शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

नागरिकांमध्ये इंटरनेट सुरक्षेविषयी गंभीरतेचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:09 IST

अंकिता देशकर नागपूर : कोरोना संक्रमणामुळे नागरिकांचा ऑनलाइन व्यवहार करण्याकडे कल वाढला आहे. सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेऊन ...

अंकिता देशकर

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे नागरिकांचा ऑनलाइन व्यवहार करण्याकडे कल वाढला आहे. सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेऊन असुरक्षित ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांना लुबाडत आहेत. अलीकडच्या काळात ऑनलाइन गुन्हे वाढले आहेत. नागरिकांमध्ये इंटरनेट सुरक्षेविषयी गंभीरतेचा अभाव असण्याचे हे लक्षण आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सुरक्षित इंटरनेट दिवसानिमित्त ‘लोकमत’ने काही तज्ज्ञांशी चर्चा केली असता यासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण बाबी पुढे आल्या. सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल माने यांच्यानुसार, नागरिकांना ऑनलाइन फसवणूक होते हे माहिती असतानाही ते गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. तंत्रज्ञानासोबत गुन्हे करण्याच्या पद्धतीमध्येही बदल होत आहे. लॉकडाऊन काळात नागरिकांना ऑनलाइन दारू विक्रीचे प्रलोभन दाखवण्यात आले होते. नागरिकांना फसवण्यासाठी गुन्हेगार अशा विविध क्लुप्त्या वापरत असतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ऑनलाइन फसवणुकीपासून स्वत:चे संरक्षण करणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. त्यांनी इंटरनेटवर कुणालाही गोपनीय माहिती देऊ नये. सोशल मीडियावरून एकमेकांना छायाचित्रे पाठवणेही धोकादायक आहे. हॅकर्स ही छायाचित्रे विविध वेबसाइटवर वापरून नागरिकांना ब्लॅकमेल करू शकतात.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी विभागात सायबर लॉ विषय शिकवणाऱ्या प्रा. श्रुती वाघेला यांनी सध्याच्या परिस्थितीत इंटरनेट सुरक्षित नसल्याचे मत व्यक्त केले. इंटरनेट सुरक्षेविषयी नागरिक जास्त जागृत नाहीत. बाजारात स्मार्टफोन स्वस्त किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्गातील नागरिक स्मार्टफोन खरेदी करू शकतात. परंतु, ऑनलाइन व्यवहारासाठी लागणारी माहिती त्यांच्याकडे नसते. त्यामुळे इंटरनेट सुरक्षेसंदर्भात व्यापकस्तरावर जनजागृती मोहीम राबवणे आवश्यक आहे. याशिवाय नागरिकांनी जुने फोन खरेदी करणे व विकणे टाळले पाहिजे. बरेचदा जुन्या फोनमधील सर्वच माहिती रद्द होत नाही. त्याचा दुरूपयोग केला जाऊ शकतो. तसेच सायबर गुन्हे थांबविण्यासाठी कडक कायदा लागू झाला पाहिजे, असे वाघेला यांनी सांगितले.

सायबर तज्ज्ञ महेश रखेजा यांच्यानुसार सायबर गुन्हे थांबविण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. नागरिकांना स्ट्राँग पासवर्ड ठेवण्याची सूचना केली जाते. असे असताना अकाउण्ट हॅक केले जाते. नवीन तांत्रिक बाबींची वेळोवेळी माहिती करून घेणे हा यावर एकमेव उपाय आहे. हल्लीचे चोरटे डिजिटल झाले आहेत. त्यामुळे अधिक सावध राहणे गरजेचे आहे, असे रखेजा यांनी सांगितले.

-------------------

काय आहे सुरक्षित इंटरनेट दिवस

दरवर्षी फेब्रुवारीमध्ये द्वितीय आठवड्यातील दुसऱ्या दिवशी सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा केला जातो. ही परंपरा २००४ पासून सुरू आहे. नागरिकांमध्ये इंटरनेट सुरक्षेविषयी जागृती व संवाद घडवून आणणे हा या दिवसाचा उद्देश आहे.

----------------

सुरक्षित इंटरनेटसाठी टिप्स

१ - दुसऱ्याला ओटीपी सांगू नये.

२ - सोशल मीडियावर छायाचित्रे पाठवणे टाळावे.

३ - ऑफर्स व प्रमोशनच्या लिंक उघडू नये.

४ - अज्ञात स्त्रोताकडून येणारी छायाचित्रे व व्हिडिओवर क्लिक करू नये.

५ - संशयास्पद क्रमांकाचे कॉल उचलू नये.

६ - पासवर्ड कुणालाही सांगू नये.

७ - वाचल्याशिवाय अटी व शर्ती मान्य करू नये.

८ - इंटरनेट वापरत असताना जीपीएस बंद ठेवावे.