शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

कर्मठ लोकांनीच नागपूरचा गौरव वाढविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सामाजिक जीवनातील तटस्थवृत्ती आणि विचारांवरील कर्मठ लोकांमुळेच नागपूरचा गौरव देशात वाढला असल्याची भावना माजी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सामाजिक जीवनातील तटस्थवृत्ती आणि विचारांवरील कर्मठ लोकांमुळेच नागपूरचा गौरव देशात वाढला असल्याची भावना माजी खा. गेव्ह आवारी यांनी व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर विभागीय केंद्रातर्फे सोमवारी सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये ज्येष्ठ संपादक व हिंदुत्वाचे भाष्यकार बाबूराव उपाख्य मा.गो. वैद्य आणि विंग कमांडर अशोक मोटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी आवारी आपल्या भावना व्यक्त करीत होते.

संघाचे सर्वच मोठे नेते महात्मा गांधींचे अनुयायी होते आणि आजही त्यांच्या विचारांचे अनुसरण करतात. हिंदुस्तानात राहतो म्हणून आपण सर्व हिंदू आहोत, हे खरेच आहे. मात्र, भारतीयत्वाचा विचार करणे अपेक्षित आहे. मा.गो. हे त्याच धाटणीतील होते, असे आवारी यावेळी म्हणाले. अशोक मोटे हेही प्रखरवृत्तीचे होते. मा.गो. जसे विचारांनी उड्डाण भरायचे तसेच मोटे सैनिकी स्पिरिटने उड्डाण भरायचे, असे ते म्हणाले. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे गिरीश गांधी होते. यावेळी ज्येष्ठ संपादक ल. त्र्यं. जोशी, मेघनाद बोधनकर, श्रीपाद अपराजित, देवेंद्र गावंडे, प्रदीप मैत्र यांनीही आपल्या भावना व्यक्त करीत दोघांनाही आदरांजली वाहिली. संचालन ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांनी केले.

..........