शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

मेडिकल, मेयोला करणार ‘बेस्ट’

By admin | Updated: May 29, 2016 03:05 IST

शासकीय रुग्णालयांवर रुग्णांचा भार वाढत आहे. या स्थितीही डॉक्टर उत्कृष्ट सेवा देत आहेत.

देवेंद्र फडणवीस : मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरचे उद्घाटन व आयसीसीयूचे भूमिपूजननागपूर : शासकीय रुग्णालयांवर रुग्णांचा भार वाढत आहे. या स्थितीही डॉक्टर उत्कृष्ट सेवा देत आहेत. परंतु शासकीय महाविद्यालय व रुग्णालयांची गौरवशाली परंपरा ढासळत चालली आहे. ती पुन्हा प्राप्त व्हावी यासाठी येत्या तीन-चार वर्षांत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील आणि देशातील ‘बेस्ट’ कॉलेजमध्ये मेयो व मेडिकलची ओळख निर्माण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’च्या इमारतीचे उद्घाटन व अतिदक्षता विभागाच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, आमदर सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, नागो गाणार, भाजपाचे महामंत्री व नगरसेवक संदीप जोशी, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मेघा गाडगीळ, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरची गेल्या सात-आठ वर्षांपासून केवळ चर्चा सुरू हाती. गेल्या दोन वर्षांपासून याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अत्याधुनिक सुविधेसह रुग्णांच्या सेवेसाठी हे केंद्र सज्ज झाले आहे. मध्य भारतातील गरजू ग्णांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या केंद्रामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळेल. (प्रतिनिधी)अपघातात १ लाख ६८ हजार लोकांचा मृत्यूअध्यक्षीय भाषणात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, देशात दरवर्षी पाच लाख अपघात होतात. गेल्या वर्षी अपघातामध्ये १ लाख ६८ लोकांचा बळी गेला. ही संख्या एखाद्या युद्धापेक्षाही मोठी आहे. अपघातांच्या कारणांचा शोध घेण्यासोबतच अपघात झाल्यानंतर तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी ट्रॉमा केअर सेंटरची आवश्यकता मध्य भारतात पूर्ण होत आहे. राज्यातील व देशातील अपघातप्रवण स्थळ शोधून त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. येत्या दोन वर्षांत अपघाती मृत्यूची संख्या ५० टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य आहे, असेही ते म्हणाले.