शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

महापौरांनी मांडली नागपूरकरांची व्यथा

By admin | Updated: November 9, 2015 05:40 IST

नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र) संदर्भात नागपूर शहरासोबतच ग्रामीण भागातील लोकांचा अनुभव चांगला नाही.

नागपूर: नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र) संदर्भात नागपूर शहरासोबतच ग्रामीण भागातील लोकांचा अनुभव चांगला नाही. लहानसहान कामासाठी वेठीस धरण्याच्या प्रकारामुळे नासुप्र बरखास्त व्हावी, अशीच लोकांची भावना आहे. म्हणूनच सत्तेत नसताना भाजप नेते नासुप्रच्या विरोधात होते. आजही अनेकांची हीच भावना आहे. परंतु केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असूनही याबाबतचा निर्णय होत नाही. याचे शल्य त्यांच्या मनात आहे. नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात शहराचे प्रथम नागरिक म्हणून नागरिकांच्यावतीने महापौर प्रवीण दटके यांनी हीच व्यथा मांडली.नासुप्रतील अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी नाही. विश्वस्त म्हणून पाच जणांची निवड केली जाते. परंतु विश्वस्त पदावर होणाऱ्या नेमणुका कशा होतात हे सांगण्याची गरज नाही. हितसंबंधासाठी अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करीत असल्याने नासुप्रच्या कारभारावर कुणाचेच नियंत्रण नाही. म्हणूनच विरोधी पक्षात असताना भाजप नेते नासुप्रला बरखास्त करण्याची मागणी करीत होते. सत्ता आल्यास या बाबतचा निर्णय घेतला जाईल, याची ग्वाही नागरिकांना दिली होती. परंतु सत्ता येताच मोठ्या नेत्यांनी हा मुद्दा दुर्लक्षित केला आहे. शहरातील अविकसित ले-आऊ टचा विकास करण्याची जबाबदारी नासुप्रवर शासनाने टाकली होती. परंतु या भागाचा अपेक्षित विकास झालेला दिसत नाही. एखाद्या नागरिकाला बांधकाम करावयाचे झाल्यास महापालिका व नासुप्रकडून परवानगी घ्यावी लागते. एकाच कामासाठी दोन विभागाची परवानगी कशासाठी, असा प्रश्न लोकांना पडतो. नासुप्रमध्ये सहज काम होईल अशी स्थिती नाही. लहानसहान कामासाठी लोकांना दाम मोजावे लागतात. महापालिकेत लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे अधिकारी वा कर्मचाऱ्यांवर वचक आहे. लोकांना त्रास झाला तर अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जाब विचारता येतो. परंतु नासुप्रत अन्याय झाला तर त्याची बाजू मांडणारे कुणीच नाही. विश्वस्तांकडूनही न्याय मिळेलच याची शाश्वती नाही. अशीच अवस्था नगररचना विभागाची आहे. शहरात या विभागाची दोन मुख्यालये कशासाठी या प्रश्नाचे उत्तर शोधूनही सापडत नाही. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. हीच कामे नासुप्रच्या माध्यमातूनही केली जातात. त्यामुळे विकासाचा समन्वय राहात नाही. एखाद्या भागात महापालिकेने प्रस्तावित केलेले गडर लाईन वा पिण्याच्या पाण्यासाठी नळाची पाईप लाईन टाकण्याचे काम नासुप्रच्या अजेंड्यात असते. त्यामुळे नियोजनाचा फज्जा उडतो. शहरातील अविकसित ले-आऊ टचा विकास करण्याची जबाबदारी नासुप्रला योग्य प्रकारे पार पाडता आलेली नाही. असे असतानाही नासुप्रकडे मेट्रो रिजनची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मेट्रो रिजनच्या प्रस्तावित विकास आराखड्याला लोकांचा विरोध वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासारखे दोन वजनदार नेते नागपुरातील आहे. सत्तेत नसताना त्यांनीही नासुप्र बरखास्त व्हावी अशी भूमिका मांडली होती. आज केंद्र व राज्यातील सत्ता त्यांच्या हातात आहे. दुसरीकडे त्यांचाच पक्षाचे महापौर वारंवार नासुप्र विरोधात भूमिका मांडत आहे. शहरातील २४ लाख नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी ही भूमिका मांडली आहे. लोकभावनांचा आदर म्हणून नासुप्र संदर्भात सरकारने निर्णय घ्यायला हवा. परंतु फडणवीस व गडकरी यांच्या मनात नेमके काय आहे ते दटके यांनाच ठावूक.(प्रतिनिधी)