शहरं
Join us  
Trending Stories
1
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
2
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
3
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
4
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
5
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
6
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
7
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
8
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
9
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
10
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
11
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
12
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
13
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
14
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
15
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
16
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
17
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
18
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
19
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
20
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा

भारत-नेपाळमध्ये विश्वासाची कमतरता

By admin | Updated: June 10, 2017 03:03 IST

भारत आणि नेपाळ या दोन्ही देशात प्राचीन काळापासून संबंध आहेत. दोन्ही राष्ट्रातील नागरिकांमध्ये सामंजस्य आहे.

जनरल रुकमांगद कटवाल : ‘वर्तमान परिस्थितीत भारत-नेपाळचे संबंध व भविष्य’ विषयावर व्याख्यान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारत आणि नेपाळ या दोन्ही देशात प्राचीन काळापासून संबंध आहेत. दोन्ही राष्ट्रातील नागरिकांमध्ये सामंजस्य आहे. नेपाळसाठी भारत नेहमीच मोठ्या भावासारखा राहिला आहे, असे असले तरी दोन्ही देशांमधील संबंधात विश्वासाची कमतरता आहे, अशी जाहीर कबुली नेपाळचे रिटायर्ड चीफ आॅफ आर्मी स्टाफ जनरल रुकमांगद कटवाल यांनी येथे दिली. भारतीय विचार मंचतर्फे ‘वर्तमान परिस्थितीत भारत-नेपाळचे संबंध व भविष्य’ या विषयावर चिटणवीस सेंटर येथे परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यावर आपले विचार व्यक्त करताना ते बोलत होते. जनरल कटवाल म्हणाले, भौगोलिकदृष्ट्या नेपाळ आणि भारत हे शेजारी आहेत. त्यामुळे नेपाळ हा देश स्थिर राहणे हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. भारत-नेपाळचे संबंध अतिशय जुने असले तरी त्यात मागील काही वर्षांपासून दोन्ही देशात विश्वासाची कमतरता आहे. यासाठी नेपाळमधील राजकीय परिस्थितीसुद्धा कारणीभूत आहे. कारण नेपाळमध्ये राजकीय वातावरण फारसे स्थिर राहिलेले नाही. त्यामुळे चर्चा करायची तरी कुणाशी असा पेच भारतासमोर राहत असतो. नेपाळ सध्या धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून लोकशाहीदृष्ट्या ते विकसित होत आहे. ते चांगले विकसित व्हावे, आणि राजकीयदृष्ट्या स्थिर राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी उपस्थितांच्या अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरेही दिली. उमेश अंधारे यांनी भूमिका विषद केली. नेपाळ हिंदू राष्ट्र नको, मूठभर नेत्यांचा निर्णय नेपाळची हिंदू राष्ट्राची ओळख मिटवून एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र करावे, असा निर्णय नेपाळमधील काही मूठभर नेत्यांनी बसून घेतला, अशी मागणी कुणीही केली नव्हती. तसेच नागरिकांमधूनही अशी मागणी नव्हती. हा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याचे फायदे अजूनतरी दिसून आलेले नाहीत, असेही जनरल रुकमांगद कटवाल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.