शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांचे श्रद्धांजली कलश राजधानी एक्स्प्रेसने पोहोचले नागपुरात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:07 IST

नागपूर : कारगिलच्या युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी बंगळुरवरून आलेले २५ श्रद्धांजली कलश शनिवारी दुपारी २.३० वाजता ...

नागपूर : कारगिलच्या युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी बंगळुरवरून आलेले २५ श्रद्धांजली कलश शनिवारी दुपारी २.३० वाजता राजधानी एक्स्प्रेसने नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. यावेळी महापौरांसह उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजली कलशाला अभिवादन केले. तर रेल्वेस्थानकावरील प्रवाशांनीही भारत माता की जयच्या घोषणा दिल्यामुळे रेल्वेस्थानकाच्या परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

कारगिल विजय दिनानिमित्त २६ जुलै रोजी कारगिलच्या युद्धात शहिद झालेल्या सैनिकांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी बंगळुरवरून २५ श्रद्धांजली कलश ०२६९१ बंगळुर-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसने नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक एकवर पोहोचले. सिटीझन सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने शहिदांच्या स्मृतीस्थळी अर्पण करण्यासाठी हे कलश दिल्लीला नेण्यात येत आहे. या कलशात विविध २७ नद्यांचे पवित्र जल आणि देशभरातील विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या विविध फुलांच्या पाकळ्या ठेवण्यात आल्या होत्या. २६ जुलैला हे श्रद्धांजली कलश दिल्लीच्या इंडिया गेट येथे पोहोचणार आहे. त्यानंतर हे पवित्र जल आणि फुलांच्या पाकळ्या शहिदांच्या स्मारकावर अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी श्रद्धांजली कलश घेऊन जात असलेले कॅप्टन एस. सी. भंडारी, दिनेश, बी. पी. शिवकुमार, नारायण, कुमार स्वामी प्लॅटफार्मवर उतरले. रेल्वेस्थानकावर श्रद्धांजली कलशाला अभिवादन करण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी, रेल्वेस्थानकाचे संचालक दिनेश नागदेवे, उपस्टेशन व्यवस्थापक दत्तुजी गाडगे, कारगिल युद्धातील शहिद राजदेव रेड्डी यांची कन्या यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. वीर जवानांच्या बलिदानामुळे आपण सुखाचे आयुष्य जगत असून या शहीद जवानांचे बलिदान विसरणे अशक्य असल्याची भावना महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केली. रेल्वेस्थानकावर उपस्थित प्रवाशांनीही श्रद्धांजली कलशाला अभिवादन केले. यावेळी प्रवाशांनी भारत माता की जयच्या घोषणा देऊन रेल्वेस्थानकाचा परिसर दणाणून टाकला. त्यानंतर हे श्रद्धांजली कलश घेऊन राजधानी एक्स्प्रेस दिल्लीकडे रवाना झाली.

...............