शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
2
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
3
सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?
4
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
5
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
6
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
7
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
8
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
9
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
10
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
11
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
12
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
13
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
14
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
15
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
16
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
17
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
18
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
19
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
20
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याच्या अनैतिक संबंधामुळे विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:03 IST

बाहेरख्याली नवऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ठळक मुद्देव्यथा लिहून गळफास लावला : हुडकेश्वरमध्ये गुन्हा दाखल, नवरोबा गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाहेरख्याली नवऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. जयश्री विक्रम नारनवरे (वय ३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिच्या मृत्यूला तिचा नवराच जबाबदार असल्याची तक्रार जयश्रीच्या आईने नोंदविल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी विक्रम नारनवरेला अटक केली.आरोपी विक्रम नारनवरेचे जयश्रीसोबत २०१५ मध्ये लग्न झाले. त्याच्याकडे एका मोबाईल कंपनीच्या सीमकार्डची एजन्सी असून, शताब्दी चौकात त्याचे कार्यालय आहे. विक्रमचे नातेवाईक प्रॉपर्टी डीलिंगसह अन्य काही व्यवसाय करतात. काही महिन्यांपासून विक्रमचे अनैतिक संबंध असल्याचा संशय जयश्रीला होता. त्यामुळे या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचा. विक्रम तिला मारहाण करायचा. टोचून बोलायचा. या प्रकारामुळे जयश्री अस्वस्थ राहायची. माहेरच्या मंडळींना या दोघातील वादाची कल्पना होती. त्यांच्यात वारंवार वाद होत असल्यामुळे विक्रमने चार महिन्यांपूर्वी वडिलांचे घर सोडून हुडकेश्वरमधील महालक्ष्मीनगरात भाड्याचे घर घेतले होते. तेथे हे दोघेच राहत होते. नेहमीप्रमाणे विक्रम आज सकाळी घराबाहेर गेला. दुपारी १ च्या सुमारास तो परत आला असता त्याला जयश्री सिलींग फॅनला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. त्याने आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. नातेवाईकांनाही कळविले. जयश्रीला खाली उतरवून मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती कळाल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी जयश्रीच्या घरी जाऊन तिच्या रूमची झडती घेतली असता एक सुसाईड नोट मिळाली. विक्रमचे दुसऱ्या तरुणीसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे आणि त्याच्याकडून होणारा छळ असह्य झाल्यामुळे आत्महत्या करीत असल्याने जयश्रीने या चिठ्ठीत लिहून ठेवले आहे, असे हुडकेश्वरचे ठाणेदार संदीप भोसले यांनी सांगितले. या चिठ्ठीमुळेच प्रारंभी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.जयश्रीच्या आईची तक्रारमुलीच्या मृत्यूचे वृत्त कळताच जयश्रीच्या माहेरची मंडळी शोकसंतप्त झाली. तिला फाशी देऊन मारले आणि आत्महत्येचा दिखावा करण्यात येत असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी लावला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलीस लगेच घटनास्थळी पोहचले. तेथे जयश्रीने लिहून ठेवलेली सुसाईड नोट पाहून हे प्रकरण आत्महत्येचेच असल्याचे पोलिसांनी जयश्रीच्या माहेरच्यांना पटवून दिले. दरम्यान, आरोपी विक्रम जयश्रीला माहेरून हुंड्याची रक्कम आणावी म्हणून छळत होता. त्याचे दुसरीकडे अनैतिक संबंध असल्यामुळे तो तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. या छळाला कंटाळूनच जयश्रीने आत्महत्या केली. तिच्या मृत्यूला विक्रम नारनवरेच कारणीभूत असल्याची तक्रार जयश्रीची आई रेखा दुरुतकर यांनी हुडकेश्वर ठाण्यात नोंदवली. त्यावरून पोलिसांनी कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करून विक्रमलाअटक केली.

टॅग्स :Suicideआत्महत्या