शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

संयम, सेवा, साहस, समता यातच मनुष्याचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:08 IST

- आचार्यश्री महाश्रमण : हेडगेवार स्मृती मंदिरला दिली भेट लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनुष्य जन्म मिळणे कठीण आहे ...

- आचार्यश्री महाश्रमण : हेडगेवार स्मृती मंदिरला दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनुष्य जन्म मिळणे कठीण आहे आणि त्यानंतर मुक्तीची आकांक्षा आणि त्यातही संतांचे सानिध्य अत्यंत कठीण आहे. हे जीवन सुलभतेने मिळाले आहे आणि या जीवनाला यशस्वी करणे, आपले कर्तव्य आहे. प्रारब्धातील पुरुषार्थाने सुलभता मिळाली आहे तर यशस्वी कसे बनावे, या प्रश्नाचे उत्तर संयम, सेवा, साहस आणि समतेत दडले असल्याची भावना अहिंसा यात्रेचे प्रणेता तेरापंथ समाजाचे आचार्यश्री महाश्रमणजी यांनी व्यक्त केली.

रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात आचार्यश्री यांनी आज मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित होते. आपल्याला संयम साधना करावी लागले. गृहस्थ जीवनातही ही साधना महत्त्वाची आहे. आपले इंद्रिय, मन, वाणीवर संयम असावे. कोणी टीका करत असेल तर चांगल्या कार्याने त्याचे उत्तर द्या. जो व्यक्ती दुसऱ्यांसाठी कार्य करतो, तो कार्यकर्ता असतो. संघटनेत शक्ती आहे. संघटनेप्रति निष्ठावान राहा आणि संघटनेची अवहेलना करू नका, असे आचार्यश्री यावेळी म्हणाले.

आयुष्यात साधारण गोष्टींपासून भयभीत होऊ नका, दृढ साहस जपा. समतेलाच धर्म म्हटले गेले आहे. वर्तमान जीवन म्हणजे सर्वस्व नव्हे. आगामी आयुष्यही उत्तम व्हावे, यासाठी प्रयत्न करा. आत्मचेतनेच्या निर्मलतेसाठीही समता महत्त्वाची असते, असे आचार्यश्री म्हणाले. तत्पूर्वी, मुनिश्री कुमार श्रमणजी यांनी तेरापंथ समाजाची विस्तृत माहिती दिली. श्री जैन श्वेतांबर तेरापंथाची स्थापना आचार्यश्री भिक्षू यांनी २६० वर्षांपूर्वी केली होती. हा समाज एक आचार्य, एक विधानाच्या परंपरेवर आधारित आहे. आचार्यश्री महाश्रमणजी ११वे आचार्यश्री आहेत. त्यांनी अहिंसा यात्रेची माहितीही यावेळी दिली.

-------------

अंतर्मनात सुख शोधावे - भागवत

तेरापंथ आचार्यांशी भेट घेणे, ही एक परंपराच झाली आहे. समाजाच्या भौतिक जीवनाचा विचार संघ करतो. देशात भौतिक विचारसुद्धा आध्यात्मिक आधारावरच केले जाते. सुख बाहेर नाही तर अंतर्मनात आहे, हे समजणारा भारत एकमात्र देश असल्याची भावना यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली. चराचर विश्व करारावर नव्हे तर संबंधाच्या आधारावर चालते ही शिकवण आपल्या पूर्वजांनी दिली आहे. दर्शन, पूजन, धर्म भिन्न असू शकतात. परंतु, आपली संस्कृती एक आहे. तेरापंथ आणि संघाच्या अनुशासनात अनेक समानता असल्याचे भागवत म्हणाले. यावेळी भागवत यांनी आचार्यश्री यांना स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.

..........