शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

निर्वासित होणार जमीन मालक

By admin | Updated: December 15, 2015 04:59 IST

१९४७ च्या फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या सर्व निर्वासितांना ते ज्या जमिनीवर वसले आहेत त्याची

नागपूर : १९४७ च्या फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या सर्व निर्वासितांना ते ज्या जमिनीवर वसले आहेत त्याची मालकी दिली जाईल. याशिवाय खासगी जागेवर असलेली अतिक्रमणे गुंठेवारीअंतर्गत नियमित केली जातील; सोबतच गृहनिर्माण संस्था व शैक्षणिक संस्थांना लीजवर दिलेल्या जमिनी शुल्क आकारून संबंधितांच्या मालकीच्या केल्या जातील, अशी घोषणा महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली. संबंधित शुल्क किती असेल हे यासाठी नेमलेल्या समितीच्या शिफारशीनुसार ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेत सोमवारी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना खडसे म्हणाले, फाळणीनंतर भारतात अनेक जण निर्वासित म्हणून वास्तव्याला आले. राज्यात अनेक ठिकाणी अशा निर्वासितांच्या सिंधी कॉलनी आहेत. शीख समुदायाचे बरेच लोक निर्वासित म्हणून वास्तव्यास आहेत. त्यावेळी केंद्र सरकारने या जमिनी त्यांना वास्तव्यासाठी दिल्या होत्या. या सर्व जमिनी ब वर्गातील आहेत. या जमिनी अ वर्ग केल्या जातील. याशिवाय रेडीरेकनरनुसार निश्चित केलेले शुल्क भरणाऱ्यांना संबंधित भूखंड त्यांच्या नावावर करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय कोणत्याही प्रकल्पग्रस्तांना मोबदल्यात दिल्या जाणाऱ्या जमिनीही अ वर्ग केल्या जातील. गृहनिर्माण संस्थांना जमिनी लीजवर दिलेल्या आहेत. त्यावर बांधकामे झाली असल्यामुळे ही लीज संपल्यानंतरही जमीन परत घेण्यात अडचणी आहेत. त्यामुळे विशिष्ट शुल्क आकारून गृहनिर्माण संस्थांना संबंधित जमिनीची मालकी दिली जाईल. शिक्षण संस्थांना लीजवर दिलेल्या जमिनींची मालकी देण्यासाठी शिक्षण संस्थांकडून रेडीरेकनरच्या दरानुसार किती टक्के रक्कम आकारावी, हे समिती ठरवेल. शिक्षण संस्था संबंधित रक्कम भरण्यास तयार असेल तर त्यांना जमिनीची मालकी दिली जाईल. (प्रतिनिधी)गुंठेवारीतील अतिक्रमणे नियमित होणार ४गुंठेवारी कायद्यांतर्गत असलेल्या खासगी जमिनींवर झालेली अतिक्रमणे नियमित करण्याची घोषणाही महसूलमंत्री खडसे यांनी केली. विकास आराखड्यानुसार पात्र असलेल्या जमिनी एन.ए. (अकृषक)करून त्यावर झालेली अतिक्रमणे नियमित केली जातील. एन.ए. करण्याचे अधिकार यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडून काढून स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यांनी विकास आराखडा तपासून निर्णय घ्यायचे आहेत. शहरालगत तुकडेबंदीची अटही रद्द करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे आता शहरालगत असलेल्या मोठ्या भूखंडांचे तुकडे करून छोटे भूखंड खरेदी करता येतील, असेही त्यांनी सांगितले.