शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कालीदास महोत्सव : अंतर्मनात गुंजले ‘संगीता’च्या व्हायोलिनचे सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 01:34 IST

व्हायोलिनमधून निघणाऱ्या हळुवार स्वरांमध्ये सूर, ताल आणि लय सामावलेले आहे. मानवी मनातल्या सगळ्या भावनांची, संवेदनांची सुरेल अशी अभिव्यक्त म्हणजे डॉ. संगीता शंकर यांचे व्हायोलिन वादन. त्यांच्या हातांचा स्पर्श त्या वाद्याला झाला की दैवी सुरातून एक विश्व निर्माण होते. अंतर्मनाच्या खोलवर गुंजणाऱ्या दैवी सुरांची अनुभूती गुरुवारी रसिकांनी अनुभवली. अगदी तल्लीन होऊन हा माधुर्याचा हा ठेवा सुरेश भट सभागृहात उपस्थित रसिकांना सुखद आनंद देऊन गेला.

ठळक मुद्देसुमधूर लयवादनाची रसिकांना भुरळ : मुलगी नंदिनी यांनीही दिली सुमधूर साथ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्हायोलिनमधून निघणाऱ्या हळुवार स्वरांमध्ये सूर, ताल आणि लय सामावलेले आहे. मानवी मनातल्या सगळ्या भावनांची, संवेदनांची सुरेल अशी अभिव्यक्त म्हणजे डॉ. संगीता शंकर यांचे व्हायोलिन वादन. त्यांच्या हातांचा स्पर्श त्या वाद्याला झाला की दैवी सुरातून एक विश्व निर्माण होते. अंतर्मनाच्या खोलवर गुंजणाऱ्या दैवी सुरांची अनुभूती गुरुवारी रसिकांनी अनुभवली. अगदी तल्लीन होऊन हा माधुर्याचा हा ठेवा सुरेश भट सभागृहात उपस्थित रसिकांना सुखद आनंद देऊन गेला.सांगता समारोहाच्या सुरुवातीच्या सत्रात त्यांचे व्हायोलिन वादन होते; सोबत त्यांची कन्या उदयोन्मुख व्हायोलिनवादक नंदिनी हीसुद्धा होती. तबल्यावर साथ दिली पंडिता अनुराधा पाल यांनी. सतार, सरोद आणि व्हायोलिन या तंतुवाद्यांचा स्थायीभावच वेगळा आहे. गायनातील शब्द व व त्यांच्या मर्यादित अर्थाच्या बंधनातून पूर्णपणे मोकळी असणारी ही वाद्ये आहेत. एन. राजम यांच्याकडून लाभलेला मधुर वादनाचा वारसा डॉ. संगीता यांनी असाधारण रियाज, चिंतन आणि रागांच्या अभ्यासातून अधिक उंचीवर नेऊन समृद्ध केला. ‘अभिज्ञान शाकुंतलम्’ या संकल्पनेवरील महोत्सवात ‘राग शामकल्याण’सह त्यांनी व्हायोलिन वादनाला सुरुवात केली. ‘रटन लगी शाम नाम की...’ या बंदिशीसह विलंबित एकताल, आडा चारताल यावर वाढवत द्रुत आडा चारतालपर्यंत ही लय शिखर गाठत गेली. बनारस घराण्याच्या शैलीतील हे वादन ४० ते ४५ मिनिटे निनादत होते आणि कुणी संमोहित केल्यासारखी जादू श्रोत्यांवर होती. हळुवार सुरुवात होत वेगवान टोकावर नेऊन ही बंदिश त्यांनी संपविली. लयबद्ध वादन, लयकारीचा अनोखा डौल, स्वरांवरील अचूक पकड व यातून निर्माण झालेले मुलायम स्वरध्वनी रसिकांच्या कानामनातून हृदयापर्यंत तरंगत होते. यानंतर श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव राग खमाजमधील बनारसी दादरा त्यांनी सादर केला. पुढे ‘नरवर कृष्णा समान...’ या नाट्यपदावरील सादरीकरणाने त्यांनी वादनाचे समापन केले. कलाकार व श्रोते यांना स्वरतालातून शब्दांपलीकडचा अनामिक सुखद आनंद देणाऱ्या या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली.

 

टॅग्स :Kalidas Festivalकालिदास महोत्सवmusicसंगीत