शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

भारत-नेपाळमध्ये विश्वासाची कमतरता

By admin | Updated: June 10, 2017 03:03 IST

भारत आणि नेपाळ या दोन्ही देशात प्राचीन काळापासून संबंध आहेत. दोन्ही राष्ट्रातील नागरिकांमध्ये सामंजस्य आहे.

जनरल रुकमांगद कटवाल : ‘वर्तमान परिस्थितीत भारत-नेपाळचे संबंध व भविष्य’ विषयावर व्याख्यान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारत आणि नेपाळ या दोन्ही देशात प्राचीन काळापासून संबंध आहेत. दोन्ही राष्ट्रातील नागरिकांमध्ये सामंजस्य आहे. नेपाळसाठी भारत नेहमीच मोठ्या भावासारखा राहिला आहे, असे असले तरी दोन्ही देशांमधील संबंधात विश्वासाची कमतरता आहे, अशी जाहीर कबुली नेपाळचे रिटायर्ड चीफ आॅफ आर्मी स्टाफ जनरल रुकमांगद कटवाल यांनी येथे दिली. भारतीय विचार मंचतर्फे ‘वर्तमान परिस्थितीत भारत-नेपाळचे संबंध व भविष्य’ या विषयावर चिटणवीस सेंटर येथे परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यावर आपले विचार व्यक्त करताना ते बोलत होते. जनरल कटवाल म्हणाले, भौगोलिकदृष्ट्या नेपाळ आणि भारत हे शेजारी आहेत. त्यामुळे नेपाळ हा देश स्थिर राहणे हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. भारत-नेपाळचे संबंध अतिशय जुने असले तरी त्यात मागील काही वर्षांपासून दोन्ही देशात विश्वासाची कमतरता आहे. यासाठी नेपाळमधील राजकीय परिस्थितीसुद्धा कारणीभूत आहे. कारण नेपाळमध्ये राजकीय वातावरण फारसे स्थिर राहिलेले नाही. त्यामुळे चर्चा करायची तरी कुणाशी असा पेच भारतासमोर राहत असतो. नेपाळ सध्या धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून लोकशाहीदृष्ट्या ते विकसित होत आहे. ते चांगले विकसित व्हावे, आणि राजकीयदृष्ट्या स्थिर राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी उपस्थितांच्या अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरेही दिली. उमेश अंधारे यांनी भूमिका विषद केली. नेपाळ हिंदू राष्ट्र नको, मूठभर नेत्यांचा निर्णय नेपाळची हिंदू राष्ट्राची ओळख मिटवून एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र करावे, असा निर्णय नेपाळमधील काही मूठभर नेत्यांनी बसून घेतला, अशी मागणी कुणीही केली नव्हती. तसेच नागरिकांमधूनही अशी मागणी नव्हती. हा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याचे फायदे अजूनतरी दिसून आलेले नाहीत, असेही जनरल रुकमांगद कटवाल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.