शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

निर्वासित होणार जमीन मालक

By admin | Updated: December 15, 2015 04:59 IST

१९४७ च्या फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या सर्व निर्वासितांना ते ज्या जमिनीवर वसले आहेत त्याची

नागपूर : १९४७ च्या फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या सर्व निर्वासितांना ते ज्या जमिनीवर वसले आहेत त्याची मालकी दिली जाईल. याशिवाय खासगी जागेवर असलेली अतिक्रमणे गुंठेवारीअंतर्गत नियमित केली जातील; सोबतच गृहनिर्माण संस्था व शैक्षणिक संस्थांना लीजवर दिलेल्या जमिनी शुल्क आकारून संबंधितांच्या मालकीच्या केल्या जातील, अशी घोषणा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली. संबंधित शुल्क किती असेल हे यासाठी नेमलेल्या समितीच्या शिफारशीनुसार ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेत सोमवारी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना खडसे म्हणाले, फाळणीनंतर भारतात अनेक जण निर्वासित म्हणून वास्तव्याला आले. राज्यात अनेक ठिकाणी अशा निर्वासितांच्या सिंधी कॉलनी आहेत. शीख समुदायाचे बरेच लोक निर्वासित म्हणून वास्तव्यास आहेत. त्यावेळी केंद्र सरकारने या जमिनी त्यांना वास्तव्यासाठी दिल्या होत्या. या सर्व जमिनी ब वर्गातील आहेत. या जमिनी अ वर्ग केल्या जातील. याशिवाय रेडीरेकनरनुसार निश्चित केलेले शुल्क भरणाऱ्यांना संबंधित भूखंड त्यांच्या नावावर करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय कोणत्याही प्रकल्पग्रस्तांना मोबदल्यात दिल्या जाणाऱ्या जमिनीही अ वर्ग केल्या जातील. गृहनिर्माण संस्थांना जमिनी लीजवर दिलेल्या आहेत. त्यावर बांधकामे झाली असल्यामुळे ही लीज संपल्यानंतरही जमीन परत घेण्यात अडचणी आहेत. त्यामुळे विशिष्ट शुल्क आकारून गृहनिर्माण संस्थांना संबंधित जमिनीची मालकी दिली जाईल. शिक्षण संस्थांना लीजवर दिलेल्या जमिनींची मालकी देण्यासाठी शिक्षण संस्थांकडून रेडीरेकनरच्या दरानुसार किती टक्के रक्कम आकारावी, हे समिती ठरवेल. शिक्षण संस्था संबंधित रक्कम भरण्यास तयार असेल तर त्यांना जमिनीची मालकी दिली जाईल. (प्रतिनिधी)गुंठेवारीतील अतिक्रमणे नियमित होणार ४गुंठेवारी कायद्यांतर्गत असलेल्या खासगी जमिनींवर झालेली अतिक्रमणे नियमित करण्याची घोषणाही महसूलमंत्री खडसे यांनी केली. विकास आराखड्यानुसार पात्र असलेल्या जमिनी एन.ए. (अकृषक)करून त्यावर झालेली अतिक्रमणे नियमित केली जातील. एन.ए. करण्याचे अधिकार यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडून काढून स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यांनी विकास आराखडा तपासून निर्णय घ्यायचे आहेत. शहरालगत तुकडेबंदीची अटही रद्द करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे आता शहरालगत असलेल्या मोठ्या भूखंडांचे तुकडे करून छोटे भूखंड खरेदी करता येतील, असेही त्यांनी सांगितले.