शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

खडसेंचा मुक्काम रविभवनातच

By admin | Updated: November 25, 2015 07:17 IST

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. बांधकाम विभागाने मंत्र्यांच्या निवासाच्या

अधिवेशनाची तयारी : बावनकुळे, मुनगंटीवार सख्खे शेजारीनागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. बांधकाम विभागाने मंत्र्यांच्या निवासाच्या दृष्टीने रविभवन येथील कॉटेजचे वाटप केले आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने एकमेकांचे शेजारी असलेले ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (नागपूर) व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर) यांचा रविभवनातील मुक्कामही एकमेकांच्या शेजारीच असणार आहे. मुनगंटीवार यांना कॉटेज क्रमांक ४ तर बावनकुळे यांना कॉटेज क्रमांक ५ मिळाले आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी देवगिरीची मागणी केली होती. या निमित्ताने त्यांनी मुख्यमंत्र्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आपणच असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप त्यांची ही मागणी मान्य केलेली नाही. रविभवन येथील कॉटेज क्रमांक १ त्यांच्यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना कॉटेज क्रमांक २, परिवहन मंत्री दिवाकर रावते ३, पर्यावरण मंत्री रामदास कदम ६, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे ७, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे ८, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील ९, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे १०, उद्योगमंत्री सुभाष देसाई ११, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट १३, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन १४, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर १५, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत १६ व सामाजिक न्यायमंत्री राजाराम बडोले यांच्यासाठी कॉटेज क्रमांक २१ आरक्षित ठेवण्यात आले आहे. अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार व खातेबदल झाल्यास रविभवन येथील कॉटेज आरक्षणात बदल होण्याची शक्यता असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. राज्यमंत्र्यांसाठी नागभवन येथील कॉटेज आरक्षित ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षाच्या कॉटेज आरक्षणाचा विचार करता यात फारसा बदल झालेला नाही. कॉटेज क्रमांक ५ गेल्यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी आरक्षित होते. यावेळी येथे चंद्रशेखर बावनकुळे मुक्कामास आहेत. (प्रतिनिधी)देवगिरीचे गूढ कायम देवगिरीची रंगरंगोटी करण्यात आल्याने येथे एकनाथ खडसे वास्तव्यास राहतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यातच खडसे यांनी देवगिरीची मागणी केल्याने कालावधीत त्यांचा मुक्काम देवगिरीवर राहणार असल्याची चर्चा होती. परंतु रविभवन येथील कॉटेज क्रमांक १ त्यांच्यासाठी आरक्षित करण्यात आल्याने देवगिरीवर कुणाचे वास्तव्य राहणार याबाबतचे गूढ कायम आहे.