शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच्या मुद्यावर भूतकाळात चूकच झाली

By admin | Updated: October 26, 2015 02:52 IST

काश्मीरच्या मुद्यावर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजही तणावाचे संबंध आहेत. सुरुवातीच्या काळातच या मुद्यावर भारताने मोठी चूक केली व त्याचे परिणाम आजदेखील भोगावे लागत आहेत.

सुमित्रा महाजन : आता कणखर भूमिका घेण्याची गरजनागपूर : काश्मीरच्या मुद्यावर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजही तणावाचे संबंध आहेत. सुरुवातीच्या काळातच या मुद्यावर भारताने मोठी चूक केली व त्याचे परिणाम आजदेखील भोगावे लागत आहेत. काश्मीरचे हे घोंगडे आणखी किती दिवस भिजत राहणार आहे असा प्रश्न उपस्थित करत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. १९६५ च्या युद्धातील माजी सैनिकांच्या सत्कार समारंभादरम्यान त्या बोलत होत्या. लोकसभाध्यक्षांनी अशाप्रकारे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.रविवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व आ. मितेश भांगडिया प्रामुख्याने उपस्थित होते. भारताने कधीही पाकिस्तानवर युद्ध लादले नाही. परंतु पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. १९६५ च्या युद्धात पाकिस्तानचे काय हाल झाले हे सर्व जगाने पाहिले. परंतु जर काश्मीरच्या मुद्यावर वेळीच तोडगा काढण्यात आला असता तर आज त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले नसते. आज त्या जखमेचा नासूर झाला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आम्ही वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर आपला शेजारी अजूनही काश्मीरचा राग आळवतोय. आता मात्र या मुद्यावर कणखर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. हे भिजत पडलेले घोंगडे वाळविण्यासाठी नेत्यांना प्रवृत्त करण्याची वेळ आली आहे आणि आताचे नेते जर असे करत असतील तर जनतेने त्यांना समर्थन करावे, असे त्या म्हणाल्या. देशाला योग्य नेतृत्व असले की त्याचे समर्थन करण्याची आवश्यकता असते. लालबहादूर शास्त्री यांच्यामागे पूर्ण देश उभा होता. त्यामुळे योग्य निर्णय घेणाऱ्यांच्या नेहमी पाठीशी उभे रहावे असे प्रतिपादन केले. (प्रतिनिधी)काश्मीरमुळे होते सैनिकांचे स्मरणकेवळ युद्धकाळात सैनिकांची आठवण होते व इतर वेळी ते विस्मृतीत जातात असे बोलले जाते. पण, भारतात हे चित्र जरासे वेगळे असून बर्फाखाली धगधगणाऱ्या काश्मीरमुळे आपण सातत्याने सैनिकांचे स्मरण करतो. देशातील सैनिक सीमेवर एकटा लढत असला तरी त्याच्या पाठीमागे संपूर्ण देश असतो. नवीन पिढीमध्ये राष्ट्रभक्तीचे संस्कार पेरले पाहिजेत, असेही सुमित्रा महाजन म्हणाल्या.