शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

लॉ कॉलेजच्या ४० जागा कमी

By admin | Updated: May 24, 2017 02:33 IST

विधी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना आता आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे.

प्रवेशापूर्वीच सरकारचा झटका : विद्यापीठ होणार आशिष दुबे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना आता आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे. राज्य सरकारने विधी महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेत कपात केली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार सर्व विधी महाविद्यालयांना समान ६०-६० जागांवर प्रवेश देता येईल. याहून अधिक प्रवेश देता येणार नाही. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह विभागातील सर्व विधी महाविद्यालयांना मोठा झटका लागला आहे. सद्यस्थितीत विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात एलएलबी (तीन वर्षीय अभ्यासक्रम) प्रथम वर्षाच्या ८० जागा आहेत. एवढ्याच ८० जागा एलएलबी (पंचवार्षिक अभ्यासक्रम) यासाठी आहेत. सरकारच्या निर्णयामुळे या दोन्ही अभ्यासक्रमांची क्षमता आता कमी होऊन प्रत्येकी ६० जागांची झाली आहे. महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (एमएनएलयु) मध्येही आता प्रवेश क्षमता कमी होऊन ६० होईल. या दोन प्रसिद्ध संस्थांशिवाय अन्य खासगी विधी महाविद्यालयांतील ही प्रवेश क्षमता ८० वरून ६० होणार आहे. विधी अभ्यासक्रमाच्या जागा कमी होण्यामागे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काही ठोस कारण दिलेले नाही. विभागाच्या मते शैक्षणिक सत्र २०१६-१७ च्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही महाविद्यालयांनी प्रवेश क्षमता ८० तर काहींनी ६० असल्याचे सांगितले होते. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या वेळी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर्षी तसे होऊ नये यासाठी सर्वच विधी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ६० करण्यात आली आहे. याबाबत महाविद्यालयांनी मात्र वेगळीच कारणमीमांसा केली आहे. कॉलेजचे म्हणणे आहे की, बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने जागा कमी केल्या आहेत. बार कौन्सिलच्या नियमानुसार विधी अभ्यासक्रम हा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या श्रेणीत मोडतो. त्यामुळे प्रवेश क्षमता ६० पेक्षा जास्त असू नये. यामुळेच जागा कमी करण्यात आल्या आहेत. असे आहे खरे कारण गेल्यावर्षी प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही कॉलेज वगळले तर उर्वरितमध्ये जागा रिक्त राहिल्या होत्या. ज्यामुळे राज्य सरकारतर्फे सीईटीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावेळी तसे होऊ नये म्हणून प्रवेश क्षमता कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा या क्षेत्रातील सूत्रांनी केला आहे.