शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पेडगावकर यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी

By admin | Updated: June 22, 2017 02:19 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अवमानना प्रकरणामध्ये समाज कल्याण विभागाचे

हायकोर्ट : समाज कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अवमानना प्रकरणामध्ये समाज कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव एस. ए. पेडगावकर यांच्याविरुद्ध १५ हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट जारी केला. पंचायत समितीस्तरावर मागासवर्गीय समाजाच्या योजना राबविण्यासाठी सहा महिन्यांमध्ये विस्तार अधिकारी (समाज कल्याण) पद निर्माण करण्याची ग्वाही राज्य शासनाने २४ फेब्रुवारी २०१६ रोजी न्यायालयाला दिली होती. परंतु, हे पद अद्याप निर्माण करण्यात आले नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मनोज वाळके यांनी अवमानना याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने गेल्या मार्चमध्ये पेडगावकर यांना अवमानना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. ही नोटीस तामील होऊनही पेडगावकर यांनी न्यायालयात उपस्थिती दर्शविली नाही. त्यामुळे न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट बजावून त्यांना दणका दिला. प्रकरणावर तीन आठवड्यांनंतर पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली असून पेडगावकर यांना त्यावेळी न्यायालयात उपस्थित राहून जामीनपात्र वॉरंट रद्द करून घ्यावा लागेल. अन्यथा त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावला जाईल. तसे झाल्यास त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले जाईल. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती आदी समाजाकरिता समाज कल्याण विभागाच्या विविध योजना आहेत. या योजना व योजनेतर कामांसाठी अर्थसंकल्पामध्ये कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येते. जिल्हा परिषद स्तरावर योजना राबविण्याचे काम समाज कल्याण अधिकारी करीत असतात. पंचायत समिती स्तरावर योजना राबविण्यासाठी विस्तार अधिकारी (समाज कल्याण) हे पद निर्माण करणे आवश्यक आहे. परंतु, हे पद नसल्यामुळे योजना राबविण्यात अडचणी येत आहेत. मागासवर्गीय नागरिक योजनांच्या लाभापासून वंचित रहात आहेत. पंचायत समिती स्तरावर कृषी, शिक्षण, आरोग्य, पंचायत, सांख्यिकी, डीआरडीए इत्यादी विभागासाठी विस्तार अधिकाऱ्यांची स्वतंत्र पदे आहेत. केवळ समाज कल्याण विभागासाठी विस्तार अधिकारी पद नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली. याचिकाकर्ता दुसऱ्यांदा हायकोर्टात वाळके यांनी या विषयावर २०१५ मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. शासनाच्या संबंधित ग्वाहीनंतर न्यायालयाने याचिका निकाली काढली होती. परंतु, शासनाने ग्वाहीचे पालन केले नसल्याने वाळके यांनी दुसऱ्यांदा न्यायालयात धाव घेतली आहे.