शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
3
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
6
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
7
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
8
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
9
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
10
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
11
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
12
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
13
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
14
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
15
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
16
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
17
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
18
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
19
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
20
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

कनिष्ठ महाविद्यालयांनी परस्पर सुरू केले अकरावीचे प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:07 IST

नागपूर : दररवर्षी अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया दहावीचा निकाल लागल्यानंतर सुरू होते. राज्यात कोरोना संसर्गाचे वादळ घोंगावत असल्यामुळे सुरक्षेचा उपाय ...

नागपूर : दररवर्षी अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया दहावीचा निकाल लागल्यानंतर सुरू होते. राज्यात कोरोना संसर्गाचे वादळ घोंगावत असल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून शासनाने दहावीची परीक्षा रद्द करून दिलासा दिला. असे असले तरी शिक्षण संचालनालयातर्फे अजूनही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत निर्णय झालेला नाही. पण दुसरीकडे काही कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावीचे प्रवेश परस्पर सुरू केले आहे. अशातच उच्च न्यायालयाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्याबाबत शासनावर ताशेरे ओढल्याने पुन्हा परीक्षा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहे.

गेल्यावर्षी कोरोनामुळे दहावीचा भूगोलचा पेपर रद्द केला होता. यंदाही मार्च महिन्यात कोरोनाची संख्या वाढू लागल्याने सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्याच धर्तीवर राज्याच्या शिक्षण विभागाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले. त्यामुळे दहावीच्या परीक्षेबाबत संभ्रम आहे.

पण काही उच्च माध्यमिक विद्यालयांनी २०२१-२२ या सत्रातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. गुगल फॉर्मच्या माध्यमातून अर्ज मागविणे सुरू केले असल्याचे शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे राज्यातील सहा महानगर क्षेत्रात अकरावीचे प्रवेश केंद्रीय प्रवेश पद्धतीने करण्यात येतात. उर्वरीत महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर प्रवेश केले जातात. संचालनालयाने स्पष्ट केले की अकरावीच्या प्रवेशाची कार्यपद्धती अजूनही अंतिम करण्यात आलेली नाही.

- विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

शिक्षण संचालनालयाने शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना केल्या की, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सविस्तर दिशानिर्देश, शासन आदेश प्राप्त झाल्यानंतरच कळविण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाने प्रवेश प्रक्रिया आपल्या स्तरावर सुरू करू नये. विद्यार्थी व पालकांची दिशाभूल होईल, अशा प्रकारच्या सूचना दिल्या जावू नये.