शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

आयुष्य सुंदर आहे : अपयश आल्यास नव्याने सुरुवात करा

By admin | Updated: June 2, 2014 02:21 IST

मित्रांनो, आज बारावीचा निकाल. लोक म्हणतात की आयुष्याच्या वळणावरची एक अतिशय ...

नागपूर : मित्रांनो, आज बारावीचा निकाल. लोक म्हणतात की आयुष्याच्या वळणावरची एक अतिशय महत्त्वाची ही परीक्षा आहे. आजकाल परीक्षा म्हणजे एक प्रकारची शर्यत झाली आहे. गुणांच्या शर्यतीत कुठे ढेपाळले किंवा अपयशाचा धक्का लागला तर मन सैरभैर होण्याची भीती असते. त्यातूनच जर हा धक्का सहन करू शकले नाही किंवा सभोवतालच्या परिस्थितीतून तणाव वाढला तर काही मंडळी आपले आयुष्य संपवायला निघतात.

मात्र विचार करा की ज्या व्यक्तीमध्ये स्वत:चा अनमोल असा जीव देण्याची हिंमत असू शकते, त्याने ती हिंमत जर जगण्याच्या व कामाच्या बाबतीत दाखवली तर तो कुठच्या कुठे निघून जाऊ शकतो. केवळ एका परीक्षेतील अपयश तुमच्यातील कर्तृत्वाला तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही आणि लक्षात ठेवा की स्पर्धेत दुसरा हारतो म्हणूनच पहिला जिंकतो. तर विद्यार्थ्यांंंनो आजच्या परीक्षेत अपयश आले तरी स्वत:वरील विश्‍वास सोडू नका .

आयुष्य अनमोल आहे

विद्यार्थ्यांंंनो तुमचा जीव हा सर्वांंंसाठीच फार अनमोल आहे. आजपर्यंंंत असे अनेक महान पुरुष झालेत ज्यांना अभ्यासात तर अपयश आले होते, मात्र आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी जगाला नवीन मार्ग दाखविला. जर मनात आत्महत्येचा विचार आला तर आपल्या आई-वडिलांचा विचार करा. आत्महत्या करणे हे कुठल्याही समस्येचे उत्तर असू शकत नाही. ते पळपुट्यांचे काम आहे. तुम्ही अपयशाच्या राखेतून उठून फिनिक्स पक्ष्यासारखी उंच भरारी घ्या. (प्रतिनिधी)