शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पिकाला मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:13 IST

रामटेक-नरखेड : दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. गत तीन आठवड्यापासून जिल्ह्यातील बहुतांश ...

रामटेक-नरखेड : दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. गत तीन आठवड्यापासून जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातून पाऊस बेपत्ता झाला होता. यासोबतच सोयाबीनसह विविध पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली होती. सोमवारी सायंकाळी व मंगळवारी दिवसभर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे कुठे नुकसानीची तक्रार नसली तरी दुपारी झालेल्या विजामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण होते. रामटेक तालुक्यात धानाचे पीक हे प्रमुख पीक आहे. १०० टक्के राेवणी आटाेपल्या. पण १८ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला हाेता. पण मंगळवारी आलेल्या पावसाने हे संकट दूर झाले आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात जाेरदार पाऊस पडताे. त्यामुळे धानाचे पीक जाेमाने वाढते. राेग येत नाही. पण यंदा ऑगस्ट काेरडा जाताे की काय, असे वाटत हाेते. बांध्यांमध्ये भेगा पडल्या हाेत्या. धान पिवळे पडायला लागले हाेते. पण मंगळवारी झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्याच्या चिंता दूर झाल्या. रामटेक तालुक्यात आतापर्यंत ५१४ मि.मी. पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अजूनही नाल्याला पूर आलेला नाही, तरी पिकासाठी आवश्यक तेवढा पाऊस झाला आहे. तालुक्यात २०,००० हेक्टरवर धानाचे पीक घेतले जाते. त्यामुळे या पिकाला जीवनदान मिळाले आहे. कुही तालुक्यात धान, सोयाबीन, मिरची, तूर आणि कापसाचा पेरा आहे. मंगळवारच्या पावसाने येथील शेतकरी सुखावला आहे.