शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

भारत-नेपाळमध्ये विश्वासाची कमतरता

By admin | Updated: June 10, 2017 03:03 IST

भारत आणि नेपाळ या दोन्ही देशात प्राचीन काळापासून संबंध आहेत. दोन्ही राष्ट्रातील नागरिकांमध्ये सामंजस्य आहे.

जनरल रुकमांगद कटवाल : ‘वर्तमान परिस्थितीत भारत-नेपाळचे संबंध व भविष्य’ विषयावर व्याख्यान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारत आणि नेपाळ या दोन्ही देशात प्राचीन काळापासून संबंध आहेत. दोन्ही राष्ट्रातील नागरिकांमध्ये सामंजस्य आहे. नेपाळसाठी भारत नेहमीच मोठ्या भावासारखा राहिला आहे, असे असले तरी दोन्ही देशांमधील संबंधात विश्वासाची कमतरता आहे, अशी जाहीर कबुली नेपाळचे रिटायर्ड चीफ आॅफ आर्मी स्टाफ जनरल रुकमांगद कटवाल यांनी येथे दिली. भारतीय विचार मंचतर्फे ‘वर्तमान परिस्थितीत भारत-नेपाळचे संबंध व भविष्य’ या विषयावर चिटणवीस सेंटर येथे परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यावर आपले विचार व्यक्त करताना ते बोलत होते. जनरल कटवाल म्हणाले, भौगोलिकदृष्ट्या नेपाळ आणि भारत हे शेजारी आहेत. त्यामुळे नेपाळ हा देश स्थिर राहणे हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. भारत-नेपाळचे संबंध अतिशय जुने असले तरी त्यात मागील काही वर्षांपासून दोन्ही देशात विश्वासाची कमतरता आहे. यासाठी नेपाळमधील राजकीय परिस्थितीसुद्धा कारणीभूत आहे. कारण नेपाळमध्ये राजकीय वातावरण फारसे स्थिर राहिलेले नाही. त्यामुळे चर्चा करायची तरी कुणाशी असा पेच भारतासमोर राहत असतो. नेपाळ सध्या धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून लोकशाहीदृष्ट्या ते विकसित होत आहे. ते चांगले विकसित व्हावे, आणि राजकीयदृष्ट्या स्थिर राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी उपस्थितांच्या अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरेही दिली. उमेश अंधारे यांनी भूमिका विषद केली. नेपाळ हिंदू राष्ट्र नको, मूठभर नेत्यांचा निर्णय नेपाळची हिंदू राष्ट्राची ओळख मिटवून एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र करावे, असा निर्णय नेपाळमधील काही मूठभर नेत्यांनी बसून घेतला, अशी मागणी कुणीही केली नव्हती. तसेच नागरिकांमधूनही अशी मागणी नव्हती. हा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याचे फायदे अजूनतरी दिसून आलेले नाहीत, असेही जनरल रुकमांगद कटवाल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.