शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

‘जंक फूड’ वाढवतेय आजारांचे ‘गूढ’

By admin | Updated: April 7, 2015 02:18 IST

नागपूरकरांमध्ये बैठे काम करणाऱ्या जीवनशैलीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. साधारण २५ ते ३० टक्के श्रमजीवी लोक

३० टक्के नागपूरकर आजारांच्या विळख्यात : अ‍ॅबनॉर्मलिटी रिपोर्टमधील धक्कादायक तथ्य नागपूर : नागपूरकरांमध्ये बैठे काम करणाऱ्या जीवनशैलीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. साधारण २५ ते ३० टक्के श्रमजीवी लोक रस्ते, कॅफे व इतर बाह्य ठिकाणांवरील जंक फूडवर अवलंबून राहतात. परिणामी, हे लोक लठ्ठपणा या आजारापासून पीडित आहेत. त्यांच्यामध्ये विविध आजारांचा धोका वाढला आहे. आयर्नच्या कमी सेवनासह अपुऱ्या आहारामुळे अ‍ॅनेमिया व जीवनसत्त्वाची कमतरता असण्याची प्रकरणे वाढली आहेत. एका सर्वेक्षणात २४ टक्के पुरुष व १९ टक्के स्त्रियांमध्ये जीवनसत्त्व ब१२ ची कमतरता आढळून आली आहे. ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्यानिमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ‘शेतापासून ताटापर्यंत अन्नाची सुरक्षितता’ यावर भर दिला आहे. इंडस हेल्थ प्लस आणि वितरण भागीदार नागपूर स्कॅन सेंटरद्वारे जानेवारी २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या दरम्यान ९३२१ पुरुष व ८३२६ स्त्रियांची तपासणी करून ‘अ‍ॅबनॉर्मलिटी रिपोर्ट-२०१५’ सादर केला. यात हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ३१.९ टक्के पुरुष मधुमेहीभारतामध्ये जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रु ग्ण आढळतात आणि मृत्यूच्या कारणामध्ये मधुमेह हे सर्वाधिक कारणांपैकी एक आहे. मधुमेह ही व्याधी केवळ रक्तातील वाढलेली शर्करा या स्वरूपात नसून तो शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना हळूहळू निकामी करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मधुमेह होण्याच्या कारणांमध्ये चुकीचा आहार व व्यायामाचा अभाव ही दोन महत्त्वाची करणे आहेत. शहरात ३१.०९ टक्के पुरुष तर २६.२३ टक्के महिला या व्याधीने पीडित आहेत. २८ ते ३५ वर्षीय स्त्रियांमध्ये वाढतोय लठ्ठपणाशहरात लठ्ठपणाच्या केसेसमध्ये दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढ होत आहे. तणाव, जंक व तेलकट फूडचे अधिक प्रमाणात सेवन यासोबतच आठवड्यामधून दोनदा किंवा तीनदा जेवणासाठी बाहेर जाणे अशा कारणांमुळे मुख्यत: २८ ते ३५ वर्षे वयोगटातील स्त्रियांना लठ्ठपणाचा धोका असल्याचे आढळून आले आहे. जीवनसत्त्वाचे कमी सेवन व चरबीयुक्त पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन अशा खाण्याच्या सवयींमुळे २५ ते ३० टक्के युवा पिढींच्या जीवनात आजाराचा धोका वाढला आहे. २३ टक्के स्त्री-पुरुषांना डोळ््यांचा विकार लोहयुक्त आहाराच्या अभावामुळे २३.६९ टक्के पुरुष व २३.८८ टक्के स्त्रियांमध्ये डोळ्यांविषयक समस्या असल्याचे आढळून आले. वेळेचा अभाव, १० तासांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत लॅपटॉप्स व संगणकांचा वापर. रात्री दोन-तीन तास मोबाईलचा वापर यामुळे मुख्यत: २० ते २५ वर्षे वयोगटातील युवा पिढीच्या दृष्टीवर परिणाम झाल्याचे आढळून आले. लोहयुक्त आहाराच्या कमी सेवनामुळे १९.३६ टक्के स्त्रिया अ‍ॅनेमियापासून पीडित आहेत. हृदयविकारात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिकआईच्या गर्भामध्ये असल्यापासून हृदयाचे काम सुरू होते, ते अखेरचा श्वास घेईपर्यंत सुरूच असते. जन्मापासून अखेरपर्यंत अव्याहतपणे कार्यरत असणाऱ्या शरीराचा हा एकमेव महत्त्वपूर्ण असा अवयव आहे, त्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. असे असताना शहरातील २५.२१ टक्के पुरुष हृदयविकाराने पीडित आहेत. धक्कादायक म्हणजे, यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या सर्वात जास्त आहे. २६.२६ टक्के महिला या आजाराने पीडित आहेत.