शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू न केल्यास मुलांच्या सवयी घालविणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:10 IST

नागपूर : कोरोनामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. विशेषत: ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना लॅपटॉप, मोबाइलची सवय लागली आहे. मोबाइलसारख्या गॅझेटच्या वापरासह ...

नागपूर : कोरोनामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. विशेषत: ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना लॅपटॉप, मोबाइलची सवय लागली आहे. मोबाइलसारख्या गॅझेटच्या वापरासह मुलांचा ‘स्क्रीनटाइम’ खूप वाढलाय. याचे मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे. यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी फिजिकल शाळा सुरू होणे आवश्यक आहे, असा सूर बालरोग तज्ज्ञाचा होता.

‘अ‍कॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स’ नागपूर शाखेचा रविवारी पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी आयोजित परिषदेत बहुसंख्य बालरोग तज्ज्ञांनी मुलांची शाळा सुरू होण्यावर भर दिला. यावेळी प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.विजय धोटे यांनी अध्यक्षपदाची, तर डॉ.पंकज अग्रवाल यांनी सचिवपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन अ‍कॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सचे पुढील वर्षी होणारे अध्यक्ष डॉ.रमेश कुमार आर., उपाध्यक्ष डॉ.जयंत उपाध्याय, डॉ.जयंत कुलकर्णी उपस्थित होते. सोहळ्याला डॉ.शुभदा खिरवाडकर, डॉ.मुस्तफा अली, डॉ.संजय पाखमोडे, डॉ.संजय देशमुख, डॉ.योगेश पापडे, डॉ.अविनाश गावंडे यांच्यासह कार्यकारणीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

- प्रतिबंधक लसीसाठी १० महिन्यांचा कालावधी

सध्या हेल्थ वर्कर व फ्रंट लाइन वर्करला कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. सामान्य नागरिक अद्यापही लसीकरणापासून दूर आहेत. लहान मुलांच्या लसीकरणाच्या मानवी चाचणीला आता कुठे सुरुवात झाली आहे. यामुळे लस येण्यास साधारण १० महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे.

-शालेय वयोगटातील ८० टक्के मुलांची लठ्ठपणाकडे वाटचाल

बंद झालेले मैदानी खेळ, एकाच ठिकाणी बसून राहण्याची लागलेली सवय, जंक फूडचे वाढलेले प्रमाण, यामुळे शालेय वयोगटातील जवळपास ८० टक्के मुलांची लठ्ठपणाकडे वाटचाल सुरू असल्याचे बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सामान्य वजनापेक्षा ८ किलोपर्यंत वजन वाढलेल्या मुलांची संख्या अधिक आहे. याला आवर घालणे पुढे कठीण जाणार असल्याचा धोकाही तज्ज्ञांनी वर्तविला.

-मुलांमध्ये मानसिक आजार बळावले

कोरोना काळात मुले घरीच होती. अजूनही काही मुले घरातच आहेत. सततचे टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाइलचा मनावर परिणाम होत आहे. मित्रांसोबत खेळणे, शाळेत जाणे बंद झाल्याने ताण वाढला आहे. २४ तास मुले घरीच राहत असल्याने, त्यांच्यावर अनेक बंधने आली आहेत, यातून मानसिक ताण वाढल्याचे बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.