शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात करडी, सूर्यफुलाचा पेरा शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर नागपूर : करडी व सूर्यफूल ही पारंपरिक तेलवर्गीय पिके जिल्ह्यातून हद्दपार झाली असून, भुईमुगाचा अल्प तर ...

लोकमत न्यूज नेटवर

नागपूर : करडी व सूर्यफूल ही पारंपरिक तेलवर्गीय पिके जिल्ह्यातून हद्दपार झाली असून, भुईमुगाचा अल्प तर जवसाचा नगण्य पेरा आहे. या पिकांच्या तुलनेत जिल्ह्यातील शेतकरी साेयाबीनला महत्त्व देतात. मात्र, साेयाबीनचे लागवड क्षेत्र वाढले असतानाही उत्पादनात प्रचंड घट येत असल्याने उत्पादन खर्च भरून निघेनासा झाला आहे. दुसरीकडे, खाद्यतेलाची मागणी व किमतीत वाढ हाेत आहे.

करडी व सूर्यफूल ही दाेन्ही पिके खादाड आहेत. त्यांना माेठ्या प्रमाणात अन्नद्रव्यांची आवश्यक असते. या दाेन्ही पिकांची उत्पादकता कमी असून, बाजारात भाव कमी मिळताे. त्यामुळे जिल्ह्यातून करडीचे पीक २५ ते ३०, तर सूर्यफुलाचे पीक १५ ते १८ वर्षांपासून हद्दपार झाले आहे. वास्तवात, सूर्यफुलाचे पीक चांगले असून, ते तिन्ही हंगामात उत्पादन घेता येते. या पिकाला पक्ष्यांपासून वाचवताना शेतकऱ्यांच्या अक्षरश: नाकीनऊ येते.

या दाेन्ही पिकांसाेबत जवसाची उत्पादकताही कमीच आहे. जिल्ह्यात अंदाजे ४० वर्षांपूर्वी जवसाचे बऱ्यापैकी पीक घेतले जायचे. सध्या या पिकाचे उत्पादन उमरेड व भिवापूर तालुक्यांत केवळ ५ ते १० हेक्टरमध्ये घेतले जाते. भुईमुगाचे उत्पादन माेठ्या प्रमाणात घेतले जायचे. भुईमुगाच्या काढणी अधिक खर्च येत असल्याने तसेच मजुरांची समस्या व पावसाचे कमी प्रमाण यामुळे भुईमुगाचे क्षेत्रही जेमतेम राहिले आहे.

तेलबियांमध्ये साेयाबीनचे माेठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. जमिनीतील बुरशी, कीड व राेगांचा प्रदुर्भाव यामुळे साेयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट येत आहे. जिल्ह्यातील साेयाबीनची उत्पादकता ही एकरी १३ ते १७ क्विंटलवरून २ ते ४ क्विंटलवर आली आहे. याला आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या बियाण्यांचा अभाव, पिकांचा फेरपालट, उत्पादन वाढवून उत्पादनखर्च कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा अभाव कारणीभूत आहे.

तेलपीक पेरणी क्षेत्रपीक

२०२० २०१९ घट वाढ (हेक्टरमध्ये)

करडी ००० ००० ००० ०००

सोयाबीन १०२३८७ १००९१२ ००० १४७५

सूर्यफूल ००० ००० ००० ०००

जवस ०४ ०३ ०१ ०००

भुईमूग १२७१ १४९२ २२२ १६००

करडी हद्दपार

करडीचे उत्पादन पूर्वी अकाेला जिल्ह्यात घेतले जायचे. सन १९९९-२००० पासून या पिकाचा अकाेला जिल्ह्यातही पेरा कमी व्हायला लागला. नागपूर जिल्ह्यात करडीचा पेरा पूर्वीही अल्पच हाेता. करडीचे पीक काटेरी असून, खादाड असल्याने त्याचे उत्पादन घेणे त्रासदायक व आर्थिकदृष्ट्या परवडण्याजाेगे नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. रब्बी हंगामात येणाऱ्या या पिकाला कमी पाण्याची गरज असताना शेतकरी करडीचे उत्पादन घेत नाही. नागपूर जिल्ह्यातून करडीचे पीक अंदाजे २५ ते ३० वर्षांपूर्वीच हद्दपार झाले आहे.

करडी, सूर्यफूल, जवस या पिकांचे क्षेत्र सलग नसते. त्यामुळे पक्ष्यांपासून हाेणाऱ्या नुकसानीचे प्रमाण वाढते. ही पिके मळणीसाठी त्रासदायक ठरतात. तुलनेत साेयाबीन व हरभऱ्याचे पीक कमी खर्चाचे व त्रासाचे आहे. तुलनेत साेयाबीन व हरभऱ्याला चांगला भाव मिळत असल्याने उत्पन्नही चांगले मिळते. शेतकऱ्यांनी या पिकाचे सलग प्लाॅट घ्यावे. पाणी असल्यास भुईमुगाचे पीक घ्यावे.

- विजय निमजे, उपविभागीय कृषी अधिकारी

एकच पीक एकाच शेतात वारंवार घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राेग व किडींचे प्रमाण वाढले आहे. जमिनीतही बुरशी तयार झाली आहे. पूर्वी पिकांचा फेरपालट केला जायचा. ही पद्धती आता कुणी अमलात आणत नाही. त्यामुळे उत्पादकता घटत चालली आहे. भाव मिळत नसल्याने शेतकरी बहुतांश पारंपरिक तेलबियांचे उत्पादन घेण्यास उत्सुक नसतात.

- दिलीप काळमेघ, शेतकरी