शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

काठेवाडी मेंढपाळ निघाले परतीच्या प्रवासाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:07 IST

राम वाघमारे लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : विदर्भातील गाेधन कमी हाेत असल्याने शेणखताचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे, गुजरातमधील कच्छ ...

राम वाघमारे

लाेकमत न्यूज नेटवर्क

नांद : विदर्भातील गाेधन कमी हाेत असल्याने शेणखताचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे, गुजरातमधील कच्छ व साैराष्ट्र भागात चाराटंचाई जाणवत असल्याने तेथील काठेवाडी मेंढपाळ त्यांच्या शेळ्या-मेंढ्या व गुरांसह विदर्भात दाखल हाेतात. पावसाला सुरुवात झाल्याने या मेंढपाळांनी नेहमीप्रमाणे त्यांचा भिवापूर तालुक्यातील पाच महिन्याचा मुक्काम आवरता घेत परतीचा प्रवास सुरू केला आहे.

काठेवाडी मेंढपाळ दरवर्षी डिसेंबर, जानेवारीमध्ये नागपूर जिल्ह्यातील विविध भागात दाखल हाेतात. त्यानंतर फेब्रुवारी, मार्चमध्ये रबी पिके निघाल्यानंतर काही शेतकरी शेणखतासाठी त्यांच्या शेतात या शेळ्यामेंढ्या बसवण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे काठेवाडी मेंढपाळांना पैसा व त्यांच्या शेळ्यामेंढ्यांसह गुरांना मुलबक चाराही मिळताे. या काळात मेंढपाळांची भटकंती सुरूच असते. शेतकऱ्यांनी जर शेळ्यामेंढ्या त्यांच्या शेतात बसवल्या नाहीत तर काठेवाडी मेंढपाळ गावालगतच्या माेकळ्या जागेवर त्यांचा मुक्काम ठाेकतात.

विशेष म्हणजे, हे मेंढपाळ दरवर्षी त्यांच्या कुंटुंबीयांसह येतात. यात त्यांच्या लहान मुलामुलींचाही समावेश असताे. त्यांच्या मुक्कामाचे ठिकाण दर आठवड्याला बदलत असते. कच्छ व साैराष्ट्र भागातून आपण पायी महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड पर्यंत जाताे आणि पावसाला सुरुवात हाेताच त्या ठिकाणाहून पायी परतीच्या प्रवासाला सुरुवात करताे, अशी माहिती या काठेवाडी मेंढपाळांनी दिली.

गृहाेपयाेगी साहित्य व मुलांच्या वाहतुकीसाठी त्यांच्यासाेबत उंटही असतात. येणे व जाण्याच्या प्रवासात आपण पाण्याची साेय असलेल्या ठिकाणी रात्रभर मुक्काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मुले व कुत्री रानात चारा खात असलेल्या शेळ्यामेंढ्यांवर सतत लक्ष ठेऊन असतात.

....

एकरी २,५०० रुपये खर्च

एका कळपात किमान १,३०० ते १,५०० शेळ्यामेंढ्या असतात. मेंढपाळ या शेळ्यामेंढ्या शेतात बसवण्यासाठी शेतकऱ्यांकडून रात्रभराचे (सायंकाळी ५ ते सकाळी ८ वाजेपर्यंत) २,५०० रुपये घेतात. रात्रभरात शेळ्यामेंढ्यांची विष्टा, मूत्र शेतात पडते. त्याचे गुरांच्या तुलनेत शेळ्यामेंढ्यांच्या लेंडीचे खत उपयुक्त ठरत असल्याने शेतकरी याला प्राधान्य देतात. त्यानंतर शेतकरी खरीपपूर्व मशागतीला सुरुवात करतात.

...

दिवाळी ते पावसाळा भटकंती

काठेवाडी मेंढपाळ महाराष्ट्रात येण्यासाठी दिवाळीनंतर तर परतीचा प्रवास पावसाळ्याच्या सुरुवातीला सुरू करतात. या काळात त्यांची सतत भटकंती सुरू असते. लहानग्यांपासून माेठ्यांपर्यंत सर्व जण कडाक्याची थंडी, रखरखते उन्ह, पाऊस अंगावर घेतात. यासह वादळातही त्यांचा मुक्काम उघड्यावरच असताे. शेळ्यामेंढ्या पालनावर आपली उपजीविका अवलंबून असते, अशी माहिती या मेंढपाळांनी दिली.

===Photopath===

170621\1821img_20210616_172750.jpg

===Caption===

मेंढपाळ परतीच्या प्रवासाला नीघाले