शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

‘आययूएमएस’मुळे काम वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 10:46 IST

सर्व विद्यापीठ एकाच ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’वर यावी तसेच कामामध्ये एकवाक्यता व सुलभता यावी यासाठी ‘आययूएमएस’ (इंडिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देमहाविद्यालयात ‘कोअर’ अंमलबजावणी समिती स्थापन करणे अनिवार्य दर आठवड्याला ‘अपडेट’ करावे लागणार

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्व विद्यापीठ एकाच ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’वर यावी तसेच कामामध्ये एकवाक्यता व सुलभता यावी यासाठी ‘आययूएमएस’ (इंडिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही प्रणाली लागू करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर दबाव येत आहे. ही प्रणाली लागू करताना विविध तांत्रिक आव्हाने तर आहेत, शिवाय महाविद्यालयांचे कामदेखील वाढणार आहे. प्रत्येक संलग्नित महाविद्यालयात अंतर्गत विशेष समिती स्थापन करावी लागणार असून त्यांच्यावरील कामाचे ओझे वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.प्रवेश, परीक्षा, निकाल इत्यादी संदर्भातील विविध समस्यांवर ‘एन्ड टू एन्ड’ तोडगा मिळावा यासाठी ‘आययूएमएस’ प्रणाली लागू करण्यात येणार असल्याचा दावा राज्य शासनाने केला होता. मागील वर्षी यासंदर्भात शासननिर्णयदेखील जारी करण्यात आला होता व काही विद्यापीठांमध्ये यासंदर्भात प्रयोगदेखील सुरू झाला. नागपूर विद्यापीठात मागील आठवड्यात संबंधित प्रणाली राबविण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीच्या लोकांनी सादरीकरणदेखील केले. मात्र ही प्रणाली राबविताना केवळ विद्यापीठच नव्हे तर महाविद्यालयांचे कामदेखील वाढणार आहे.‘आययूएमएस’साठी प्रत्येक महाविद्यालयांत ‘कोअर’ अंमलबजावणी समिती गठित करावी लागणार आहे. यात प्राचार्य किंवा उपप्राचार्य, प्रशासकीय सेलचा एक प्रतिनिधी, आयटी सेलचे दोन प्रतिनिधी, शिक्षक व विद्यार्थ्यांमधून प्रत्येकी दोन प्रतिनिधी राहणार आहेत. ‘आययूएमएस’ची अंमलबजावणी होईपर्यंत या समितीची दर आठवड्याला बैठक अनिवार्य आहे व तसा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवावा लागणार आहे. याशिवाय नियमितपणे प्रकल्पाची अंमलबजावणी, महाविद्यालयांतील विविध घटकांसमवेत नियमित बैठका, विद्यापीठासोबत समन्वय, प्रणाली राबविणाऱ्यांसमवेत संपर्क, महाविद्यालय व ‘महाआयटी’मधील समन्वय, इत्यादी जबाबदाऱ्या या समितीला पार पाडाव्यालागणार आहेत. नागपूर विद्यापीठातील अनेक संलग्नित महाविद्यालयांमध्ये आवश्यक प्रमाणात नियमित प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी नाहीत. अ़नेक ठिकाणी तर ‘आयटी टीम’चा कारभार एकाच व्यक्तीच्या भरवशावर सुरू आहे. अशा स्थितीत नियमांनुसार बºयाच महाविद्यालयांत ‘कोअर’ अंमलबजावणी समितीच स्थापन करणे हे मोठे आव्हान राहणार आहे. शिवाय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामदेखील वाढणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांकडून यासंदर्भात नाराजीचा सूर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी यांना संपर्क केला असता सध्या केवळ चर्चा सुरू असून अद्याप ‘आययूएमएस’बाबत अंतिम निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थी नामनिर्देशित कसे करणार ?‘कोअर’ अंमलबजावणी समितीमध्ये प्रत्येक महाविद्यालयात दोन विद्यार्थी असणे अनिवार्य आहे. परंतु या विद्यार्थ्यांचे समितीवर नामनिर्देशन करण्यासाठी त्यांची पात्रता काय हवी किंवा इतर काय आवश्यकता आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे यासंदर्भातदेखील नेमकी भूमिका स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे मत एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र