शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

जेपींच्या उपदेशामुळे जीवनाला शिस्त लागली

By admin | Updated: October 17, 2014 01:02 IST

एकीकडे जगताना अन्न मिळत नाही आणि दुसरीकडे पोट भरलेल्या व्यक्ती अन्न फेकून देतात, श्रम करणाऱ्याला घाम गाळूनही कष्टाचे मोल मिळत नाही, अशा प्रकारच्या जयप्रकाश नारायण यांच्या

दीपमाला कुबडे : ‘आठवणीतील जेपी’ यावर व्याख्याननागपूर : एकीकडे जगताना अन्न मिळत नाही आणि दुसरीकडे पोट भरलेल्या व्यक्ती अन्न फेकून देतात, श्रम करणाऱ्याला घाम गाळूनही कष्टाचे मोल मिळत नाही, अशा प्रकारच्या जयप्रकाश नारायण यांच्या शिबिरातून झालेल्या उपदेशामुळे जीवनाला शिस्त लागली, असे प्रतिपादन जयप्रकाश नारायण यांच्या मानसकन्या प्रा. दीपमाला कुबडे यांनी आज येथे केले.सर्वोदय आश्रमाच्या वतीने ‘आठवणीतील जेपी’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. दमयंती पांढरीपांडे होत्या. प्रा. दीपमाला कुबडे म्हणाल्या, तरुणवयात अनेक मोठ्या व्यक्तींच्या सहवासाचे भाग्य मला लाभले. १९४२ च्या क्रांतीत जेपींनी भूमिगत राहून हिंदुस्थान ढवळून टाकला. ते स्वभावाने प्रेमळ होते. दुष्काळी परिस्थितीत त्यांच्यासोबत कपडे गोळा करून ते गरिबांना वाटले. त्यांच्या विचारांचा, कार्याचा प्रभाव मनावर झाला आणि मी त्यांची शिष्य झाले. इंदूरच्या शिबिरात त्यांनी श्रमाचे महत्त्व पटवून दिले. गरिबी काय असते हे सांगणारे जेपींचे भाषण कधीच विसरूशकत नाही. त्या शिबिरानंतर माझ्यात आमूलाग्र बदल झाला. त्यानंतर तरुण शांती सेनेशिवाय इतर कुठल्याच उपक्रमात सहभागी झाले नाही. गावोगावी शिबिरे घेण्यास सुरुवात केली. एकदा युवक काँग्रेसचे १५० जण हातात काठ्या घेऊन चालून आले होते. परंतु धैर्याने त्यांचा सामना केला. शिबिरात आम्ही एकमेकांना पुस्तके वाचण्यासाठी देत होतो. जेपींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पदयात्रा काढली आणि २५०० डाकू आत्मसमर्पणास तयार झाले. या कार्यात कुठेही वाईट अनुभव आले नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. दमयंती पांढरीपांडे यांनी गांधींच्या स्वराज्याच्या संकल्पनेला जेपींनी आकार दिल्याची माहिती दिली. संचालन डॉ. नलिनी निसळ यांनी केले. (प्रतिनिधी)