शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:40 IST

देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची सूचना चांगली आहे. परंतु प्रत्यक्षात असे करणे शक्य नाही, असे भारताचे माजी मुख्य निवडणुक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देमाजी मुख्य निवडणूक आयुक्त कुरेशी यांचे रोखठोक मत

आशिष दुबे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची सूचना चांगली आहे. परंतु प्रत्यक्षात असे करणे शक्य नाही, असे भारताचे माजी मुख्य निवडणुक आयुक्त डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी स्पष्ट केले. सध्याचे मुख्य निवडणुक आयुक्त ओ. पी. रावत यांचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. काही दिवसांपूर्वी रावत यांनी सप्टेंबर २०१८ पर्यंत दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यासाठी निवडणूक आयोग सक्षम असल्याचे सांगितले होते.शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मौलाना अब्दुल करीम पारेख यांच्या स्मृतिनिनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत सहभागी होण्यासाठी आलेल्या डॉ. कुरेशी यांनी ‘लोकमत’शी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारलाही ही वास्तविकता माहीत आहे. त्यामुळे सरकारकडून कोणतेच ठोस वक्तव्य करण्यात आलेले नाही. दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यासाठी ४० लाख ईव्हीएम मशीनची गरज असून सध्या सरकारकडे २० लाख ईव्हीएम मशीनच आहेत. दुसरी बाब अशी की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे मुद्दे वेगवेगळे असतात. तिसरे कारण म्हणजे जर निवडणुकीच्या काही महिन्यानंतर लोकसभा भंग झाल्यास इतर राज्यांच्या विधानसभेचे काय होईल. जर एखाद्या राज्याची विधानसभा बरखास्त झाल्यास त्या स्थितीत लोकसभेचा कार्यकाळ संपण्यापर्यंत वाट पाहावी लागेल. असे अनेक मुद्दे असल्यामुळे दोन्ही निवडणुका

होऊ शकते निवडणूक खर्च, वेळेची बचतडॉ. कुरेशी यांनी सांगितले की, लोकसभा व विधानसभा एकत्र घेण्यामागे निवडणुक प्रक्रियेत खूप वेळ लागतो. खूप पैसा खर्च होतो. दोन्ही निवडणुका एकत्र झाल्यास वेळ आणि पैसा वाचेल अशी कारणे देण्यात येत आहेत. त्यासाठी दोन पावले उचलावे लागतील. एक म्हणजे सरकारने उमेदवारांप्रमाणे निवडणुक लढणाºया पार्टीच्या खर्चाची सीमा ठरवावी. दुसरे म्हणजे निवडणुकी दरम्यान सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी अर्ध सैनिक दलाची संख्या वाढवावी. शांततेने निवडणुका घेण्यासाठी आयोगाला अर्ध सैनिक दलाची मदत घेण्याची वेळ येऊ शकते. सरकारतर्फे जर मतदान केंद्राच्या हिशेबाने फोर्स मिळाल्यास निवडणुकीसाठी कमी वेळ लागेल.ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह लावणे अयोग्यडॉ. कुरेशी यांनी सांगितले की, ईव्हीएम मशीनच्या वापरावर लावण्यात येणारे आरोप बिनबुडाचे आहेत. ईव्हीएम मशीन सुरक्षित आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणे शक्य नाही.