शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

मेट्रोरिजनची सुनावणी झाली पण निर्णय नाही

By admin | Updated: August 9, 2015 02:36 IST

नागपूर महानगर प्रारूप विकास आराखड्याच्या (मेट्रोरिजन)च्या आक्षेपावर मेट्रोरिजनच्या कार्यालयात शनिवारी प्रत्यक्ष सुनावणीला सुरूवात झाली.

पहिल्याच दिवशी २५० आक्षेप जाणून घेतले : शासनाला करणार शिफारसनागपूर : नागपूर महानगर प्रारूप विकास आराखड्याच्या (मेट्रोरिजन)च्या आक्षेपावर मेट्रोरिजनच्या कार्यालयात शनिवारी प्रत्यक्ष सुनावणीला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी समितीने २५० आक्षेपक र्त्याशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांचे आक्षेप जाणून घेतले. प्रत्येकाची नोंद घेतली. आक्षेपकर्त्यांना सुनावणीच्या स्थळी कुठलाही निर्णय देण्यात आला नाही. समितीला जे आक्षेप योग्य वाटतील ते सरकारकडे पाठवून स्वीकारण्याची शिफारस केली जाईल, असे सुनावणी समितीने स्पष्ट केले. त्यामुळे सुनावणीला आलेले बहुतांश आक्षेपकर्ते आपले म्हणणे मांडून पदरात काहीच न मिळविता निराश होऊन परतले. सुनावणी समितीचे सदस्य राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेश बिनिवाले, नगररचना विभागाचे माजी सहसंचालक अ.चं.मुंजे, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विजय कापसे, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने व नगररचना विभागाचे एन.एस. आढीरी आदींनी तक्रारक र्त्यांचे आक्षेप जाणून घेतले. सकाळी ११ ते ६ वाजेपर्यत सुनावणी घेण्यात आली. यात प्रामुख्याने आरक्षणात परस्पर बदल केल्याच्या अनेकांनी तक्रारी नोंदविल्या. अडका, अजनी, अंबाडी, आसोली, अवंडी, बाबुळखेडा, बिना, भामेवाडा, भवरी, भिलगाव, भूगाव, बिडगाव, चिचोली, चिकना, धारगाव आदी गावातील जमिनीबाबतच्या आक्षेपांच्या समितीने नोंदी केल्या. औद्योगिक वापरासाठी आरक्षित असलेली जमीन आराखड्यात कृषी वा निवासी वापरासाठी आरक्षित दर्शविण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांची जमीन वाहतुकीसाठी आरक्षित दर्शविण्यात आली. या विषयी पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. काही ठिकाणी उद्योग सुरू आहे. उद्योगाच्या विस्तारासाठी ठेवलेल्या जमिनीला नासुप्रने याला यापूर्वीच मंजुरी दिली असताना नवीन आराखड्यात कृषीसाठी आरक्षित ठेण्यात आली. अशा स्वरूपाचे आक्षेप नोंदविण्यात आले. आक्षेप नोंदविताना स्क्रीनवरील नकाशावरून तक्रारक र्त्याच्या तक्रारी जाणून घेतल्या. काहीचे समाधान करण्यात आले. अनेकांनी वापरात बदल झाला नसतानाही आक्षेप नोंदविल्याचे प्रकार निदर्शनास आले. अशा तक्र ारींचा निपटारा करण्यात आला. भंडारा मार्गावरील मौजा आसोली येथील आनंद अग्रवाल यांनी उद्योगासाठी जमीन घेतली आहे. ही अकृष करण्याला नासुप्रकडून अनुमती घेतली होती. परंतु प्रारूप आराखड्यात ती कृषी दर्शविण्यात आल्याचा आक्षेप अग्रवाल यांनी नोंदविला. कामठी तालुक्यातील मौजा