शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

मेडिकल, मेयोला करणार ‘बेस्ट’

By admin | Updated: May 29, 2016 03:05 IST

शासकीय रुग्णालयांवर रुग्णांचा भार वाढत आहे. या स्थितीही डॉक्टर उत्कृष्ट सेवा देत आहेत.

देवेंद्र फडणवीस : मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरचे उद्घाटन व आयसीसीयूचे भूमिपूजननागपूर : शासकीय रुग्णालयांवर रुग्णांचा भार वाढत आहे. या स्थितीही डॉक्टर उत्कृष्ट सेवा देत आहेत. परंतु शासकीय महाविद्यालय व रुग्णालयांची गौरवशाली परंपरा ढासळत चालली आहे. ती पुन्हा प्राप्त व्हावी यासाठी येत्या तीन-चार वर्षांत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील आणि देशातील ‘बेस्ट’ कॉलेजमध्ये मेयो व मेडिकलची ओळख निर्माण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’च्या इमारतीचे उद्घाटन व अतिदक्षता विभागाच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, आमदर सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, नागो गाणार, भाजपाचे महामंत्री व नगरसेवक संदीप जोशी, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मेघा गाडगीळ, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरची गेल्या सात-आठ वर्षांपासून केवळ चर्चा सुरू हाती. गेल्या दोन वर्षांपासून याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अत्याधुनिक सुविधेसह रुग्णांच्या सेवेसाठी हे केंद्र सज्ज झाले आहे. मध्य भारतातील गरजू ग्णांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या केंद्रामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळेल. (प्रतिनिधी)अपघातात १ लाख ६८ हजार लोकांचा मृत्यूअध्यक्षीय भाषणात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, देशात दरवर्षी पाच लाख अपघात होतात. गेल्या वर्षी अपघातामध्ये १ लाख ६८ लोकांचा बळी गेला. ही संख्या एखाद्या युद्धापेक्षाही मोठी आहे. अपघातांच्या कारणांचा शोध घेण्यासोबतच अपघात झाल्यानंतर तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी ट्रॉमा केअर सेंटरची आवश्यकता मध्य भारतात पूर्ण होत आहे. राज्यातील व देशातील अपघातप्रवण स्थळ शोधून त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. येत्या दोन वर्षांत अपघाती मृत्यूची संख्या ५० टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य आहे, असेही ते म्हणाले.