शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांमध्ये इंटरनेट सुरक्षेविषयी गंभीरतेचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:09 IST

अंकिता देशकर नागपूर : कोरोना संक्रमणामुळे नागरिकांचा ऑनलाइन व्यवहार करण्याकडे कल वाढला आहे. सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेऊन ...

अंकिता देशकर

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे नागरिकांचा ऑनलाइन व्यवहार करण्याकडे कल वाढला आहे. सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेऊन असुरक्षित ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांना लुबाडत आहेत. अलीकडच्या काळात ऑनलाइन गुन्हे वाढले आहेत. नागरिकांमध्ये इंटरनेट सुरक्षेविषयी गंभीरतेचा अभाव असण्याचे हे लक्षण आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सुरक्षित इंटरनेट दिवसानिमित्त ‘लोकमत’ने काही तज्ज्ञांशी चर्चा केली असता यासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण बाबी पुढे आल्या. सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल माने यांच्यानुसार, नागरिकांना ऑनलाइन फसवणूक होते हे माहिती असतानाही ते गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. तंत्रज्ञानासोबत गुन्हे करण्याच्या पद्धतीमध्येही बदल होत आहे. लॉकडाऊन काळात नागरिकांना ऑनलाइन दारू विक्रीचे प्रलोभन दाखवण्यात आले होते. नागरिकांना फसवण्यासाठी गुन्हेगार अशा विविध क्लुप्त्या वापरत असतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ऑनलाइन फसवणुकीपासून स्वत:चे संरक्षण करणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. त्यांनी इंटरनेटवर कुणालाही गोपनीय माहिती देऊ नये. सोशल मीडियावरून एकमेकांना छायाचित्रे पाठवणेही धोकादायक आहे. हॅकर्स ही छायाचित्रे विविध वेबसाइटवर वापरून नागरिकांना ब्लॅकमेल करू शकतात.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी विभागात सायबर लॉ विषय शिकवणाऱ्या प्रा. श्रुती वाघेला यांनी सध्याच्या परिस्थितीत इंटरनेट सुरक्षित नसल्याचे मत व्यक्त केले. इंटरनेट सुरक्षेविषयी नागरिक जास्त जागृत नाहीत. बाजारात स्मार्टफोन स्वस्त किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्गातील नागरिक स्मार्टफोन खरेदी करू शकतात. परंतु, ऑनलाइन व्यवहारासाठी लागणारी माहिती त्यांच्याकडे नसते. त्यामुळे इंटरनेट सुरक्षेसंदर्भात व्यापकस्तरावर जनजागृती मोहीम राबवणे आवश्यक आहे. याशिवाय नागरिकांनी जुने फोन खरेदी करणे व विकणे टाळले पाहिजे. बरेचदा जुन्या फोनमधील सर्वच माहिती रद्द होत नाही. त्याचा दुरूपयोग केला जाऊ शकतो. तसेच सायबर गुन्हे थांबविण्यासाठी कडक कायदा लागू झाला पाहिजे, असे वाघेला यांनी सांगितले.

सायबर तज्ज्ञ महेश रखेजा यांच्यानुसार सायबर गुन्हे थांबविण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. नागरिकांना स्ट्राँग पासवर्ड ठेवण्याची सूचना केली जाते. असे असताना अकाउण्ट हॅक केले जाते. नवीन तांत्रिक बाबींची वेळोवेळी माहिती करून घेणे हा यावर एकमेव उपाय आहे. हल्लीचे चोरटे डिजिटल झाले आहेत. त्यामुळे अधिक सावध राहणे गरजेचे आहे, असे रखेजा यांनी सांगितले.

-------------------

काय आहे सुरक्षित इंटरनेट दिवस

दरवर्षी फेब्रुवारीमध्ये द्वितीय आठवड्यातील दुसऱ्या दिवशी सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा केला जातो. ही परंपरा २००४ पासून सुरू आहे. नागरिकांमध्ये इंटरनेट सुरक्षेविषयी जागृती व संवाद घडवून आणणे हा या दिवसाचा उद्देश आहे.

----------------

सुरक्षित इंटरनेटसाठी टिप्स

१ - दुसऱ्याला ओटीपी सांगू नये.

२ - सोशल मीडियावर छायाचित्रे पाठवणे टाळावे.

३ - ऑफर्स व प्रमोशनच्या लिंक उघडू नये.

४ - अज्ञात स्त्रोताकडून येणारी छायाचित्रे व व्हिडिओवर क्लिक करू नये.

५ - संशयास्पद क्रमांकाचे कॉल उचलू नये.

६ - पासवर्ड कुणालाही सांगू नये.

७ - वाचल्याशिवाय अटी व शर्ती मान्य करू नये.

८ - इंटरनेट वापरत असताना जीपीएस बंद ठेवावे.