शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

जाणून घ्या दबावाखालील पृथ्वी

By admin | Updated: July 15, 2016 03:04 IST

मानवाच्या निसर्गावरील आक्रमणाबाबत अनेक दशकांपासून चिंता व्यक्त केली जात आहे.

रमण विज्ञान केंद्रात ‘प्लॅनेट अंडर प्रेशर’ : मानवाच्या तथाकथित संकल्पनेतून बिकटतेकडे वाटचाल नागपूर : मानवाच्या निसर्गावरील आक्रमणाबाबत अनेक दशकांपासून चिंता व्यक्त केली जात आहे. तरीही वसुंधरेची वाटचाल दिवसेंदिवस मानवाच्या तथाकथित विकासात्मक संकल्पनेतून बिकटतेकडे होत आहे. बेसुमार जंगलतोड, वाढती लोकसंख्या, शहरीकरण, अतिऔद्योगिकीकरण, वातानुकूलित उपकरणांचा उपयोग, वाहनांचा वाढता वापर आणि औष्णिक ऊर्जानिर्मिती आदी अनेक कारणांच्या दबावाखाली पृथ्वी आली आहे. याबाबत जनजागृती निर्माण करून त्या दृष्टीने पावले उचलणे काळाची गरज असल्याची माहिती देणारे प्रदर्शन ‘प्लॅनेट अंडर प्रेशर’ रमण विज्ञान केंद्रात सुरू झाले आहे. या प्रदर्शनात विविध थ्रीडी मॉडेल्स ठेवण्यात आली आहेत. माहिती देणारे पॅनल्स, (माहिती पटल) व्हिडिओ, ‘अ‍ॅनिमेशन डेस्क’ याद्वारे विद्यार्थ्यांना या विषयाची माहिती दिली जात आहे. प्रदर्शनाच्या संदर्भात अधिक माहिती देताना रमण विज्ञान केंद्राचे अधिकारी अभिमन्यू भेलावे म्हणाले, विकासाच्या नावाखाली शहरीकरण आणि औद्योगिकीकरण वाढत आहे. आज वीज नसेल तर हवा, पाणी आणि अन्न बंद अशी स्थिती महानगरांची झाली आहे, हे आजचे वास्तव आहे. या सर्वांचा दबाव पृथ्वीवर पडत आहे. सूर्यापासून जी उष्णता मिळते पृथ्वी ती काही प्रमाणात शोषून घेते व थोड्या प्रमाणात बाहेर टाकते. परंतु आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने व कार्बनडायआॅक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे शोषलेले तापमान पुरेशा प्रमाणात टाकण्यात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत असून ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला सामोरे जावे लागत आहे. दुसरे म्हणजे, पृथ्वीला थंड कसे राखायचे हाही एक दबावाचा भाग आहे. हा दबाव कमी करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी वैकल्पिक साधने काय, या सर्वांची माहिती व्हावी, लोकांमध्ये जनजागृती व्हावी, विशेषत: विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ते घराघरात पोहचावे यासाठी हे प्रदर्शन आहे.