शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

भाजपविरोधातील आघाडीसाठी ममतांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूलसमोर भाजपने मोठे आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूलसमोर भाजपने मोठे आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधातील पक्षांच्या १५ महत्त्वाच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. भाजपकडून लोकशाहीवर प्रहार होत असल्याचा आरोप करत सर्वांनी त्याविरोधात एकजूट दाखविली पाहिजे, असे आवाहन केले आहे. ममतांकडून देशपातळीवर भाजपविरोधात आघाडीसाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना लिहिलेल्या तीन पानी पत्रात भाजप व केंद्र शासनाकडून लोकशाही व घटनात्मक संघराज्य प्रणालीवर हल्ला, यावर भर दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुकचे एमके स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. भाजपाकडून ज्या पद्धतीचा कारभार सुरू आहे, तो चिंतेत टाकणारा आहे. लोकशाहीवर जो हल्ला होत आहे, त्यामुळेच मी सर्वांना पत्र लिहित आहे. राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र (संशोधन) विधेयक-२०२१ चा त्यांनी यात दाखलादेखील दिला आहे. भाजपचे शासन नसलेल्या राज्यांमध्ये सीबीआय, ईडी यासारख्या केंद्रीय तपास संस्थांचा उपयोग करून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यांना आवश्यक तो निधी पुरविला जात नाही. देशात एकाच पक्षाचा प्रभाव असावा, यादृष्टीने भाजपकडून पावले टाकण्यात येत आहेत. कधी नव्हे ते सत्ताधारी व विरोधकांमधील संबंध अतिशय खराब झाले आहेत. सर्वांनी भाजपविरोधात एकत्रित येत लोकशाहीला वाचविण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. आपल्या एकतेतूनच आपण विजय मिळवू शकतो, असे आवाहन ममता यांनी या पत्रातून केले आहे.