शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

शेतकरी विरोधी कायदे रद्द केल्याशिवाय भले नाही

By admin | Updated: January 23, 2017 02:14 IST

भारतात लागू असलेले सिलिंग कायदा, जीवनावश्यक वस्तू कायदा आणि जमीन अधिग्रहणाचा कायदा, हे तीन कायदे शेतकऱ्यांसाठी गळफास आहेत.

अमर हबीब : शेतकऱ्यांसाठी आत्मक्लेश आंदोलन नागपूर : भारतात लागू असलेले सिलिंग कायदा, जीवनावश्यक वस्तू कायदा आणि जमीन अधिग्रहणाचा कायदा, हे तीन कायदे शेतकऱ्यांसाठी गळफास आहेत. या कायद्याचे दगड मानगुटीवर ठेवून शेतकऱ्यांच्या संरक्षणाच्या गोष्टी करण्यात अर्थ नाही. या कायद्याच्या बेड्या शेतकऱ्यांना संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवणाऱ्या आहेत. या बेड्या तोडल्याशिवाय मदत आणि कल्याणकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत कधीच पोहोचणार नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने हे तीन कायदे तत्काळ रद्द करावेत, असे निवेदन शेती तज्ज्ञ आणि विचारवंत अमर हबीब यांनी केले. जनमंच या सामाजिक संस्थेसह विविध संघटनांतर्फे आत्मक्लेश अभियान-२०१७ अंतर्गत संविधान चौक येथे शेतकऱ्यांच्या मुलांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले. यावेळी अमर हबीब बोलत होते. कुणालाही त्याचा व्यवसाय करण्यास बंधन नाही. मात्र सिलिंग कायद्याने शेतकऱ्यांवर ते बंधन घातले आहे. जमीन अधिग्रहण कायद्याने शेतकऱ्यांना विचारात न घेता, त्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जातात. कोणत्याही वादळाचा फटका जसा दुबळ्या माणसांनाच बसतो, तसा नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नोटाबंदीच्या ५० दिवसानंतर पंतप्रधान शेतकऱ्यांसाठी काही मोठी घोषणा करतील, अशी आशा होती. मात्र त्यांनी ६० दिवसाच्या व्याजमाफीची घोषणा केली. ही घोषणा राजाला शोभणारी नाही तर चुकीने राजपद भेटलेल्या माणसांसारखी आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली. यावेळी जनमंचचे अ‍ॅड. अनिल किलोर, प्रा. शरद पाटील, अभिजित फाळके, अ‍ॅड. सुभाष खंडागळे, प्रकाश इटनकर, सतीश देशमुख, अविनाश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. आंदोलनात जनमंच, लढा संघटना, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, शेतकरी आधार फाऊंडेशन, संभाजी ब्रिगेड, भूमिपुत्र शेतकरी संघटना आदी संघटनांनी सहभाग घेतला. अभिजित फाळके यांनी प्रास्ताविक के ले. तीन वर्षे दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी चांगले पीक आल्याने चांगले दिवस येतील, असे वाटत होते. मात्र नोटाबंदीने त्यांना पुन्हा संकटात टाकल्याची टीका त्यांनी केली.(प्रतिनिधी) शेतकऱ्यांवर नोटाबंदीचा वज्राघात नोटाबंदीच्या निर्णयाचे अल्पकालीन परिणाम अतिशय भयानक असून, यामध्ये शेतकरी पुरता कोलमडला आहे. प्रसार माध्यमांनी मध्यमवर्गीयांचे दु:ख मांडले, मात्र शेतकऱ्यांकडे कुणीही लक्ष दिले नाही. दोन वर्षे दुष्काळात गेल्यावर एक वर्ष चांगले पीक येते. तसे यावर्षी चांगले पीक आले होते. मात्र सरकारने ऐन हंगामाच्या काळात नोटाबंदीचा वज्राघात शेतकऱ्यांवर केला. क्रिकेटच्या स्कोअरप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मात्र कुणाला देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांना आधार देणारे कायदेही शेतकरीविरोधी आणि इतरांनाच फायदा देणारे आहेत. शेतकऱ्यांना ७० हजार कोटींची कर्जमाफी केल्यावर गहजब करणाऱ्या उद्योगपतींना २४ लाख कोटींचे कर्ज माफ झाल्यावर ब्रही काढत नाही. सरकार कोणाचेही असो शेतकरीहिताचा विचार कुणी करीत नाही. या पार्श्वभूमीवर उपाययोजना झाल्या नाही तर प्रचंड संकटात सापडलेले शेतकरी पुन्हा आत्महत्या करतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.