शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

शहिदांचे श्रद्धांजली कलश राजधानी एक्स्प्रेसने पोहोचले नागपुरात ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:07 IST

नागपूर : कारगिलच्या युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी बंगळुरवरून आलेले २५ श्रद्धांजली कलश शनिवारी दुपारी २.३० वाजता ...

नागपूर : कारगिलच्या युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी बंगळुरवरून आलेले २५ श्रद्धांजली कलश शनिवारी दुपारी २.३० वाजता राजधानी एक्स्प्रेसने नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. यावेळी महापौरांसह उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजली कलशाला अभिवादन केले. तर रेल्वेस्थानकावरील प्रवाशांनीही भारत माता की जयच्या घोषणा दिल्यामुळे रेल्वेस्थानकाच्या परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

कारगिल विजय दिनानिमित्त २६ जुलै रोजी कारगिलच्या युद्धात शहिद झालेल्या सैनिकांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी बंगळुरवरून २५ श्रद्धांजली कलश ०२६९१ बंगळुर-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसने नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक एकवर पोहोचले. सिटीझन सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने शहिदांच्या स्मृतीस्थळी अर्पण करण्यासाठी हे कलश दिल्लीला नेण्यात येत आहे. या कलशात विविध २७ नद्यांचे पवित्र जल आणि देशभरातील विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या विविध फुलांच्या पाकळ्या ठेवण्यात आल्या होत्या. २६ जुलैला हे श्रद्धांजली कलश दिल्लीच्या इंडिया गेट येथे पोहोचणार आहे. त्यानंतर हे पवित्र जल आणि फुलांच्या पाकळ्या शहिदांच्या स्मारकावर अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी श्रद्धांजली कलश घेऊन जात असलेले कॅप्टन एस. सी. भंडारी, दिनेश, बी. पी. शिवकुमार, नारायण, कुमार स्वामी प्लॅटफार्मवर उतरले. रेल्वेस्थानकावर श्रद्धांजली कलशाला अभिवादन करण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी, रेल्वेस्थानकाचे संचालक दिनेश नागदेवे, उपस्टेशन व्यवस्थापक दत्तुजी गाडगे, कारगिल युद्धातील शहिद राजदेव रेड्डी यांची कन्या यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. वीर जवानांच्या बलिदानामुळे आपण सुखाचे आयुष्य जगत असून या शहीद जवानांचे बलिदान विसरणे अशक्य असल्याची भावना महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केली. रेल्वेस्थानकावर उपस्थित प्रवाशांनीही श्रद्धांजली कलशाला अभिवादन केले. यावेळी प्रवाशांनी भारत माता की जयच्या घोषणा देऊन रेल्वेस्थानकाचा परिसर दणाणून टाकला. त्यानंतर हे श्रद्धांजली कलश घेऊन राजधानी एक्स्प्रेस दिल्लीकडे रवाना झाली.

...............