शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

लॉ कॉलेजच्या ४० जागा कमी

By admin | Updated: May 24, 2017 02:33 IST

विधी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना आता आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे.

प्रवेशापूर्वीच सरकारचा झटका : विद्यापीठ होणार आशिष दुबे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना आता आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे. राज्य सरकारने विधी महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेत कपात केली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार सर्व विधी महाविद्यालयांना समान ६०-६० जागांवर प्रवेश देता येईल. याहून अधिक प्रवेश देता येणार नाही. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह विभागातील सर्व विधी महाविद्यालयांना मोठा झटका लागला आहे. सद्यस्थितीत विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात एलएलबी (तीन वर्षीय अभ्यासक्रम) प्रथम वर्षाच्या ८० जागा आहेत. एवढ्याच ८० जागा एलएलबी (पंचवार्षिक अभ्यासक्रम) यासाठी आहेत. सरकारच्या निर्णयामुळे या दोन्ही अभ्यासक्रमांची क्षमता आता कमी होऊन प्रत्येकी ६० जागांची झाली आहे. महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (एमएनएलयु) मध्येही आता प्रवेश क्षमता कमी होऊन ६० होईल. या दोन प्रसिद्ध संस्थांशिवाय अन्य खासगी विधी महाविद्यालयांतील ही प्रवेश क्षमता ८० वरून ६० होणार आहे. विधी अभ्यासक्रमाच्या जागा कमी होण्यामागे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काही ठोस कारण दिलेले नाही. विभागाच्या मते शैक्षणिक सत्र २०१६-१७ च्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही महाविद्यालयांनी प्रवेश क्षमता ८० तर काहींनी ६० असल्याचे सांगितले होते. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या वेळी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर्षी तसे होऊ नये यासाठी सर्वच विधी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ६० करण्यात आली आहे. याबाबत महाविद्यालयांनी मात्र वेगळीच कारणमीमांसा केली आहे. कॉलेजचे म्हणणे आहे की, बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने जागा कमी केल्या आहेत. बार कौन्सिलच्या नियमानुसार विधी अभ्यासक्रम हा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या श्रेणीत मोडतो. त्यामुळे प्रवेश क्षमता ६० पेक्षा जास्त असू नये. यामुळेच जागा कमी करण्यात आल्या आहेत. असे आहे खरे कारण गेल्यावर्षी प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही कॉलेज वगळले तर उर्वरितमध्ये जागा रिक्त राहिल्या होत्या. ज्यामुळे राज्य सरकारतर्फे सीईटीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावेळी तसे होऊ नये म्हणून प्रवेश क्षमता कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा या क्षेत्रातील सूत्रांनी केला आहे.