शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
2
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
5
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
6
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
7
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
8
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
9
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
10
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
11
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
12
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
13
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
14
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
15
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
16
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
17
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
18
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
19
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
20
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल

काश्मीरच्या मुद्यावर भूतकाळात चूकच झाली

By admin | Updated: October 26, 2015 02:52 IST

काश्मीरच्या मुद्यावर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजही तणावाचे संबंध आहेत. सुरुवातीच्या काळातच या मुद्यावर भारताने मोठी चूक केली व त्याचे परिणाम आजदेखील भोगावे लागत आहेत.

सुमित्रा महाजन : आता कणखर भूमिका घेण्याची गरजनागपूर : काश्मीरच्या मुद्यावर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजही तणावाचे संबंध आहेत. सुरुवातीच्या काळातच या मुद्यावर भारताने मोठी चूक केली व त्याचे परिणाम आजदेखील भोगावे लागत आहेत. काश्मीरचे हे घोंगडे आणखी किती दिवस भिजत राहणार आहे असा प्रश्न उपस्थित करत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. १९६५ च्या युद्धातील माजी सैनिकांच्या सत्कार समारंभादरम्यान त्या बोलत होत्या. लोकसभाध्यक्षांनी अशाप्रकारे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.रविवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व आ. मितेश भांगडिया प्रामुख्याने उपस्थित होते. भारताने कधीही पाकिस्तानवर युद्ध लादले नाही. परंतु पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. १९६५ च्या युद्धात पाकिस्तानचे काय हाल झाले हे सर्व जगाने पाहिले. परंतु जर काश्मीरच्या मुद्यावर वेळीच तोडगा काढण्यात आला असता तर आज त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले नसते. आज त्या जखमेचा नासूर झाला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आम्ही वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर आपला शेजारी अजूनही काश्मीरचा राग आळवतोय. आता मात्र या मुद्यावर कणखर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. हे भिजत पडलेले घोंगडे वाळविण्यासाठी नेत्यांना प्रवृत्त करण्याची वेळ आली आहे आणि आताचे नेते जर असे करत असतील तर जनतेने त्यांना समर्थन करावे, असे त्या म्हणाल्या. देशाला योग्य नेतृत्व असले की त्याचे समर्थन करण्याची आवश्यकता असते. लालबहादूर शास्त्री यांच्यामागे पूर्ण देश उभा होता. त्यामुळे योग्य निर्णय घेणाऱ्यांच्या नेहमी पाठीशी उभे रहावे असे प्रतिपादन केले. (प्रतिनिधी)काश्मीरमुळे होते सैनिकांचे स्मरणकेवळ युद्धकाळात सैनिकांची आठवण होते व इतर वेळी ते विस्मृतीत जातात असे बोलले जाते. पण, भारतात हे चित्र जरासे वेगळे असून बर्फाखाली धगधगणाऱ्या काश्मीरमुळे आपण सातत्याने सैनिकांचे स्मरण करतो. देशातील सैनिक सीमेवर एकटा लढत असला तरी त्याच्या पाठीमागे संपूर्ण देश असतो. नवीन पिढीमध्ये राष्ट्रभक्तीचे संस्कार पेरले पाहिजेत, असेही सुमित्रा महाजन म्हणाल्या.