शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी विरोधी कायदे रद्द केल्याशिवाय भले नाही

By admin | Updated: January 23, 2017 02:14 IST

भारतात लागू असलेले सिलिंग कायदा, जीवनावश्यक वस्तू कायदा आणि जमीन अधिग्रहणाचा कायदा, हे तीन कायदे शेतकऱ्यांसाठी गळफास आहेत.

अमर हबीब : शेतकऱ्यांसाठी आत्मक्लेश आंदोलन नागपूर : भारतात लागू असलेले सिलिंग कायदा, जीवनावश्यक वस्तू कायदा आणि जमीन अधिग्रहणाचा कायदा, हे तीन कायदे शेतकऱ्यांसाठी गळफास आहेत. या कायद्याचे दगड मानगुटीवर ठेवून शेतकऱ्यांच्या संरक्षणाच्या गोष्टी करण्यात अर्थ नाही. या कायद्याच्या बेड्या शेतकऱ्यांना संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवणाऱ्या आहेत. या बेड्या तोडल्याशिवाय मदत आणि कल्याणकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत कधीच पोहोचणार नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने हे तीन कायदे तत्काळ रद्द करावेत, असे निवेदन शेती तज्ज्ञ आणि विचारवंत अमर हबीब यांनी केले. जनमंच या सामाजिक संस्थेसह विविध संघटनांतर्फे आत्मक्लेश अभियान-२०१७ अंतर्गत संविधान चौक येथे शेतकऱ्यांच्या मुलांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले. यावेळी अमर हबीब बोलत होते. कुणालाही त्याचा व्यवसाय करण्यास बंधन नाही. मात्र सिलिंग कायद्याने शेतकऱ्यांवर ते बंधन घातले आहे. जमीन अधिग्रहण कायद्याने शेतकऱ्यांना विचारात न घेता, त्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जातात. कोणत्याही वादळाचा फटका जसा दुबळ्या माणसांनाच बसतो, तसा नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नोटाबंदीच्या ५० दिवसानंतर पंतप्रधान शेतकऱ्यांसाठी काही मोठी घोषणा करतील, अशी आशा होती. मात्र त्यांनी ६० दिवसाच्या व्याजमाफीची घोषणा केली. ही घोषणा राजाला शोभणारी नाही तर चुकीने राजपद भेटलेल्या माणसांसारखी आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली. यावेळी जनमंचचे अ‍ॅड. अनिल किलोर, प्रा. शरद पाटील, अभिजित फाळके, अ‍ॅड. सुभाष खंडागळे, प्रकाश इटनकर, सतीश देशमुख, अविनाश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. आंदोलनात जनमंच, लढा संघटना, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, शेतकरी आधार फाऊंडेशन, संभाजी ब्रिगेड, भूमिपुत्र शेतकरी संघटना आदी संघटनांनी सहभाग घेतला. अभिजित फाळके यांनी प्रास्ताविक के ले. तीन वर्षे दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी चांगले पीक आल्याने चांगले दिवस येतील, असे वाटत होते. मात्र नोटाबंदीने त्यांना पुन्हा संकटात टाकल्याची टीका त्यांनी केली.(प्रतिनिधी) शेतकऱ्यांवर नोटाबंदीचा वज्राघात नोटाबंदीच्या निर्णयाचे अल्पकालीन परिणाम अतिशय भयानक असून, यामध्ये शेतकरी पुरता कोलमडला आहे. प्रसार माध्यमांनी मध्यमवर्गीयांचे दु:ख मांडले, मात्र शेतकऱ्यांकडे कुणीही लक्ष दिले नाही. दोन वर्षे दुष्काळात गेल्यावर एक वर्ष चांगले पीक येते. तसे यावर्षी चांगले पीक आले होते. मात्र सरकारने ऐन हंगामाच्या काळात नोटाबंदीचा वज्राघात शेतकऱ्यांवर केला. क्रिकेटच्या स्कोअरप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मात्र कुणाला देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांना आधार देणारे कायदेही शेतकरीविरोधी आणि इतरांनाच फायदा देणारे आहेत. शेतकऱ्यांना ७० हजार कोटींची कर्जमाफी केल्यावर गहजब करणाऱ्या उद्योगपतींना २४ लाख कोटींचे कर्ज माफ झाल्यावर ब्रही काढत नाही. सरकार कोणाचेही असो शेतकरीहिताचा विचार कुणी करीत नाही. या पार्श्वभूमीवर उपाययोजना झाल्या नाही तर प्रचंड संकटात सापडलेले शेतकरी पुन्हा आत्महत्या करतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.