शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पिकाला मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:13 IST

रामटेक-नरखेड : दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. गत तीन आठवड्यापासून जिल्ह्यातील बहुतांश ...

रामटेक-नरखेड : दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. गत तीन आठवड्यापासून जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातून पाऊस बेपत्ता झाला होता. यासोबतच सोयाबीनसह विविध पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली होती. सोमवारी सायंकाळी व मंगळवारी दिवसभर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे कुठे नुकसानीची तक्रार नसली तरी दुपारी झालेल्या विजामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण होते. रामटेक तालुक्यात धानाचे पीक हे प्रमुख पीक आहे. १०० टक्के राेवणी आटाेपल्या. पण १८ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला हाेता. पण मंगळवारी आलेल्या पावसाने हे संकट दूर झाले आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात जाेरदार पाऊस पडताे. त्यामुळे धानाचे पीक जाेमाने वाढते. राेग येत नाही. पण यंदा ऑगस्ट काेरडा जाताे की काय, असे वाटत हाेते. बांध्यांमध्ये भेगा पडल्या हाेत्या. धान पिवळे पडायला लागले हाेते. पण मंगळवारी झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्याच्या चिंता दूर झाल्या. रामटेक तालुक्यात आतापर्यंत ५१४ मि.मी. पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अजूनही नाल्याला पूर आलेला नाही, तरी पिकासाठी आवश्यक तेवढा पाऊस झाला आहे. तालुक्यात २०,००० हेक्टरवर धानाचे पीक घेतले जाते. त्यामुळे या पिकाला जीवनदान मिळाले आहे. कुही तालुक्यात धान, सोयाबीन, मिरची, तूर आणि कापसाचा पेरा आहे. मंगळवारच्या पावसाने येथील शेतकरी सुखावला आहे.