शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

चिमुकल्यांचा मूड रमला घरात, अभ्यासाची पुस्तके दप्तरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 11:03 IST

Nagpur News लॉकडाऊनमध्ये मुलांचे संपूर्ण लक्ष आई-वडील-आजी-आजोबांसोबत रमण्यातच आहे. पालकांनी कितीही शिकवितो म्हटले तरी शिक्षकांची किमया साधणे कठीण आहे.

ठळक मुद्देचवथीपर्यंतची मुले यंदाही शाळेविनाच मित्रमंडळी, अभ्यासाचा पडतोय विसर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शाळा हे विद्येचे मंदिर आणि बालवयातील सर्वांगीण विकासासाठी शाळा हे सर्वोत्तम स्थळ मानले जाते. मात्र, गेल्या १६-१७ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी चिमुकल्यांना मॅडम रागावतात किंवा लाड करतात, याच्या पलीकडे अ, ब, क - ए, बी, सी, डी म्हणा किंवा एक, दोन, तीन - वन, टू, थ्री म्हणा याशी काही देणेघेणे राहिले नाही. लॉकडाऊनमध्ये मुलांचे संपूर्ण लक्ष आई-वडील-आजी-आजोबांसोबत रमण्यातच आहे. पालकांनी कितीही शिकवितो म्हटले तरी शिक्षकांची किमया साधणे कठीण आहे. अभ्यासाची पुस्तके दप्तरात (बॅग) आणि मुले रमली घरात, अशी स्थिती सर्वदूर आहे.

अक्षर-अंक ओळख विसरले

* नवाकर्षण हे बालवयातील प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे, या वयात बालकांच्या मनावर-मेंदूवर ज्या गोष्टींचा सतत प्रभाव टाकला जातो, त्या गोष्टी आयुष्यभर स्मरणात राहतात.

* दीर्घकालीन लॉकडाऊन आणि शाळा बंद असल्याने मुलांना शिक्षकी भयाचा सामना करावा लागत नाही.

* मोबाईल हे तसेही आभासी माध्यम आहे आणि स्क्रिन सतत बदलत असल्याने यातून मिळणारे शिक्षणही क्षणिक स्मरणाचे ठरते.

* पहिली व दुसरीचे विद्यार्थी ऑनलाईन वर्गात केवळ ऐकू शकतात. ते किमी स्मरणात राहिल हे सांगता येत नाहीत. त्यामुळे, अक्षर-अंकाची ओळख प्रारंभीच अडखळली आहे.

* दुसरी व चवथीचे विद्यार्थी नव अक्षर-अंक शिकण्यापासून वंचित होत आहे. पहिली व दुसरीमध्ये घेतलेली अक्षर-अंक ओळख विसरत चालले आहेत.

अभ्यास टाळण्याची अनेक कारणे

* खेळण्या-बागडण्याच्या वयात मुलांसाठी अभ्यास हा कंटाळवाणा विषय असतो.

* मधातच भूक लागली, झोप लागली हे कारणे पुढे येतात.

* पालक शिकवित असताना मुले डायव्हर्ट होण्याचा प्रयत्न करतात. हे काय, ते काय असे प्रश्न विचारतात.

* अचानक, खेळण्याची इच्छा व्यक्त केली जाते.

* इच्छापूर्तीस नकार दिल्यास अश्रूविहीन रडणे अर्थात नुसतेच ओरडणे सुरू होते.

हा काळ फायद्याचा अन् तोट्याचा

दीर्घकालीन लॉकडाऊनमुळे मुले जास्तीत जास्त वेळ आपल्या पालकांसोबत घालवत आहेत. याच वयात मुले ऑनलाईन होत आहेत, शिक्षकही तंत्रज्ञान प्रशिक्षित होत आहेत, ही चांगली बाब झाली. मात्र, मोबाईल आणि सतत घरी राहत असल्याचे चिडचिडे होत आहेत, हा तोटा आहे. मुलांना मिसळता येत नाही, शिक्षकांशी थेट आमना-सामना करता येत नाही, या त्रुटी या काळात दिसून येत आहेत. हे वर्षही पहिली ते चवथीच्या मुलांना शाळेविनाच घालवावे लागणार आहे. पालकांनी आता मुलांना आपल्या प्रत्येक गोष्टी इन्व्हॉल्व्ह करून त्यांना प्राथमिक शिक्षण देण्याची तयारी ठेवावी. मात्र, शाळा जेव्हा सुरू होतील तेव्हा या विद्यार्थ्यांना हाताळणे हे शिक्षकांसाठी प्रचंड आव्हानात्मक असणार आहे.

- रवींद्र फडणवीस, शिक्षणतज्ज्ञ

पालकांची होतेय अडचण

मुलांचे लाड पूर्ण करणे, ही प्रत्येक पालकांची हौस असते. मात्र, शिक्षण देणे तेवढेच अवघड. मुलांच्या मनात पालक आणि शिक्षकांसाठी वेगवेगळे स्थान असते. त्याचे वर्गीकरण त्यांच्याच डोक्यात आपसुकच झालेले असते. त्यामुळे, शिक्षकांसारखे शिकविण्याचा प्रयत्न करणारे पालक मुलांसाठी कायम विनोदाच विषय असतो. आपले रडगाणे ज्यांच्याजवळ मांडतो, तोच पालक शिक्षकांसारखा बघण्याचा इच्छा त्यांची नसते. त्यामुळेच, पालकांची मोठी अडचण या काळात होत असल्याचे दिसून येते.

रोजगाराच्या टेेन्शनमध्ये पालक

कोरोना काळात अनेक पालकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. ती समस्या वाढतच चालली. अशा स्थितीत पालक घरगाडा चालविण्यासाठी सतत रोजगाराच्या टेन्शनमध्ये आहेत. त्यांना सतत बाहेर पडावे लागत आहे. अशा स्थितीत कोवळ्या वयातील मुलांना शिकवावे कसे आणि शिकविले तरी त्यांची मानसिकता समजण्यास अडचण निर्माण होत असल्याचे अनेकांच्या संवादातून स्पष्ट झाले.

............................

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस