शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

कालीदास महोत्सव : अंतर्मनात गुंजले ‘संगीता’च्या व्हायोलिनचे सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 01:34 IST

व्हायोलिनमधून निघणाऱ्या हळुवार स्वरांमध्ये सूर, ताल आणि लय सामावलेले आहे. मानवी मनातल्या सगळ्या भावनांची, संवेदनांची सुरेल अशी अभिव्यक्त म्हणजे डॉ. संगीता शंकर यांचे व्हायोलिन वादन. त्यांच्या हातांचा स्पर्श त्या वाद्याला झाला की दैवी सुरातून एक विश्व निर्माण होते. अंतर्मनाच्या खोलवर गुंजणाऱ्या दैवी सुरांची अनुभूती गुरुवारी रसिकांनी अनुभवली. अगदी तल्लीन होऊन हा माधुर्याचा हा ठेवा सुरेश भट सभागृहात उपस्थित रसिकांना सुखद आनंद देऊन गेला.

ठळक मुद्देसुमधूर लयवादनाची रसिकांना भुरळ : मुलगी नंदिनी यांनीही दिली सुमधूर साथ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्हायोलिनमधून निघणाऱ्या हळुवार स्वरांमध्ये सूर, ताल आणि लय सामावलेले आहे. मानवी मनातल्या सगळ्या भावनांची, संवेदनांची सुरेल अशी अभिव्यक्त म्हणजे डॉ. संगीता शंकर यांचे व्हायोलिन वादन. त्यांच्या हातांचा स्पर्श त्या वाद्याला झाला की दैवी सुरातून एक विश्व निर्माण होते. अंतर्मनाच्या खोलवर गुंजणाऱ्या दैवी सुरांची अनुभूती गुरुवारी रसिकांनी अनुभवली. अगदी तल्लीन होऊन हा माधुर्याचा हा ठेवा सुरेश भट सभागृहात उपस्थित रसिकांना सुखद आनंद देऊन गेला.सांगता समारोहाच्या सुरुवातीच्या सत्रात त्यांचे व्हायोलिन वादन होते; सोबत त्यांची कन्या उदयोन्मुख व्हायोलिनवादक नंदिनी हीसुद्धा होती. तबल्यावर साथ दिली पंडिता अनुराधा पाल यांनी. सतार, सरोद आणि व्हायोलिन या तंतुवाद्यांचा स्थायीभावच वेगळा आहे. गायनातील शब्द व व त्यांच्या मर्यादित अर्थाच्या बंधनातून पूर्णपणे मोकळी असणारी ही वाद्ये आहेत. एन. राजम यांच्याकडून लाभलेला मधुर वादनाचा वारसा डॉ. संगीता यांनी असाधारण रियाज, चिंतन आणि रागांच्या अभ्यासातून अधिक उंचीवर नेऊन समृद्ध केला. ‘अभिज्ञान शाकुंतलम्’ या संकल्पनेवरील महोत्सवात ‘राग शामकल्याण’सह त्यांनी व्हायोलिन वादनाला सुरुवात केली. ‘रटन लगी शाम नाम की...’ या बंदिशीसह विलंबित एकताल, आडा चारताल यावर वाढवत द्रुत आडा चारतालपर्यंत ही लय शिखर गाठत गेली. बनारस घराण्याच्या शैलीतील हे वादन ४० ते ४५ मिनिटे निनादत होते आणि कुणी संमोहित केल्यासारखी जादू श्रोत्यांवर होती. हळुवार सुरुवात होत वेगवान टोकावर नेऊन ही बंदिश त्यांनी संपविली. लयबद्ध वादन, लयकारीचा अनोखा डौल, स्वरांवरील अचूक पकड व यातून निर्माण झालेले मुलायम स्वरध्वनी रसिकांच्या कानामनातून हृदयापर्यंत तरंगत होते. यानंतर श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव राग खमाजमधील बनारसी दादरा त्यांनी सादर केला. पुढे ‘नरवर कृष्णा समान...’ या नाट्यपदावरील सादरीकरणाने त्यांनी वादनाचे समापन केले. कलाकार व श्रोते यांना स्वरतालातून शब्दांपलीकडचा अनामिक सुखद आनंद देणाऱ्या या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली.

 

टॅग्स :Kalidas Festivalकालिदास महोत्सवmusicसंगीत