शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

बाजारपेठा सुरू, व्यवहार नियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:07 IST

नागपूर : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील शेतकऱ्यांनी केलेल्या भारत बंदमध्ये नागपुरातील सर्वच बाजारपेठा सुरू होत्या. ...

नागपूर : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील शेतकऱ्यांनी केलेल्या भारत बंदमध्ये नागपुरातील सर्वच बाजारपेठा सुरू होत्या. व्यापाऱ्यांनी बंदला समर्थन न देता सकाळपासूनच दुकाने सुरू करून नियमित व्यवहार सुरू ठेवले. आंदोलनकर्त्यांच्या धास्तीने काही बाजारपेठ सकाळी बंद होत्या, पण आंदोलनकर्ते गेल्यानंतर पुन्हा बाजारपेठा सुरू झाल्या. अन्य बाजारपेठांमध्ये देशव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

भारत बंदमध्ये इतवारी व मस्कासाथ किराणा, इतवारी सराफा ओळ, जुना भंडारा रोड, गांधीबाग, महाल, सीताबर्डी, सक्करदरा या बाजारपेठा सकाळी काही वेळासाठी बंद होऊन पुन्हा सुरू झाल्या. या बाजारपेठांमध्ये नियमित व्यवहार झालेत. व्यापारी म्हणाले, कृषी कायद्याचा विषय आमचा नाही. त्यामुळे पाठिंबा दिला नाही. लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये आधीच व्यवसाय बुडाला आहे. व्यवहार बंद ठेवल्याने व्यवसायावर परिणाम होणार होता. त्यामुळे असोसिएशनने निर्णय घेऊन व्यवसाय बंद न ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती काही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, शेतकऱ्यांच्या भारत बंदला आमचा पाठिंबा होता, पण बाजारपेठा बंद ठेवण्यास नकार होता.

इतवारी किराणा असोसिएशनचे सचिव शिवप्रताप सिंह म्हणाले, नेहमीप्रमाणे किराणा व्यवसाय सुरू होता. आवश्यक वस्तूंच्या बाजारपेठा बंद न ठेवण्याचा निर्णय घेतल्याने या बाजाराचे व्यवहार नियमित सुरू होते. यानुसार इतवारी, मस्कासाथ, किराणा ओळ येथील दुकाने सुरू होती.

नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर म्हणाले, भारत बंदमध्ये सराफा व्यावसायिकांचा सहभाग नव्हता. नागपुरातील जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त दुकाने सुरू होती.

कळमना बाजारात ५ कोटींचा व्यवसाय ठप्प

कृषी कायद्याच्या निषेधार्थ भारत बंदमध्ये कळमना धान्य बाजारातील आडतिया आणि व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून प्रतिष्ठान बंद ठेवले आणि बंदला पाठिंबा दिला. पण कळमन्यातील भाजीपाला, फळ बाजार, ग्रेन मर्चंट असोसिएशन, आलू-कांदे बाजारातील व्यवहार सुरू होते.

धान्य मंडळाचे अध्यक्ष अतुल सेनाड यांच्या नेतृत्वात बाईक रॅली काढून निषेध करण्यात आला. निषेध सभा बोलावून शेतकऱ्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने आंदोलन करण्यात आले आणि केंद्र सरकारविरोधात नारेबाजी करण्यात आली. संपूर्ण मार्केटमध्ये मिरवणूक काढून विरोध दर्शविण्यात आला. आंदोलनात मंडळाचे पदाधिकारी गोपाळराव कळमकर, रामेश्वर हिरुळकर, सारंग वानखेडे, नरेश जिभकाटे, नीळकंठ हटवार, राजू उमाठे, रहमान शेख, राजेश सातपुते, स्वप्निल वैरागडे, भूषण क्षीरसागर, पंढरीनाथ मुंडले, चिंटू पुरोहित, रामदास गजापुरे, रमेश नाकाडे, उदय आकरे, विनोद कातुरे, भीमराव मुटे, मनोज भालोटिया, कमलाकर घाटोळे, मनोहर हजारे, सुरेश बारई, इस्माईल शेख, ज्ञानेश्वर गजभिये, गंगाधर बोरकर, दिनेश चांडक, शंकर शेंडे, सुनील गवते, राजू ठवकर उपस्थित होते.