शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

भाजपविरोधातील आघाडीसाठी ममतांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूलसमोर भाजपने मोठे आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूलसमोर भाजपने मोठे आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधातील पक्षांच्या १५ महत्त्वाच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. भाजपकडून लोकशाहीवर प्रहार होत असल्याचा आरोप करत सर्वांनी त्याविरोधात एकजूट दाखविली पाहिजे, असे आवाहन केले आहे. ममतांकडून देशपातळीवर भाजपविरोधात आघाडीसाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना लिहिलेल्या तीन पानी पत्रात भाजप व केंद्र शासनाकडून लोकशाही व घटनात्मक संघराज्य प्रणालीवर हल्ला, यावर भर दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुकचे एमके स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. भाजपाकडून ज्या पद्धतीचा कारभार सुरू आहे, तो चिंतेत टाकणारा आहे. लोकशाहीवर जो हल्ला होत आहे, त्यामुळेच मी सर्वांना पत्र लिहित आहे. राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र (संशोधन) विधेयक-२०२१ चा त्यांनी यात दाखलादेखील दिला आहे. भाजपचे शासन नसलेल्या राज्यांमध्ये सीबीआय, ईडी यासारख्या केंद्रीय तपास संस्थांचा उपयोग करून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यांना आवश्यक तो निधी पुरविला जात नाही. देशात एकाच पक्षाचा प्रभाव असावा, यादृष्टीने भाजपकडून पावले टाकण्यात येत आहेत. कधी नव्हे ते सत्ताधारी व विरोधकांमधील संबंध अतिशय खराब झाले आहेत. सर्वांनी भाजपविरोधात एकत्रित येत लोकशाहीला वाचविण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. आपल्या एकतेतूनच आपण विजय मिळवू शकतो, असे आवाहन ममता यांनी या पत्रातून केले आहे.