शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

मास्कसाेबत घरात वायुविजन चांगले ठेवणेही महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:08 IST

मेहा शर्मा नागपूर : अनेक प्रयत्न करूनही काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने सामाजिक प्रसार थांबवायचा कसा, हा प्रश्न सरकार ...

मेहा शर्मा

नागपूर : अनेक प्रयत्न करूनही काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने सामाजिक प्रसार थांबवायचा कसा, हा प्रश्न सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेलाही पडला आहे. सरकारने नुकतेच घरामध्ये वावरतानाही मास्कचा वापर करावा, अशा सूचना केल्या आहेत. याबाबत लाेकमतने तज्ज्ञ डाॅक्टरांशी संवाद साधला. मास्क आवश्यक आहेच पण घरात हवा चांगली खेळती राहावी (व्हेंटिलेशन) हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

कान, नाक, घसा तज्ज्ञ डाॅ. नितीन देवस्थळे यांच्या मते सामाजिक प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कुटुंबातील एखादा सदस्य बाहेर जाणारा असेल आणि त्याच्यात लक्षणे आढळत नसली तरी घरातील इतरांना संक्रमित करण्यास कारणीभूत ठरू शकताे. त्यामुळे ही आजारापूर्वीचा उपाय आहे. दुसऱ्या लाटेतील ९० टक्के रुग्ण असिम्टमॅटिक असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील विषाणूचा स्ट्रेन वेगळा आहे. मात्र मृत्युदर १.५ टक्के असला तरी हा हवेतूनही पसरू शकताे आणि प्रसार वेगाने हाेताे. यामुळे संक्रमित हाेण्याची शक्यता अधिक आहे. मुले हे सुपर स्प्रेडर आहेत आणि त्यांच्यात संक्रमित हाेण्याची क्षमता अधिक आहे. ते पालक व ज्येष्ठांच्या संपर्कात सहज येतात व त्यातून ज्येष्ठांना संक्रमणाचा धाेका अधिक असल्याचे मत डाॅ. देवस्थळे यांनी व्यक्त केले. त्यांच्या मते एन-९५ मास्क हा पूर्ण सुरक्षित आहे पण याेग्य मास्क ओळखणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे एका मास्कवर विसंबून न राहता दाेन मास्क वापरणे अधिक याेग्य आहे.

संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डाॅ. नितीन शिंदे यांच्या मते घरामध्ये नियमित मास्क वापरणे व्यवहार्य ठरणारे नाही. मात्र द्वितीय स्तराचा संसर्ग राेखणे महत्त्वाचे आहे. एक सदस्य पाॅझिटिव्ह असेल तर घरातील इतर चार सदस्यांनीही मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र कुटुंबात संसर्ग राेखण्यासाठी घरातील हवा खेळती ठेवणे, हा सर्वाेत्तम पर्याय आहे. डाॅ. शिंदे यांनी हवेची गुणवत्ता राखण्यावर भर दिला आहे. आपण टाईल्स आणि वस्तूंची साफसफाई करताना हवेच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करताे. अनेकदा सॅनिटायझेशनही आवश्यक नाही तर केवळ हवेची गुणवत्ता राखणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. स्वत: फिट राहिले तर विषाणूला दूर ठेवता येते. तुम्ही काेणता मास्क वापरता हे मॅटर करीत नाही. तुम्ही एन-९५ मास्क घेतला पण ताे गुणवत्तापूर्ण नसेल तर सुरक्षित राहण्याचा तुमचा उद्देश सफल हाेणार नाही. पूर्णपणे पॅक असलेला मास्क घेणे आणि बाहेर जाताना त्याचा नेहमी वापर करणे आवश्यक आहे. बाहेर तासाभरासाठी जरी मास्क काढला तरी तुमची सुरक्षिता धाेक्यात आली म्हणून समजा.

- आकडेवारीनुसार बाेलणाऱ्या दाेन्ही व्यक्तींनी मास्क घातला तर संसर्ग हाेण्याचे प्रमाण १.५ टक्के म्हणजे अत्यल्प असते. संक्रमित व्यक्तीने घातला व सुदृढ व्यक्तीने वापरला नाही तर संसर्गाची शक्यता ५ टक्के असते. सुदृढ व्यक्तीने वापरला आणि संक्रमित रुग्णाने वापरला नसेल तर संसर्गाचा धाेका ३० टक्के असताे. मात्र संक्रमित व सुदृढ अशा दाेघांनीही मास्क वापरला नाही तर धाेका ९० टक्क्यांनी वाढताे.

- यूएस सेंटर फाॅर डिसीज कन्ट्राेल ॲण्ड प्राेटेक्शन (सीडीसी) कडूनही अशाच प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत. सीडीसीच्या मते जरी तुम्ही ६ फुटांचे अंतर राखून असले तरी मास्क वापरणे अनिवार्य आहे. विशेषत: जर घरी तुमच्या आसपास घराबाहेरील व्यक्ती असेल तर मास्क वापरणे नितांत गरजेचे आहे.