शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

चिमुकल्यांचा मूड रमला घरात, अभ्यासाची पुस्तके दप्तरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 11:03 IST

Nagpur News लॉकडाऊनमध्ये मुलांचे संपूर्ण लक्ष आई-वडील-आजी-आजोबांसोबत रमण्यातच आहे. पालकांनी कितीही शिकवितो म्हटले तरी शिक्षकांची किमया साधणे कठीण आहे.

ठळक मुद्देचवथीपर्यंतची मुले यंदाही शाळेविनाच मित्रमंडळी, अभ्यासाचा पडतोय विसर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शाळा हे विद्येचे मंदिर आणि बालवयातील सर्वांगीण विकासासाठी शाळा हे सर्वोत्तम स्थळ मानले जाते. मात्र, गेल्या १६-१७ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी चिमुकल्यांना मॅडम रागावतात किंवा लाड करतात, याच्या पलीकडे अ, ब, क - ए, बी, सी, डी म्हणा किंवा एक, दोन, तीन - वन, टू, थ्री म्हणा याशी काही देणेघेणे राहिले नाही. लॉकडाऊनमध्ये मुलांचे संपूर्ण लक्ष आई-वडील-आजी-आजोबांसोबत रमण्यातच आहे. पालकांनी कितीही शिकवितो म्हटले तरी शिक्षकांची किमया साधणे कठीण आहे. अभ्यासाची पुस्तके दप्तरात (बॅग) आणि मुले रमली घरात, अशी स्थिती सर्वदूर आहे.

अक्षर-अंक ओळख विसरले

* नवाकर्षण हे बालवयातील प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे, या वयात बालकांच्या मनावर-मेंदूवर ज्या गोष्टींचा सतत प्रभाव टाकला जातो, त्या गोष्टी आयुष्यभर स्मरणात राहतात.

* दीर्घकालीन लॉकडाऊन आणि शाळा बंद असल्याने मुलांना शिक्षकी भयाचा सामना करावा लागत नाही.

* मोबाईल हे तसेही आभासी माध्यम आहे आणि स्क्रिन सतत बदलत असल्याने यातून मिळणारे शिक्षणही क्षणिक स्मरणाचे ठरते.

* पहिली व दुसरीचे विद्यार्थी ऑनलाईन वर्गात केवळ ऐकू शकतात. ते किमी स्मरणात राहिल हे सांगता येत नाहीत. त्यामुळे, अक्षर-अंकाची ओळख प्रारंभीच अडखळली आहे.

* दुसरी व चवथीचे विद्यार्थी नव अक्षर-अंक शिकण्यापासून वंचित होत आहे. पहिली व दुसरीमध्ये घेतलेली अक्षर-अंक ओळख विसरत चालले आहेत.

अभ्यास टाळण्याची अनेक कारणे

* खेळण्या-बागडण्याच्या वयात मुलांसाठी अभ्यास हा कंटाळवाणा विषय असतो.

* मधातच भूक लागली, झोप लागली हे कारणे पुढे येतात.

* पालक शिकवित असताना मुले डायव्हर्ट होण्याचा प्रयत्न करतात. हे काय, ते काय असे प्रश्न विचारतात.

* अचानक, खेळण्याची इच्छा व्यक्त केली जाते.

* इच्छापूर्तीस नकार दिल्यास अश्रूविहीन रडणे अर्थात नुसतेच ओरडणे सुरू होते.

हा काळ फायद्याचा अन् तोट्याचा

दीर्घकालीन लॉकडाऊनमुळे मुले जास्तीत जास्त वेळ आपल्या पालकांसोबत घालवत आहेत. याच वयात मुले ऑनलाईन होत आहेत, शिक्षकही तंत्रज्ञान प्रशिक्षित होत आहेत, ही चांगली बाब झाली. मात्र, मोबाईल आणि सतत घरी राहत असल्याचे चिडचिडे होत आहेत, हा तोटा आहे. मुलांना मिसळता येत नाही, शिक्षकांशी थेट आमना-सामना करता येत नाही, या त्रुटी या काळात दिसून येत आहेत. हे वर्षही पहिली ते चवथीच्या मुलांना शाळेविनाच घालवावे लागणार आहे. पालकांनी आता मुलांना आपल्या प्रत्येक गोष्टी इन्व्हॉल्व्ह करून त्यांना प्राथमिक शिक्षण देण्याची तयारी ठेवावी. मात्र, शाळा जेव्हा सुरू होतील तेव्हा या विद्यार्थ्यांना हाताळणे हे शिक्षकांसाठी प्रचंड आव्हानात्मक असणार आहे.

- रवींद्र फडणवीस, शिक्षणतज्ज्ञ

पालकांची होतेय अडचण

मुलांचे लाड पूर्ण करणे, ही प्रत्येक पालकांची हौस असते. मात्र, शिक्षण देणे तेवढेच अवघड. मुलांच्या मनात पालक आणि शिक्षकांसाठी वेगवेगळे स्थान असते. त्याचे वर्गीकरण त्यांच्याच डोक्यात आपसुकच झालेले असते. त्यामुळे, शिक्षकांसारखे शिकविण्याचा प्रयत्न करणारे पालक मुलांसाठी कायम विनोदाच विषय असतो. आपले रडगाणे ज्यांच्याजवळ मांडतो, तोच पालक शिक्षकांसारखा बघण्याचा इच्छा त्यांची नसते. त्यामुळेच, पालकांची मोठी अडचण या काळात होत असल्याचे दिसून येते.

रोजगाराच्या टेेन्शनमध्ये पालक

कोरोना काळात अनेक पालकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. ती समस्या वाढतच चालली. अशा स्थितीत पालक घरगाडा चालविण्यासाठी सतत रोजगाराच्या टेन्शनमध्ये आहेत. त्यांना सतत बाहेर पडावे लागत आहे. अशा स्थितीत कोवळ्या वयातील मुलांना शिकवावे कसे आणि शिकविले तरी त्यांची मानसिकता समजण्यास अडचण निर्माण होत असल्याचे अनेकांच्या संवादातून स्पष्ट झाले.

............................

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस