शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

बाजारपेठा सुरू, व्यवहार नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:07 IST

नागपूर : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील शेतकऱ्यांनी केलेल्या भारत बंदमध्ये नागपुरातील सर्वच बाजारपेठा सुरू होत्या. ...

नागपूर : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील शेतकऱ्यांनी केलेल्या भारत बंदमध्ये नागपुरातील सर्वच बाजारपेठा सुरू होत्या. व्यापाऱ्यांनी बंदला समर्थन न देता सकाळपासूनच दुकाने सुरू करून नियमित व्यवहार सुरू ठेवले. आंदोलनकर्त्यांच्या धास्तीने काही बाजारपेठ सकाळी बंद होत्या, पण आंदोलनकर्ते गेल्यानंतर पुन्हा बाजारपेठा सुरू झाल्या. अन्य बाजारपेठांमध्ये देशव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

भारत बंदमध्ये इतवारी व मस्कासाथ किराणा, इतवारी सराफा ओळ, जुना भंडारा रोड, गांधीबाग, महाल, सीताबर्डी, सक्करदरा या बाजारपेठा सकाळी काही वेळासाठी बंद होऊन पुन्हा सुरू झाल्या. या बाजारपेठांमध्ये नियमित व्यवहार झालेत. व्यापारी म्हणाले, कृषी कायद्याचा विषय आमचा नाही. त्यामुळे पाठिंबा दिला नाही. लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये आधीच व्यवसाय बुडाला आहे. व्यवहार बंद ठेवल्याने व्यवसायावर परिणाम होणार होता. त्यामुळे असोसिएशनने निर्णय घेऊन व्यवसाय बंद न ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती काही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, शेतकऱ्यांच्या भारत बंदला आमचा पाठिंबा होता, पण बाजारपेठा बंद ठेवण्यास नकार होता.

इतवारी किराणा असोसिएशनचे सचिव शिवप्रताप सिंह म्हणाले, नेहमीप्रमाणे किराणा व्यवसाय सुरू होता. आवश्यक वस्तूंच्या बाजारपेठा बंद न ठेवण्याचा निर्णय घेतल्याने या बाजाराचे व्यवहार नियमित सुरू होते. यानुसार इतवारी, मस्कासाथ, किराणा ओळ येथील दुकाने सुरू होती.

नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर म्हणाले, भारत बंदमध्ये सराफा व्यावसायिकांचा सहभाग नव्हता. नागपुरातील जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त दुकाने सुरू होती.

कळमना बाजारात ५ कोटींचा व्यवसाय ठप्प

कृषी कायद्याच्या निषेधार्थ भारत बंदमध्ये कळमना धान्य बाजारातील आडतिया आणि व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून प्रतिष्ठान बंद ठेवले आणि बंदला पाठिंबा दिला. पण कळमन्यातील भाजीपाला, फळ बाजार, ग्रेन मर्चंट असोसिएशन, आलू-कांदे बाजारातील व्यवहार सुरू होते.

धान्य मंडळाचे अध्यक्ष अतुल सेनाड यांच्या नेतृत्वात बाईक रॅली काढून निषेध करण्यात आला. निषेध सभा बोलावून शेतकऱ्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने आंदोलन करण्यात आले आणि केंद्र सरकारविरोधात नारेबाजी करण्यात आली. संपूर्ण मार्केटमध्ये मिरवणूक काढून विरोध दर्शविण्यात आला. आंदोलनात मंडळाचे पदाधिकारी गोपाळराव कळमकर, रामेश्वर हिरुळकर, सारंग वानखेडे, नरेश जिभकाटे, नीळकंठ हटवार, राजू उमाठे, रहमान शेख, राजेश सातपुते, स्वप्निल वैरागडे, भूषण क्षीरसागर, पंढरीनाथ मुंडले, चिंटू पुरोहित, रामदास गजापुरे, रमेश नाकाडे, उदय आकरे, विनोद कातुरे, भीमराव मुटे, मनोज भालोटिया, कमलाकर घाटोळे, मनोहर हजारे, सुरेश बारई, इस्माईल शेख, ज्ञानेश्वर गजभिये, गंगाधर बोरकर, दिनेश चांडक, शंकर शेंडे, सुनील गवते, राजू ठवकर उपस्थित होते.