शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू न केल्यास मुलांच्या सवयी घालविणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:10 IST

नागपूर : कोरोनामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. विशेषत: ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना लॅपटॉप, मोबाइलची सवय लागली आहे. मोबाइलसारख्या गॅझेटच्या वापरासह ...

नागपूर : कोरोनामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. विशेषत: ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना लॅपटॉप, मोबाइलची सवय लागली आहे. मोबाइलसारख्या गॅझेटच्या वापरासह मुलांचा ‘स्क्रीनटाइम’ खूप वाढलाय. याचे मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे. यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी फिजिकल शाळा सुरू होणे आवश्यक आहे, असा सूर बालरोग तज्ज्ञाचा होता.

‘अ‍कॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स’ नागपूर शाखेचा रविवारी पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी आयोजित परिषदेत बहुसंख्य बालरोग तज्ज्ञांनी मुलांची शाळा सुरू होण्यावर भर दिला. यावेळी प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.विजय धोटे यांनी अध्यक्षपदाची, तर डॉ.पंकज अग्रवाल यांनी सचिवपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन अ‍कॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सचे पुढील वर्षी होणारे अध्यक्ष डॉ.रमेश कुमार आर., उपाध्यक्ष डॉ.जयंत उपाध्याय, डॉ.जयंत कुलकर्णी उपस्थित होते. सोहळ्याला डॉ.शुभदा खिरवाडकर, डॉ.मुस्तफा अली, डॉ.संजय पाखमोडे, डॉ.संजय देशमुख, डॉ.योगेश पापडे, डॉ.अविनाश गावंडे यांच्यासह कार्यकारणीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

- प्रतिबंधक लसीसाठी १० महिन्यांचा कालावधी

सध्या हेल्थ वर्कर व फ्रंट लाइन वर्करला कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. सामान्य नागरिक अद्यापही लसीकरणापासून दूर आहेत. लहान मुलांच्या लसीकरणाच्या मानवी चाचणीला आता कुठे सुरुवात झाली आहे. यामुळे लस येण्यास साधारण १० महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे.

-शालेय वयोगटातील ८० टक्के मुलांची लठ्ठपणाकडे वाटचाल

बंद झालेले मैदानी खेळ, एकाच ठिकाणी बसून राहण्याची लागलेली सवय, जंक फूडचे वाढलेले प्रमाण, यामुळे शालेय वयोगटातील जवळपास ८० टक्के मुलांची लठ्ठपणाकडे वाटचाल सुरू असल्याचे बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सामान्य वजनापेक्षा ८ किलोपर्यंत वजन वाढलेल्या मुलांची संख्या अधिक आहे. याला आवर घालणे पुढे कठीण जाणार असल्याचा धोकाही तज्ज्ञांनी वर्तविला.

-मुलांमध्ये मानसिक आजार बळावले

कोरोना काळात मुले घरीच होती. अजूनही काही मुले घरातच आहेत. सततचे टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाइलचा मनावर परिणाम होत आहे. मित्रांसोबत खेळणे, शाळेत जाणे बंद झाल्याने ताण वाढला आहे. २४ तास मुले घरीच राहत असल्याने, त्यांच्यावर अनेक बंधने आली आहेत, यातून मानसिक ताण वाढल्याचे बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.