शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

राज्यघटनेच्या उद्देशांची पूर्तता करण्याची हिंमतच राज्यकर्त्यांत नाही

By admin | Updated: January 19, 2015 00:50 IST

भारतीय राज्यघटना केवळ कायद्याचा दस्तऐवज नाही. राजकीय व्यवस्था कशी असावी हे सांगणारा ग्रंथ नाही तर त्या व्यवस्थेने कसे काम करावे आणि त्यातून नागरिकांचा विकास

व्याख्यानमाला : सुरेश माने यांचे रोखठोक मत नागपूर : भारतीय राज्यघटना केवळ कायद्याचा दस्तऐवज नाही. राजकीय व्यवस्था कशी असावी हे सांगणारा ग्रंथ नाही तर त्या व्यवस्थेने कसे काम करावे आणि त्यातून नागरिकांचा विकास कसा साधता येईल, याची मांडणीसुद्धा करण्यात आलेली आहे. देशाच्या विकासाचा कालबद्ध कार्यक्रम देणारी भारतीय राज्यघटना ही जगात एकमेव आहे. त्यामुळे देशातील एकूणच सर्व घटकांच्या विकासाचे सूत्र राज्यघटनेमध्ये मांडण्यात आले आहे. राज्यघटनेची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास नवनिर्मितीचा उद्देश साधता येईल, असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता. परंतु मागील ६० वर्षात राज्यकर्त्यांचा उद्देश मात्र आपला ‘स्टेटस’ सांभाळण्याचाच राहिला आहे. त्यामुळेच संविधानाची काटेकोर अंमलबजावणी होऊ शकली नाही, नव्हे तर राज्यघटनेच्या उद्देशाची पूर्तता करण्याची हिंमतच राज्यकर्त्यांमध्ये नाही, असे रोखठोक मत मुंबई विद्यापीठातील विधी विभागाचे माजी विभागप्रमुख, संविधानाचे गाढे अभ्यासक आणि बसपाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. सुरेश माने यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे दीक्षांत सभागृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ‘भारतीय संविधानासंबंधात डॉ. आंबेडकरांचा दृष्टिकोन : वर्तमान परिस्थिती आणि प्रश्न’ याविषायवर डॉ. माने यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर होते. कुलसचिव डॉ. अशोक गोमासे प्रमुख अतिथी होते. डॉ. माने म्हणाले, राज्यघटनेबाबत अनेक समज गैरसमज पसरविले जातात. परंतु त्याचा खोलवर विचार केला जात नाही. राज्यघटना ही सर्वोत्तमच आहे. ती राबवणारे अपयशी ठरले आहे. याचे उदाहरण देतांना त्यांनी सांगितले की, १४ वर्षाखालील सर्व समाजातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी कलम २५ नुसार राज्यघटनेने १० वर्षाचा नियोजनबद्ध कार्यक्रम दिला होता. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामाजिक व आर्थिक न्याय निर्माण करणे हा राज्यघटनेचा उद्देश होता. परंतु विकासाच्या नावावर मूठभर लोकांच्या हातात देशातील अर्थव्यवस्था एकवटली आहे. हे देशासाठी घातक आहे. राज्यघटनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आपण अपयशी ठरल्यानेच देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी आदींसह अनेक समस्या भेडसावत आहेत. तेव्हा नवनिर्मितीसाठी भविष्यात जे काही शक्य आहे, ते स्वीकारण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने दिले आहे, परंतु त्याची अंमलबजावणी करीत असताना राज्यकर्त्यांनी आपली ‘लक्ष्मणरेषा’ मात्र ओलांडू नये, असे आवाहनही डॉ. माने यांनी यावेळी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. चांदेकर यांनी भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वोत्तम असून त्याचा गाभा हा नेहमी कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला. डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी संचालन व प्रास्ताविक केले. सहायक कुलसचिव अशोक साळवे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)अमेरिकेमध्ये राज्यघटनेचे कन्व्हेन्शन सेंटर अमेरिकेतील राज्यघटना फिलाडेल्फिया येथे तयार झाली होती. त्यामुळे त्या ठिकाणी राज्यघटनेचे कन्व्हेन्शन सेंटर आहे. राज्यघटना कशी तयार झाली याचे लाईव्ह प्रेझेंटेशन तेथे नवीन पिढीला दिले जाते. त्यामुळे त्यांच्या राज्यघटनेबाबत आजच्या पिढीलाही माहिती असून त्याबद्दल आदर आहे. आपल्याकडे मात्र असा कुठलाही प्रकार नसल्याची खंत व्यक्त करीत राज्यघटना तयार कशी झाली याबाबतची माहिती तरुण पिढीला व्हावी, असा प्रयत्न करण्याबाबतची अपेक्षा डॉ. माने यांनी व्यक्त केली.