शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जग पादाक्रांत करण्यासाठी पायीवारी

By admin | Updated: April 13, 2016 03:07 IST

काही लोक असतातच ध्येयवेडे. आपले ध्येय गाठण्यासाठी ते कुठल्याही संकटाचा सामना करायलाही तयार असतात.

पर्यावरण व विश्वशांतीचा देतात संदेश : तीन तरुण नागपुरात दाखलनागपूर : काही लोक असतातच ध्येयवेडे. आपले ध्येय गाठण्यासाठी ते कुठल्याही संकटाचा सामना करायलाही तयार असतात. त्यांचे ध्येय मात्र निस्वार्थी. त्यांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश द्यायचा आहे. जनजागृतीसाठी त्यांनी मार्ग स्वीकारला तो पायी चालण्याचा. या ध्येयासाठी त्यांनी एक-दोन नव्हे तर ११ देश आतापर्यंत पादाक्रांत केले. अवधबिहारी लाल, जितेंद्र प्रताप व महेंद्र प्रताप असे या तीन ध्येयवेड्या तरुणांची नावं. आपल्या पायी यात्रेदरम्यान मंगळवारी हे तिघेही नागपूरला पोहचले. भारतच नाही तर संपूर्ण जगापुढे पर्यावरणाची समस्या आज मोठे आव्हान ठरत आहे. प्रदूषणामुळे आपल्या धरेचे पर्यावरण धोक्यात आले आहे. मात्र तरीही आपण जागायला तयार नाही. साधी भाजी घ्यायला जायचे असेल तरी आपल्याला वाहनाची आवश्यकता पडते. अशावेळी पर्यावरणाबाबत जनजागृतीचा संदेश द्यायचा असेल तर प्रदूषणमुक्त साधनाचा वापर करावा, असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी थेट पायीवारी करण्याचा निश्चय केला. हा निश्चय त्यांनी प्रत्यक्षात कृतीतही आणला. भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतचा प्रदेश त्यांनी पायीच पादाक्रांत केला. एवढेच काय तर बांगलादेश, भूतान, तिबेट, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, बर्मा, थायलंड आणि चीन पर्यंत त्यांनी मजल मारली. पर्यावरण, विश्वशांती, कन्या भ्रूणहत्या रोखण्याचा संदेश ते आपल्या यात्रेदरम्यान देत आहेत. हे तिन्ही तरुण उत्तर प्रदेशचे आहेत. त्यांच्या टीममध्ये २० सदस्य असल्याचे महेंद्र प्रताप याने सांगितले. ते वेगवेगळा प्रवास करतात. ४९ वर्षाचे अवधबिहारी हे त्यांच्या टीमचे लीडर आहेत. स्वत: महेंद्र प्रताप १२ वर्षाचा असताना एका कपड्यावर तो या मोहिमसाठी घराबाहेर पडला. आश्चर्य म्हणजे गेल्या २० वर्षापासून तो घरीही परतला नाही. त्याच्यासारखे इतरही आहेत. एक सदस्य तर या मोहिमेत शहीदही झाला. प्रवासात अनेक चित्तथरारक आणि जीवघेणे अनुभव त्यांना आले. मात्र त्यांचा प्रवास थांबला नाही. आता रस्त्यांची भीती त्यांना वाटत नाही. कारण अनेक प्रसंग त्यांनी भोगले आहेत. प्रवास करताना ते प्रत्येक गावात, शहरात जातात. तेथील पोलीस अधिकाऱ्यांशी भेटतात. त्यानंतर शाळा महाविद्यालयात पर्यावरणाविषयी मार्गदर्शन करतात व पुन्हा पुढच्या प्रवासाला लागतात. पोलिसांकडून त्यांना हवी ती मदत केली जाते. या मोहिमेची गिनीज बुक आॅॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दोनवेळा तर लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये पाचवेळा नोंद करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)