शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

कनिष्ठ महाविद्यालयांनी परस्पर सुरू केले अकरावीचे प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:07 IST

नागपूर : दररवर्षी अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया दहावीचा निकाल लागल्यानंतर सुरू होते. राज्यात कोरोना संसर्गाचे वादळ घोंगावत असल्यामुळे सुरक्षेचा उपाय ...

नागपूर : दररवर्षी अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया दहावीचा निकाल लागल्यानंतर सुरू होते. राज्यात कोरोना संसर्गाचे वादळ घोंगावत असल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून शासनाने दहावीची परीक्षा रद्द करून दिलासा दिला. असे असले तरी शिक्षण संचालनालयातर्फे अजूनही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत निर्णय झालेला नाही. पण दुसरीकडे काही कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावीचे प्रवेश परस्पर सुरू केले आहे. अशातच उच्च न्यायालयाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्याबाबत शासनावर ताशेरे ओढल्याने पुन्हा परीक्षा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहे.

गेल्यावर्षी कोरोनामुळे दहावीचा भूगोलचा पेपर रद्द केला होता. यंदाही मार्च महिन्यात कोरोनाची संख्या वाढू लागल्याने सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्याच धर्तीवर राज्याच्या शिक्षण विभागाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले. त्यामुळे दहावीच्या परीक्षेबाबत संभ्रम आहे.

पण काही उच्च माध्यमिक विद्यालयांनी २०२१-२२ या सत्रातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. गुगल फॉर्मच्या माध्यमातून अर्ज मागविणे सुरू केले असल्याचे शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे राज्यातील सहा महानगर क्षेत्रात अकरावीचे प्रवेश केंद्रीय प्रवेश पद्धतीने करण्यात येतात. उर्वरीत महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर प्रवेश केले जातात. संचालनालयाने स्पष्ट केले की अकरावीच्या प्रवेशाची कार्यपद्धती अजूनही अंतिम करण्यात आलेली नाही.

- विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

शिक्षण संचालनालयाने शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना केल्या की, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सविस्तर दिशानिर्देश, शासन आदेश प्राप्त झाल्यानंतरच कळविण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाने प्रवेश प्रक्रिया आपल्या स्तरावर सुरू करू नये. विद्यार्थी व पालकांची दिशाभूल होईल, अशा प्रकारच्या सूचना दिल्या जावू नये.