शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

मिरची कटाई केंद्रांना लॉकडाऊनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:08 IST

शरद मिरे भिवापूर : शंभर, दोनशे नव्हे, तर तब्बल चार हजारांवर मजुरांच्या हाताला काम देणारे मिरची कटाई केंद्र लॉकडाऊनमुळे ...

शरद मिरे

भिवापूर : शंभर, दोनशे नव्हे, तर तब्बल चार हजारांवर मजुरांच्या हाताला काम देणारे मिरची कटाई केंद्र लॉकडाऊनमुळे गत दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे एरवी मजुरांच्या उपस्थितीने गजबजणारा हा श्रमाचा परिसर आता ओसाड पडलेला आहे. येथे काम करणारे मजूरही कामाअभावी आर्थिक कोंडीत सापडले आहे. लॉकडाऊनचे ‘लॉक’ एकदाचे उघडेल आणि कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न सुटेल याकडे असंख्य मजुरांचे लक्ष लागले आहे. तालुक्यात रोजगाराचे कुठलेही साधन नाही. अशात मिरची कटाई केंद्राच्या माध्यमातूनच चार हजारांवर गोर, गरीब, गरजू, निराधार मजुरांच्या हाताला काम मिळते. मिळणाऱ्या मजुरीतूनच कुटुंबाचे पालनपोषन, आरोग्य व मुलांचे शिक्षण, आदी समस्यांवर हे मजूर मात करतात. शहर व आजूबाजूच्या परिसरात जवळपास दहावर मिरची कटाई केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर पाचशे ते हजार मजूर काम करतात. अशा प्रकारे मिरची कटाईच्या माध्यमातून शहरातील अंदाजे चार हजारांवर मजुरांच्या हाताला काम मिळते. गतवर्षी लॉकडाऊनमुळे जवळपास पाच महिने हे मिरची कटाई केंद्र बंद होते. यावर्षी पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. कटाई केंद्र पुन्हा बंद झाले आहे. अशात हाताला काम आणि खिशात दाम नसताना जगायचे कसे असा प्रश्न मजुरांसमोर पडला आहे.

मदतीचा हात आखूड झाला

गतवर्षी लॉकडाऊनमध्ये मिरची कटाई केंद्र पाच महिने बंद होते. या काळात जीवन जगण्यासाठी मजुरांची धडपड सुरू होती. दरम्यान, विविध पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी मजुरांना मदतीचा हात दिला. अन्नधान्य व किराणा किट त्यांनी वितरित केल्यात. या कठीण काळावर मात केल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली. मजुरांनी नव्या हिंमतीने काम सुरू केले. अशातच पुन्हा दुसरी लाट आली आणि परिस्थिती ‘जैसे थे’ झाली. माञ, यावेळी मदतीचे हात आखूड झाले आहे. गतवर्षी अन्नधान्याचे किट वाटणारे नेतेही यावर्षी गायब झाले आहे. या पडत्या काळात मजुरांना ना शासनाची मदत मिळाली, ना लोकप्रतिनिधींकडून मदतीचा हात मिळाला.

मिरची कटाई केंद्र सुरू करा

गत दोन महिन्यांपासून मिरची कटाई केंद्र बंद असल्यामुळे चार हजारांवर मजुरांसमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने हे रोजगाराचे केंद्र असलेले मिरची कटाई केंद्र तत्काळ सुरू करावे. यादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझर, आदींचे आम्ही काटेकोर पालन करू किंवा किमान पन्नास टक्के मजुरांना तरी येथे काम करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मजुरांनी केली आहे.

--

मिरची कटाई केंद्रावर काम करून आम्ही आपले पोट भरतो. माञ, लॉकडाऊनमुळे गत दोन महिन्यांपासून मिरची कटाई केंद्र बंद आहे. अशात आम्ही जगायचे कसे, या पडतीच्या काळात आम्हा मजुरांना शासनाकडून काहीएक आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे शासनाने आमचे रोजगार केंद्र तत्काळ सुरू करावे.

- आम्रपाली मेश्राम, मिरची कटाई कामगार