शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

तक्रारी भरपूर पण कार्यवाही शून्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:08 IST

भिवापूर/ नांद : नांद येथे २०१७-१८ मध्ये १ कोटी ६३ लाख रुपयांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेली मुख्यमंत्री राष्ट्रीय पेयजल ...

भिवापूर/ नांद : नांद येथे २०१७-१८ मध्ये १ कोटी ६३ लाख रुपयांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेली मुख्यमंत्री राष्ट्रीय पेयजल योजना भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जामुळे पांढरा हत्ती ठरली आहे. याबाबत अनेकदा तक्रारी केल्यानंतरही प्रशासनाकडून कार्यवाही मात्र शून्य आहे. त्यामुळे योजनेचे पाणी कुठे मुरत आहे, हा प्रश्नच आहे. निकृष्ट दर्जाच्या या योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झालेले आहे. मात्र, उर्वरित शिल्लक कामे पूर्ण करून ही योजना ग्रामपंचायतीच्या स्वाधीन करण्यात आलेली नाही. कंत्राटदाराने योजनेची विद्युत देयके न भरल्यामुळे महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला. शासनाने एवढा मोठा निधी खर्च केल्यानंतर नांदवासीयांना या योजनेतून पाणीच मिळू नये, ही शोकांतिका आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराने माखलेली पेयजल योजना संबंधित कंत्राटदार व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध नांदवासीयांत असंतोष खदखदत आहे. सरपंच तुळशीदास चुटे यांनी योजनेच्या कामाची चौकशी करून कारवाई करण्याबाबत आ. राजू पारवे यांच्यासह मुख्यमंत्री, पालकमंत्री, मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यात. मात्र, चौकशी करून कारवाई करण्याचे औदार्य प्रशासनाने अद्यापही दाखविले नाही. त्यामुळे नांद येथील मुख्यमंत्री राष्ट्रीय पेयजल योजनेचे प्रकरण प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे, अशी मागणी उपसरपंच भास्कर डेकाटे, रवी आंबुलकर, सुरेश वाढई, मोरेश्वर चुटे, मधू दोडके, रमेश बांगरी, मोहन धारणे आदींनी केली आहे.

--

अथक प्रयत्न करून ही योजना आम्ही मंजूर करून घेतली. काही दिवस योजनेचे काम व्यवस्थित होते. त्यानंतर अधिकारी बदलले आणि योजनेचे काम रेंगाळत गेले. भ्रष्टाचाराने ही योजना पूर्ण खाऊन टाकली आहे. तक्रारीवर अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. आज येतो, उद्या येतो, असे सांगण्यात वर्ष निघून गेले. मात्र, चौकशी व कारवाई यापैकी काहीच झाले नाही.

-डिमेश तिमांडे, माजी सदस्य, पंचायत समिती, भिवापूर

--

ज्या पद्धतीने या योजनेचे काम झाले, ते संपूर्ण निकृष्ट आहे. टाकीमध्ये पाणी चढण्यापूर्वीच लिकेजमधून वाहून जाते. पाइपलाइन योग्य खोलीत टाकण्यात आलेली नाही. एकंदरीत या योजनेचे फलित शून्य आहे. आम्ही केलेल्या तक्रारीची दखल प्रशासन का घेत नाही?

-प्रमोद बारेकर, अध्यक्ष, तंटामुक्त समिती, नांद

--

योजनेचे काम व्यवस्थित झाले आहे. नांदवासीयांना वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा झाला. मात्र, त्यानंतर ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्याची विद्युत देयके न भरल्याने महावितरणने विद्युत पुरवठा बंद केला. योजनेत कुठलीच अडचण नाही. विद्युत बिल भरल्यास योजना सुरू होईल.

-संजीव हेमके, उपविभागीय अभियंता, जि.प. पाणीपुरवठा विभाग, भिवापूर

===Photopath===

190521\1c51ffe.jpg

===Caption===

१२ मे रोजी लोकमतने प्रकाशीत केलेले वृत्त