शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:40 IST

देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची सूचना चांगली आहे. परंतु प्रत्यक्षात असे करणे शक्य नाही, असे भारताचे माजी मुख्य निवडणुक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देमाजी मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी यांचे रोखठोक मत

आशिष दुबे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची सूचना चांगली आहे. परंतु प्रत्यक्षात असे करणे शक्य नाही, असे भारताचे माजी मुख्य निवडणुक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी स्पष्ट केले. सध्याचे मुख्य निवडणुक आयुक्त ओ. पी. रावत यांचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. काही दिवसांपूर्वी रावत यांनी सप्टेंबर २०१८ पर्यंत दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यासाठी निवडणूक आयोग सक्षम असल्याचे सांगितले होते.शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मौलाना अब्दुल करीम पारेख यांच्या स्मृतिनिनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत सहभागी होण्यासाठी आलेल्या डॉ. कुरेशी यांनी ‘लोकमत’शी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारलाही ही वास्तविकता माहीत आहे. त्यामुळे सरकारकडून कोणतेच ठोस वक्तव्य करण्यात आलेले नाही. दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यासाठी ४० लाख ईव्हीएम मशीनची गरज असून सध्या सरकारकडे २० लाख ईव्हीएम मशीनच आहेत. दुसरी बाब अशी की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे मुद्दे वेगवेगळे असतात. तिसरे कारण म्हणजे जर निवडणुकीच्या काही महिन्यानंतर लोकसभा भंग झाल्यास इतर राज्यांच्या विधानसभेचे काय होईल. जर एखाद्या राज्याची विधानसभा बरखास्त झाल्यास त्या स्थितीत लोकसभेचा कार्यकाळ संपण्यापर्यंत वाट पाहावी लागेल. असे अनेक मुद्दे असल्यामुळे दोन्ही निवडणुका

होऊ शकते निवडणूक खर्च, वेळेची बचतडॉ. कुरेशी यांनी सांगितले की, लोकसभा व विधानसभा एकत्र घेण्यामागे निवडणुक प्रक्रियेत खूप वेळ लागतो. खूप पैसा खर्च होतो. दोन्ही निवडणुका एकत्र झाल्यास वेळ आणि पैसा वाचेल अशी कारणे देण्यात येत आहेत. त्यासाठी दोन पावले उचलावे लागतील. एक म्हणजे सरकारने उमेदवारांप्रमाणे निवडणुक लढणाºया पार्टीच्या खर्चाची सीमा ठरवावी. दुसरे म्हणजे निवडणुकी दरम्यान सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी अर्ध सैनिक दलाची संख्या वाढवावी. शांततेने निवडणुका घेण्यासाठी आयोगाला अर्ध सैनिक दलाची मदत घेण्याची वेळ येऊ शकते. सरकारतर्फे जर मतदान केंद्राच्या हिशेबाने फोर्स मिळाल्यास निवडणुकीसाठी कमी वेळ लागेल.ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह लावणे अयोग्यडॉ. कुरेशी यांनी सांगितले की, ईव्हीएम मशीनच्या वापरावर लावण्यात येणारे आरोप बिनबुडाचे आहेत. ईव्हीएम मशीन सुरक्षित आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणे शक्य नाही.