भवरी येथील नथुराम रामचंद्र पालांदूरकर यांनी औद्योगिक वापरासाठी जमीन खरेदी केली आहे. या जमिनीच्या बाजूला कारखाना आहे. असे असतानाही त्यांची जमीन कृषी वापरासाठी आरक्षित दर्शविण्यात आल्याचा आक्षेप नोंदविला. कामठी तालुक्यातील मौजा भामेवाडा गावाच्या बाजूला नवदीप अ‍ॅग्रीकल्चर कंपनीने निवासी वापरासाठी घेतली. ही जमीन अकृ षक करण्यात आली आहे. परंतु प्रारूप आराखड्यात ती कृषी दर्शविण्यात आल्याचा आक्षेप कंपनीचे मॅनेजर आनंद मोटघरे यांनी नोंदविला. या जागेवर घरकूल योजना प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली. भिलगाव येथील ॠषभ गुप्ता यांच्या जमिनीतून रस्ता दर्शविण्यात आला आहे. यासाठी आरक्षण करताना पूर्वसूचना दिली नसल्याची तक्रार त्यांनी नोंदविली. कापसी (बु) येथील जयेश पटेल यांनी उद्योगासाठी जमीन खरेदी केली आहे. ही जमीन निवासी वापरासाठी आरक्षित दर्शविण्यात आली. यावर आक्षेप नोंदविण्यात आला. भवरी येथे राधेश्याम सारडा यांचा कारखाना आहे. बाजूच्या जमिनीवर कारखान्याचा विस्तार करण्याचा त्यांचा विचार आहे. परंतु ही जमीन आराखड्यात कृषी वापरासाठी आरक्षित दर्शविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मौजा भवरी येथे मनोरलाल सच्चानी यांनी उद्योग उभारण्यासाठी जमीन खरेदी केली आहे. नासुप्रने यासाठी यापूर्वीच अनुमती दिली आहे. परंतु विकास आराखड्यात त्यांची जमीन कृषीसाठी आरक्षित दर्शविण्यात आल्याचा आक्षेप त्यांचे प्रतिनिधी करोडीलाल आहुजा यांनी नोंदविला. तसेच भवरी येथे नीरज खक्खर यांनी फूड इंडस्ट्रीसाठी जमीन खरेदी केली आहे. येथे कारखाना सुरू असतानाही विकास आराखड्यात ही जमीन कृषी दर्शविण्यात आल्याचा आक्षेप त्यांनी नोंदविला. (प्रतिनिधी)२० दिवस चालेल प्रक्रिया नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी सांगितले की, ही प्रक्रिया २० दिवस चालेल. परंतु काही आक्षेपकर्ते काही कारणास्तव आले नाही. त्यांच्यासाठी शेवटच्या दिवशी चर्चा करून त्यांचे आक्षेप जाणून घेऊ. काहींच्या जमीन वापरात बदल झालेला नाही. परंतु आराखड्यात बदल झाला असा समज झाल्याने त्यांनी आक्षेप नोंदविल्याची माहिती वर्धने यांनी दिली. आक्षेप नोंदविणाऱ्यांचे समाधान व्हावे, यासाठी मोठ्या स्क्रीनवर मौजा, शेतसर्व्हे क्रमांक व आरक्षण याची माहिती देण्यात आली होती. या माध्यमातून आक्षेप नोंदविणाऱ्यांचे समाधान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष चर्चा करून आक्षेप जाणून घेतलेप्रारूप विकास आराखड्यावर नोंदविण्यात आलेल्या आक्षेपावर तक्रारक र्त्याशी समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. काही तक्रारींचे निराकरण करण्यात आले तर काही शासनाकडे निर्णयासाठी पाठविण्यात येणार आहे. आक्षेप नोंदविणाऱ्या प्रत्येकाला चर्चेची वेळ व टोकन क्रमांक देण्यात आला होता. त्यानुसार प्रत्येकासोबत चर्चा करण्यात आली. त्यामुळे पहिल्या दिवशी आक्षेप जाणून घेण्याची प्रक्रिया शांततेत पार पडली.