शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
3
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
4
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
5
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
6
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
7
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
8
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
9
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
10
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
11
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
12
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
13
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
14
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
15
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
16
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
17
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
18
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
19
"सर, ब्रेकअप झालंय" Gen Z कर्मचाऱ्यानं बॉसला पाठवला ईमेल; लगेच १० दिवसांची सुट्टी मंजूर, कारण..
20
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?

मिरची कटाई केंद्रांना लॉकडाऊनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:08 IST

शरद मिरे भिवापूर : शंभर, दोनशे नव्हे, तर तब्बल चार हजारांवर मजुरांच्या हाताला काम देणारे मिरची कटाई केंद्र लॉकडाऊनमुळे ...

शरद मिरे

भिवापूर : शंभर, दोनशे नव्हे, तर तब्बल चार हजारांवर मजुरांच्या हाताला काम देणारे मिरची कटाई केंद्र लॉकडाऊनमुळे गत दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे एरवी मजुरांच्या उपस्थितीने गजबजणारा हा श्रमाचा परिसर आता ओसाड पडलेला आहे. येथे काम करणारे मजूरही कामाअभावी आर्थिक कोंडीत सापडले आहे. लॉकडाऊनचे ‘लॉक’ एकदाचे उघडेल आणि कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न सुटेल याकडे असंख्य मजुरांचे लक्ष लागले आहे. तालुक्यात रोजगाराचे कुठलेही साधन नाही. अशात मिरची कटाई केंद्राच्या माध्यमातूनच चार हजारांवर गोर, गरीब, गरजू, निराधार मजुरांच्या हाताला काम मिळते. मिळणाऱ्या मजुरीतूनच कुटुंबाचे पालनपोषन, आरोग्य व मुलांचे शिक्षण, आदी समस्यांवर हे मजूर मात करतात. शहर व आजूबाजूच्या परिसरात जवळपास दहावर मिरची कटाई केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर पाचशे ते हजार मजूर काम करतात. अशा प्रकारे मिरची कटाईच्या माध्यमातून शहरातील अंदाजे चार हजारांवर मजुरांच्या हाताला काम मिळते. गतवर्षी लॉकडाऊनमुळे जवळपास पाच महिने हे मिरची कटाई केंद्र बंद होते. यावर्षी पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. कटाई केंद्र पुन्हा बंद झाले आहे. अशात हाताला काम आणि खिशात दाम नसताना जगायचे कसे असा प्रश्न मजुरांसमोर पडला आहे.

मदतीचा हात आखूड झाला

गतवर्षी लॉकडाऊनमध्ये मिरची कटाई केंद्र पाच महिने बंद होते. या काळात जीवन जगण्यासाठी मजुरांची धडपड सुरू होती. दरम्यान, विविध पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी मजुरांना मदतीचा हात दिला. अन्नधान्य व किराणा किट त्यांनी वितरित केल्यात. या कठीण काळावर मात केल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली. मजुरांनी नव्या हिंमतीने काम सुरू केले. अशातच पुन्हा दुसरी लाट आली आणि परिस्थिती ‘जैसे थे’ झाली. माञ, यावेळी मदतीचे हात आखूड झाले आहे. गतवर्षी अन्नधान्याचे किट वाटणारे नेतेही यावर्षी गायब झाले आहे. या पडत्या काळात मजुरांना ना शासनाची मदत मिळाली, ना लोकप्रतिनिधींकडून मदतीचा हात मिळाला.

मिरची कटाई केंद्र सुरू करा

गत दोन महिन्यांपासून मिरची कटाई केंद्र बंद असल्यामुळे चार हजारांवर मजुरांसमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने हे रोजगाराचे केंद्र असलेले मिरची कटाई केंद्र तत्काळ सुरू करावे. यादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझर, आदींचे आम्ही काटेकोर पालन करू किंवा किमान पन्नास टक्के मजुरांना तरी येथे काम करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मजुरांनी केली आहे.

--

मिरची कटाई केंद्रावर काम करून आम्ही आपले पोट भरतो. माञ, लॉकडाऊनमुळे गत दोन महिन्यांपासून मिरची कटाई केंद्र बंद आहे. अशात आम्ही जगायचे कसे, या पडतीच्या काळात आम्हा मजुरांना शासनाकडून काहीएक आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे शासनाने आमचे रोजगार केंद्र तत्काळ सुरू करावे.

- आम्रपाली मेश्राम, मिरची कटाई कामगार