शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

खरीप पिकाला मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:13 IST

रामटेक-नरखेड : दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. गत तीन आठवड्यापासून जिल्ह्यातील बहुतांश ...

रामटेक-नरखेड : दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. गत तीन आठवड्यापासून जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातून पाऊस बेपत्ता झाला होता. यासोबतच सोयाबीनसह विविध पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली होती. सोमवारी सायंकाळी व मंगळवारी दिवसभर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे कुठे नुकसानीची तक्रार नसली तरी दुपारी झालेल्या विजामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण होते. रामटेक तालुक्यात धानाचे पीक हे प्रमुख पीक आहे. १०० टक्के राेवणी आटाेपल्या. पण १८ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला हाेता. पण मंगळवारी आलेल्या पावसाने हे संकट दूर झाले आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात जाेरदार पाऊस पडताे. त्यामुळे धानाचे पीक जाेमाने वाढते. राेग येत नाही. पण यंदा ऑगस्ट काेरडा जाताे की काय, असे वाटत हाेते. बांध्यांमध्ये भेगा पडल्या हाेत्या. धान पिवळे पडायला लागले हाेते. पण मंगळवारी झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्याच्या चिंता दूर झाल्या. रामटेक तालुक्यात आतापर्यंत ५१४ मि.मी. पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अजूनही नाल्याला पूर आलेला नाही, तरी पिकासाठी आवश्यक तेवढा पाऊस झाला आहे. तालुक्यात २०,००० हेक्टरवर धानाचे पीक घेतले जाते. त्यामुळे या पिकाला जीवनदान मिळाले आहे. कुही तालुक्यात धान, सोयाबीन, मिरची, तूर आणि कापसाचा पेरा आहे. मंगळवारच्या पावसाने येथील शेतकरी सुखावला आहे.