शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

सर्वेक्षणात गेले वर्ष, तरीही निकष पूर्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST

नागपूर : लॉकडाऊनच्या काळात आदिवासींचा रोजगार हिरावल्याने शासनाने त्यांच्यासाठी खावटी योजना सुरू केली. खावटीसाठी लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात ...

नागपूर : लॉकडाऊनच्या काळात आदिवासींचा रोजगार हिरावल्याने शासनाने त्यांच्यासाठी खावटी योजना सुरू केली. खावटीसाठी लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी मोठी यंत्रणा लावण्यात आली. या सर्वेक्षणाला वर्ष लागले. पण सर्वेक्षणात केवळ ३ हजारांच्या जवळपास आदिवासी कुटुंब आढळून आली. ही आकडेवारी शासनाच्या निकषानुसार कमी आल्याने, आता आदिवासी विभागातर्फे कार्यालयात बॅनर लावून अर्ज मागविले जात आहे. त्यामुळे अजूनही आदिवासींना मिळणारी खावटी त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना साहाय्य करण्यासाठी आदिवासी विकासमंत्र्यांनी खावटी योजना सुरू केली. त्यासंदर्भात ९ सप्टेंबर २०२० रोजी शासन निर्णय निर्गमित केला. खावटी अनुदान योजनेसाठी ४८६ कोटी रुपयांची मंजुरी दिली. ३० सप्टेंबर रोजी योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार आदिवासींचे सर्वेक्षण करण्यात आले. योजनेसाठी लाभार्थ्यांच्या निवडीसाठी आश्रमशाळेचे शिक्षक, वसतिगृह कर्मचारी, आदिवासी विकास विभाग कर्मचारी यांना जबाबदारी दिली होती. या सर्वेक्षणात वर्ष निघून गेले. शहरात ३ हजार आदिवासी कुटुंब लाभार्थी म्हणून समोर आले. पण हा आकडा अत्यल्प असल्याची ओरड आदिवासी संघटनांनी केली आहे.

११ आदिवासी राखीव वाॅर्ड असलेल्या नागपूर शहरातला लाभार्थी आकडा तीन हजाराच्या वर गेला नाही हे प्रशासनाचे अपयश आहे. अनेक वस्त्यामध्ये अधिकारी सर्वेक्षण करण्यासाठी गेले नाही त्यामुळे गरजू आदिवासी वंचित राहिला. शासनाच्या निकषानुसार विभागाला शहरात आदिवासी लाभार्थी आढळले नसल्याने विभागाच्या कार्यालयात बॅनर लावून अर्ज मागविले जात आहे.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने प्रश्न उपस्थित केला की, सर्वेक्षणात आदिवासी लाभार्थी आढळले नाही, तर एक बॅनर लावून किती लाभार्थी मिळणार आहे. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आदिवासीपर्यंत ही माहिती कशी पोहचेल. आदिवासी जनजागृतीकरिता विशेष निधीची तरतूद असूनसुद्धा त्याचा वापर केला जात नाही. या आकड्यांच्या माध्यमातून भविष्यकालीन योजना आखण्याची विभागाची तयारी होती; मात्र अल्प लाभार्थी संख्येवर भविष्यात बजेट मध्ये तरतूद झाली तर आदिवासींवर अन्याय होईल.