शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:40 IST

देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची सूचना चांगली आहे. परंतु प्रत्यक्षात असे करणे शक्य नाही, असे भारताचे माजी मुख्य निवडणुक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देमाजी मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी यांचे रोखठोक मत

आशिष दुबे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची सूचना चांगली आहे. परंतु प्रत्यक्षात असे करणे शक्य नाही, असे भारताचे माजी मुख्य निवडणुक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी स्पष्ट केले. सध्याचे मुख्य निवडणुक आयुक्त ओ. पी. रावत यांचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. काही दिवसांपूर्वी रावत यांनी सप्टेंबर २०१८ पर्यंत दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यासाठी निवडणूक आयोग सक्षम असल्याचे सांगितले होते.शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मौलाना अब्दुल करीम पारेख यांच्या स्मृतिनिनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत सहभागी होण्यासाठी आलेल्या डॉ. कुरेशी यांनी ‘लोकमत’शी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारलाही ही वास्तविकता माहीत आहे. त्यामुळे सरकारकडून कोणतेच ठोस वक्तव्य करण्यात आलेले नाही. दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यासाठी ४० लाख ईव्हीएम मशीनची गरज असून सध्या सरकारकडे २० लाख ईव्हीएम मशीनच आहेत. दुसरी बाब अशी की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे मुद्दे वेगवेगळे असतात. तिसरे कारण म्हणजे जर निवडणुकीच्या काही महिन्यानंतर लोकसभा भंग झाल्यास इतर राज्यांच्या विधानसभेचे काय होईल. जर एखाद्या राज्याची विधानसभा बरखास्त झाल्यास त्या स्थितीत लोकसभेचा कार्यकाळ संपण्यापर्यंत वाट पाहावी लागेल. असे अनेक मुद्दे असल्यामुळे दोन्ही निवडणुका

होऊ शकते निवडणूक खर्च, वेळेची बचतडॉ. कुरेशी यांनी सांगितले की, लोकसभा व विधानसभा एकत्र घेण्यामागे निवडणुक प्रक्रियेत खूप वेळ लागतो. खूप पैसा खर्च होतो. दोन्ही निवडणुका एकत्र झाल्यास वेळ आणि पैसा वाचेल अशी कारणे देण्यात येत आहेत. त्यासाठी दोन पावले उचलावे लागतील. एक म्हणजे सरकारने उमेदवारांप्रमाणे निवडणुक लढणाºया पार्टीच्या खर्चाची सीमा ठरवावी. दुसरे म्हणजे निवडणुकी दरम्यान सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी अर्ध सैनिक दलाची संख्या वाढवावी. शांततेने निवडणुका घेण्यासाठी आयोगाला अर्ध सैनिक दलाची मदत घेण्याची वेळ येऊ शकते. सरकारतर्फे जर मतदान केंद्राच्या हिशेबाने फोर्स मिळाल्यास निवडणुकीसाठी कमी वेळ लागेल.ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह लावणे अयोग्यडॉ. कुरेशी यांनी सांगितले की, ईव्हीएम मशीनच्या वापरावर लावण्यात येणारे आरोप बिनबुडाचे आहेत. ईव्हीएम मशीन सुरक्षित आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणे शक्य नाही.