकरीचे स्थायीत्व आणि सुरक्षेची

नोकरीची सुरक्षा देण्याची मागणी : पाच हजार आंदोलनकर्ते सामीलनागपूर : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कर्मचारी आणि ग्रामरोजगार सेवकांना नोकरीचे स्थायीत्व आणि सुरक्षेची हमी मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मनरेगा कर्मचारी संघटना व ग्रामरोजगार सेवक संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी यशवंत स्टेडियम येथून मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानावर मोर्चा काढला होता. या मोर्च्यात राज्यभरातून आलेले ५००० च्या जवळपास आंदोलनकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व मनरेगा कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव ओंकार जाधव, सरचिटणीस राजन क्षीरसागर, उपाध्यक्ष संतोष राठोड यांनी केले. लोकमतशी बोलताना संतोष राठोड यांनी सांगितले की, मनरेगाचे अनेक कर्मचारी गेल्या दहापेक्षा जास्त वर्षापासून या योजनेंतर्गत सेवा देत आहेत. यातील बहुतेकांनी नोकरीची वयोमर्यादा ओलांडली आहे. मात्र कंत्राटी तत्त्वावर काम करीत असल्याने त्यांना नोकरीची कुठलीही हमी मिळत नाही. शिवाय शासकीय सेवा सवलतीही मिळत नाही. अचानक नोकरीवरून काढण्यात येत असल्याने कुटुंबाच्या पोषणाचा प्रश्न निर्माण होतो. ग्रामरोजगार सेवकांनाही सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीची टीम बदलली की, रोजगार सेवकालाही काढण्यात येते. सरकारने या कर्मचाऱ्यांचा अनुभव गृहीत धरून त्यांच्या कायम नोकरीची हमी देण्याचा निर्णय घ्यावा. संघटनेच्यावतीने सर्व कंत्राटी नरेगा कर्मचाऱ्यांसाठी एकसमान धोरण लागू करावे, या योजनेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना नोकरीची हमी देण्यात यावी, मग्रारोहच्या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्य करावी, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय योजनेनुसार वेतन देण्यात यावे, कामाचा विचार करून बढती मिळावी, नरेगा कर्मचाऱ्यांना कामाचे अधिकार मिळावे, कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिका तयार करण्यात यावी आणि ग्रामरोजगार सेवकांना दरमाह १० हजार रुपये वेतन लागू करावे आदी मागण्या करण्यात आल्या. पोलिसांनी मोर्चाला संविधान चौकात थांबविले. या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी सभा घेतली. यानंतर प्रतिनिधी मंडळाने नरेगा आयुक्त कार्यालयात जाऊन उपायुक्तांशी भेट घेतली व मागण्यांचे निवेदन सोपविले.(प्रतिनिधी)