शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

मिरची कटाई केंद्रांना लॉकडाऊनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:08 IST

शरद मिरे भिवापूर : शंभर, दोनशे नव्हे, तर तब्बल चार हजारांवर मजुरांच्या हाताला काम देणारे मिरची कटाई केंद्र लॉकडाऊनमुळे ...

शरद मिरे

भिवापूर : शंभर, दोनशे नव्हे, तर तब्बल चार हजारांवर मजुरांच्या हाताला काम देणारे मिरची कटाई केंद्र लॉकडाऊनमुळे गत दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे एरवी मजुरांच्या उपस्थितीने गजबजणारा हा श्रमाचा परिसर आता ओसाड पडलेला आहे. येथे काम करणारे मजूरही कामाअभावी आर्थिक कोंडीत सापडले आहे. लॉकडाऊनचे ‘लॉक’ एकदाचे उघडेल आणि कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न सुटेल याकडे असंख्य मजुरांचे लक्ष लागले आहे. तालुक्यात रोजगाराचे कुठलेही साधन नाही. अशात मिरची कटाई केंद्राच्या माध्यमातूनच चार हजारांवर गोर, गरीब, गरजू, निराधार मजुरांच्या हाताला काम मिळते. मिळणाऱ्या मजुरीतूनच कुटुंबाचे पालनपोषन, आरोग्य व मुलांचे शिक्षण, आदी समस्यांवर हे मजूर मात करतात. शहर व आजूबाजूच्या परिसरात जवळपास दहावर मिरची कटाई केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर पाचशे ते हजार मजूर काम करतात. अशा प्रकारे मिरची कटाईच्या माध्यमातून शहरातील अंदाजे चार हजारांवर मजुरांच्या हाताला काम मिळते. गतवर्षी लॉकडाऊनमुळे जवळपास पाच महिने हे मिरची कटाई केंद्र बंद होते. यावर्षी पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. कटाई केंद्र पुन्हा बंद झाले आहे. अशात हाताला काम आणि खिशात दाम नसताना जगायचे कसे असा प्रश्न मजुरांसमोर पडला आहे.

मदतीचा हात आखूड झाला

गतवर्षी लॉकडाऊनमध्ये मिरची कटाई केंद्र पाच महिने बंद होते. या काळात जीवन जगण्यासाठी मजुरांची धडपड सुरू होती. दरम्यान, विविध पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी मजुरांना मदतीचा हात दिला. अन्नधान्य व किराणा किट त्यांनी वितरित केल्यात. या कठीण काळावर मात केल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली. मजुरांनी नव्या हिंमतीने काम सुरू केले. अशातच पुन्हा दुसरी लाट आली आणि परिस्थिती ‘जैसे थे’ झाली. माञ, यावेळी मदतीचे हात आखूड झाले आहे. गतवर्षी अन्नधान्याचे किट वाटणारे नेतेही यावर्षी गायब झाले आहे. या पडत्या काळात मजुरांना ना शासनाची मदत मिळाली, ना लोकप्रतिनिधींकडून मदतीचा हात मिळाला.

मिरची कटाई केंद्र सुरू करा

गत दोन महिन्यांपासून मिरची कटाई केंद्र बंद असल्यामुळे चार हजारांवर मजुरांसमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने हे रोजगाराचे केंद्र असलेले मिरची कटाई केंद्र तत्काळ सुरू करावे. यादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझर, आदींचे आम्ही काटेकोर पालन करू किंवा किमान पन्नास टक्के मजुरांना तरी येथे काम करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मजुरांनी केली आहे.

--

मिरची कटाई केंद्रावर काम करून आम्ही आपले पोट भरतो. माञ, लॉकडाऊनमुळे गत दोन महिन्यांपासून मिरची कटाई केंद्र बंद आहे. अशात आम्ही जगायचे कसे, या पडतीच्या काळात आम्हा मजुरांना शासनाकडून काहीएक आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे शासनाने आमचे रोजगार केंद्र तत्काळ सुरू करावे.

- आम्रपाली मेश्राम, मिरची कटाई कामगार