शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Maharashtra Election 2019; प्रचार रॅलींमुळे कामगार मिळेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 10:57 IST

चार-पाच तासांचे ३०० रुपये मिळत असल्याने मजुरांनाही सुगीचे दिवस आले आहेत. मात्र ऐन दिवाळीच्या दिवसात ठिय्यावर मजूर मिळत नसल्याने कंत्राटदारांची चांगलीच कोंडी झाली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीमुळे सुगीचे दिवस दिवाळीच्या तोंडावर कंत्राटदारांची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीला चार दिवस शिल्लक असल्याने प्रचार रॅलीवर भर दिला जात आहे. उमेदवारांनी ढोलताशांच्या गजरात सकाळ-संध्याकाळ प्रचार रॅलीचा धडाका लावला आहे. काही उमेदवारांच्या प्रचार रॅलीला कार्यकर्ते मिळत नसल्याने त्यांना ठिय्यावरील मजुरांची मदत घ्यावी लागत आहे. चार-पाच तासांचे ३०० रुपये मिळत असल्याने मजुरांनाही सुगीचे दिवस आले आहेत. मात्र ऐन दिवाळीच्या दिवसात ठिय्यावर मजूर मिळत नसल्याने कंत्राटदारांची चांगलीच कोंडी झाली आहे.निवडणुकीत प्रचाराच्या माध्यमातून आपल्याच बाजूने वातावरण असल्याचे चित्र निर्माण करण्याच्या प्रयत्नात उमेदवार असतात. परंतु यासाठी क ार्यकर्ते व लोकांची गर्दी जमविणे सर्वांना शक्य होत नाही. मोठ्या नेत्यांच्या सभांनाही अनेकदा गर्दी होत नाही.अशावेळी गर्दी जमविण्यासाठी मजुरी देऊन लोकांना आणल्याशिवाय पर्याय नसतो. रॅलीत लोकांची गर्दी नसली तर यातून मतदारात चुकीचा संदेश जाण्याचा धोका असल्याने रॅलीत गर्दी व्हावी, यासाठी मजुरांना आणावे लागत आहे.शहराच्या विविध भागातील ठिय्यावर सकाळी ८वाजल्यापासून मजूर जमा होतात. दुपारी १२ पर्यंत मजुरांची ठिय्यावर गर्दी असते. ठिय्यावर आलेल्या सर्वच मजुरांना काम मिळेल याची शाश्वतीही नसते. अनेकदा आठवड्यातून तीन -चार दिवस काम मिळते. इतर दिवशी मिळत नाही. मात्र दिवाळीच्या दिवसात घराची रंगरंगोटी, सफाई व दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. या दिवसात कामाची कमी नसते. कंत्राटदारांना मजुरांचा शोध घ्यावा लागतो.मजुरीला न जाणाऱ्यांना मिळाला रोजगारप्रचार रॅलीसाठी मागणी वाढल्याने ठिय्यावर मजूर मिळेनासे झाल्याने मजुरीला न जाणाऱ्या महिलांना जादाचे पैसे देऊ न रॅलीत सहभागी करावे लागत आहे. यातून १५ दिवस का होईना महिलांना रोजगार मिळाला आहे. जो उमेदवार अधिक पैसे देईल त्यांच्या रॅलीत महिला जात आहेत. यामुळे सकाळी एका उमेदराच्या प्रचार रॅलीत सहभागी झालेल्या महिला संध्याकाळी दुसऱ्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीत दिसत आहे. दररोज दोन पाळीत ६०० ते ८०० रुपये कमावत आहेत.जेवण व फराळाची व्यवस्थाप्रचार रॅलीत सहभागी होण्यासाठी मजुरी सोबतच मजुरांच्या जेवणाची व फराळाची व्यवस्था करावी लागत आहे. काही उमेदवारांच्या प्रचार रॅलीत ८०० ते १००० महिलांचा समावेश असतो. सकाळच्या रॅलीत सहभागी होणाऱ्या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे तर संध्याकाळच्या रॅलीत सहभागी होणाऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था केली जात आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019