शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

जलालखेडा बसस्थानक काळोखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:07 IST

जलालखेडा : येथील बसस्थानक या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. गत आठ दिवसांपासून बसस्थानकावरील लाइट बंद असल्याने रात्रीच्या ...

जलालखेडा : येथील बसस्थानक या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. गत आठ दिवसांपासून बसस्थानकावरील लाइट बंद असल्याने रात्रीच्या वेळी सर्वत्र काळोख असतो. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. असे असताना परिवहन महामंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. जलालखेडा हे नरखेड तालुक्यातील बाजारपेठेचे मोठे गाव आहे. जवळपास ३० ते ४० गावातील नागरिक दररोज कामानिमित्त जलालखेडा येथे येतात. सोमेश्वर किल्ला देवस्थानात शेकडो भाविक दर्शन घेतात. मोठ्या प्रमाणात येथील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी काटोल, वरूड येथे जातात. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावर थांबावे लागते. परंतु, बसस्थानकावरील लाइट बंद असल्याने रात्रीच्या वेळी येथे प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषत: तरुण मुली आणि महिलांना येथे रात्रीच्या वेळी बसच्या प्रतीक्षेत अंधारात उभे राहताना अडचणीचे ठरत आहे. याकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

स्वच्छतेचा अभाव

जलालखेडा येथील बसस्थानक नेहमी अस्वच्छतेबाबत चर्चेत राहले आहे. येथील बसस्थानकावर नेहमी अस्वच्छता पाहायला मिळते. सर्वत्र कचरा पसरला आहे. लाखो रुपये खर्च करून केलेले स्वच्छतागृह अजूनही सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येथील बसस्थानकावर नियमित साफसफाई होणे गरजेचे आहे.

बसस्थानकावर रात्रीच्या वेळी दिवे बंद असणे दुर्दैवी आहे. शेकडो महिला प्रवासी बसस्थानकावर असतात. त्यामुळे दिवे सुरू असणे गरजेचे आहे. याबाबत संबंधितांना अवगत करण्यात आले आहे.

- प्रीतम कवरे, जिल्हा परिषद सदस्या

बसस्थानकावर दिवे नसल्याची माहिती नव्हती. शनिवारी सकाळी याबाबत माहिती मिळाली. दिवे नसल्याबाबतची माहिती देण्याची जबाबदारी तिथल्या कर्मचाऱ्यांची होती. परंतु, त्यांनी याबाबत अवगत केले नाही. माहिती मिळताच दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एफ. रंगारी, आगर व्यवस्थापक, काटोल