शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

जग पादाक्रांत करण्यासाठी पायीवारी

By admin | Updated: April 13, 2016 03:07 IST

काही लोक असतातच ध्येयवेडे. आपले ध्येय गाठण्यासाठी ते कुठल्याही संकटाचा सामना करायलाही तयार असतात.

पर्यावरण व विश्वशांतीचा देतात संदेश : तीन तरुण नागपुरात दाखलनागपूर : काही लोक असतातच ध्येयवेडे. आपले ध्येय गाठण्यासाठी ते कुठल्याही संकटाचा सामना करायलाही तयार असतात. त्यांचे ध्येय मात्र निस्वार्थी. त्यांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश द्यायचा आहे. जनजागृतीसाठी त्यांनी मार्ग स्वीकारला तो पायी चालण्याचा. या ध्येयासाठी त्यांनी एक-दोन नव्हे तर ११ देश आतापर्यंत पादाक्रांत केले. अवधबिहारी लाल, जितेंद्र प्रताप व महेंद्र प्रताप असे या तीन ध्येयवेड्या तरुणांची नावं. आपल्या पायी यात्रेदरम्यान मंगळवारी हे तिघेही नागपूरला पोहचले. भारतच नाही तर संपूर्ण जगापुढे पर्यावरणाची समस्या आज मोठे आव्हान ठरत आहे. प्रदूषणामुळे आपल्या धरेचे पर्यावरण धोक्यात आले आहे. मात्र तरीही आपण जागायला तयार नाही. साधी भाजी घ्यायला जायचे असेल तरी आपल्याला वाहनाची आवश्यकता पडते. अशावेळी पर्यावरणाबाबत जनजागृतीचा संदेश द्यायचा असेल तर प्रदूषणमुक्त साधनाचा वापर करावा, असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी थेट पायीवारी करण्याचा निश्चय केला. हा निश्चय त्यांनी प्रत्यक्षात कृतीतही आणला. भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतचा प्रदेश त्यांनी पायीच पादाक्रांत केला. एवढेच काय तर बांगलादेश, भूतान, तिबेट, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, बर्मा, थायलंड आणि चीन पर्यंत त्यांनी मजल मारली. पर्यावरण, विश्वशांती, कन्या भ्रूणहत्या रोखण्याचा संदेश ते आपल्या यात्रेदरम्यान देत आहेत. हे तिन्ही तरुण उत्तर प्रदेशचे आहेत. त्यांच्या टीममध्ये २० सदस्य असल्याचे महेंद्र प्रताप याने सांगितले. ते वेगवेगळा प्रवास करतात. ४९ वर्षाचे अवधबिहारी हे त्यांच्या टीमचे लीडर आहेत. स्वत: महेंद्र प्रताप १२ वर्षाचा असताना एका कपड्यावर तो या मोहिमसाठी घराबाहेर पडला. आश्चर्य म्हणजे गेल्या २० वर्षापासून तो घरीही परतला नाही. त्याच्यासारखे इतरही आहेत. एक सदस्य तर या मोहिमेत शहीदही झाला. प्रवासात अनेक चित्तथरारक आणि जीवघेणे अनुभव त्यांना आले. मात्र त्यांचा प्रवास थांबला नाही. आता रस्त्यांची भीती त्यांना वाटत नाही. कारण अनेक प्रसंग त्यांनी भोगले आहेत. प्रवास करताना ते प्रत्येक गावात, शहरात जातात. तेथील पोलीस अधिकाऱ्यांशी भेटतात. त्यानंतर शाळा महाविद्यालयात पर्यावरणाविषयी मार्गदर्शन करतात व पुन्हा पुढच्या प्रवासाला लागतात. पोलिसांकडून त्यांना हवी ती मदत केली जाते. या मोहिमेची गिनीज बुक आॅॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दोनवेळा तर लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये पाचवेळा नोंद करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)