शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
6
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
7
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
8
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
9
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
10
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
11
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
12
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
13
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
14
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
15
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
16
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
17
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
18
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
19
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
20
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

जग पादाक्रांत करण्यासाठी पायीवारी

By admin | Updated: April 13, 2016 03:07 IST

काही लोक असतातच ध्येयवेडे. आपले ध्येय गाठण्यासाठी ते कुठल्याही संकटाचा सामना करायलाही तयार असतात.

पर्यावरण व विश्वशांतीचा देतात संदेश : तीन तरुण नागपुरात दाखलनागपूर : काही लोक असतातच ध्येयवेडे. आपले ध्येय गाठण्यासाठी ते कुठल्याही संकटाचा सामना करायलाही तयार असतात. त्यांचे ध्येय मात्र निस्वार्थी. त्यांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश द्यायचा आहे. जनजागृतीसाठी त्यांनी मार्ग स्वीकारला तो पायी चालण्याचा. या ध्येयासाठी त्यांनी एक-दोन नव्हे तर ११ देश आतापर्यंत पादाक्रांत केले. अवधबिहारी लाल, जितेंद्र प्रताप व महेंद्र प्रताप असे या तीन ध्येयवेड्या तरुणांची नावं. आपल्या पायी यात्रेदरम्यान मंगळवारी हे तिघेही नागपूरला पोहचले. भारतच नाही तर संपूर्ण जगापुढे पर्यावरणाची समस्या आज मोठे आव्हान ठरत आहे. प्रदूषणामुळे आपल्या धरेचे पर्यावरण धोक्यात आले आहे. मात्र तरीही आपण जागायला तयार नाही. साधी भाजी घ्यायला जायचे असेल तरी आपल्याला वाहनाची आवश्यकता पडते. अशावेळी पर्यावरणाबाबत जनजागृतीचा संदेश द्यायचा असेल तर प्रदूषणमुक्त साधनाचा वापर करावा, असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी थेट पायीवारी करण्याचा निश्चय केला. हा निश्चय त्यांनी प्रत्यक्षात कृतीतही आणला. भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतचा प्रदेश त्यांनी पायीच पादाक्रांत केला. एवढेच काय तर बांगलादेश, भूतान, तिबेट, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, बर्मा, थायलंड आणि चीन पर्यंत त्यांनी मजल मारली. पर्यावरण, विश्वशांती, कन्या भ्रूणहत्या रोखण्याचा संदेश ते आपल्या यात्रेदरम्यान देत आहेत. हे तिन्ही तरुण उत्तर प्रदेशचे आहेत. त्यांच्या टीममध्ये २० सदस्य असल्याचे महेंद्र प्रताप याने सांगितले. ते वेगवेगळा प्रवास करतात. ४९ वर्षाचे अवधबिहारी हे त्यांच्या टीमचे लीडर आहेत. स्वत: महेंद्र प्रताप १२ वर्षाचा असताना एका कपड्यावर तो या मोहिमसाठी घराबाहेर पडला. आश्चर्य म्हणजे गेल्या २० वर्षापासून तो घरीही परतला नाही. त्याच्यासारखे इतरही आहेत. एक सदस्य तर या मोहिमेत शहीदही झाला. प्रवासात अनेक चित्तथरारक आणि जीवघेणे अनुभव त्यांना आले. मात्र त्यांचा प्रवास थांबला नाही. आता रस्त्यांची भीती त्यांना वाटत नाही. कारण अनेक प्रसंग त्यांनी भोगले आहेत. प्रवास करताना ते प्रत्येक गावात, शहरात जातात. तेथील पोलीस अधिकाऱ्यांशी भेटतात. त्यानंतर शाळा महाविद्यालयात पर्यावरणाविषयी मार्गदर्शन करतात व पुन्हा पुढच्या प्रवासाला लागतात. पोलिसांकडून त्यांना हवी ती मदत केली जाते. या मोहिमेची गिनीज बुक आॅॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दोनवेळा तर लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये पाचवेळा नोंद करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)