शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

काचूरवाही-हमलापुरी मार्ग खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यातील काचूरवाही-हाताेडी-नगरधन मार्गावर तयार झालेले खड्डे व त्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रुग्णांसह नागरिकांचे हाल ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : तालुक्यातील काचूरवाही-हाताेडी-नगरधन मार्गावर तयार झालेले खड्डे व त्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रुग्णांसह नागरिकांचे हाल हाेत आहेत. या मार्गाच्या दुरुस्तीला प्रशासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली आहे. मात्र, काम सुरू करण्याला मुहूर्त मिळत नसल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे.

या आठ किमीच्या खड्डेमय मार्गावरून गराेदर मातांसह इतर रुग्णांना नगरधन येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचाराला नेण्यासाठी तसेच बाळांच्या लसीकरणासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागताे. काचूरवाही, हाताेडी, संग्रामपूर येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी या मार्गाने नागपूरला ये-जा करावी लागते. दुरुस्तीअभावी हा मार्ग खड्ड्यात गेला असून, पावसामुळे त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यातूनच शेतकऱ्यांसह इतर नागरिक, रुग्ण व विद्यार्थ्यांना राेज मार्गक्रमण करावे लागते.

या मार्गाच्या दुरुस्तीला मंजुरी मिळाल्याची माहिती या भागातील लाेकप्रतिनिधी वारंवार देत असून, निविदा प्रक्रिया पूर्ण केल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. मात्र, दुरुस्तीला अद्यापही सुरुवात करण्यात आली नाही, अशी माहिती नागरिकांनी दिली. काचुरवाही, मसला, वडेगाव, चोखाळा, किरणापूर, खंडाळा, लोहडाेंगरी या आदिवासीबहुल गावांमधील गराेदर माता व बाळांना उपचारासाठी या मार्गाने रुग्णवाहिकेद्वारे नगरधन येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात ने-आण करावी लागत असून, खड्ड्यांमुळे त्यांना त्रास हाेत असल्याची माहिती काचुरवाही येथील शुभम कामडे यांनी दिली.

महिलांसह छाेटी मुले व नागरिकांना हाेणारा त्रास व अपघाताची शक्यता लक्षात घेता या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सरपंच शैलेश राऊत, शिशुपाल अतकरे, अजय सहारे, मनोज देशमुख, किशोर चौधरी, मंगेश बावनकुळे, विनोद केळवदे, धनराज लिल्हारे, धनिराम श्याम, देवीदास सहारे, आशिष लिल्हारे यांच्यासह हातोडी, लोहडाेंगरी, हमलापुरी येथील नागरिकांनी केली आहे.

...

गाैण खनिजाची ओव्हरलाेड वाहतूक

हा मार्ग नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाला जाेडला असल्याने नागपूर, कामठी व कन्हानकडे जाणारे रेती, मुरूम व इतर गाैण खनिजांचे ओव्हरलाेड ट्रक या मार्गावरून २४ तास धावतात. त्यामुळे या मार्गाची दैन्यावस्था झाली आहे. या मार्गावर महलापुरी शिवारातील नदीवर असलेला पूल कमी उंचीचा असल्याने त्यावरून पुराचे पाणी वाहते. त्यामुळे शेतकऱ्यांसह काॅटन मिलमधील कामगारांना तासनतास अडकून पडावे लागत असल्याने या पुलाची उंची वाढविण्याचीही मागणी केली जात आहे. सांड नदीवरील पुलाच्या सळया उघड्या पडल्या असून, त्या धाेकादायक ठरत आहेत.