शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

काश्मीरच्या मुद्यावर भूतकाळात चूकच झाली

By admin | Updated: October 26, 2015 02:52 IST

काश्मीरच्या मुद्यावर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजही तणावाचे संबंध आहेत. सुरुवातीच्या काळातच या मुद्यावर भारताने मोठी चूक केली व त्याचे परिणाम आजदेखील भोगावे लागत आहेत.

सुमित्रा महाजन : आता कणखर भूमिका घेण्याची गरजनागपूर : काश्मीरच्या मुद्यावर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजही तणावाचे संबंध आहेत. सुरुवातीच्या काळातच या मुद्यावर भारताने मोठी चूक केली व त्याचे परिणाम आजदेखील भोगावे लागत आहेत. काश्मीरचे हे घोंगडे आणखी किती दिवस भिजत राहणार आहे असा प्रश्न उपस्थित करत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. १९६५ च्या युद्धातील माजी सैनिकांच्या सत्कार समारंभादरम्यान त्या बोलत होत्या. लोकसभाध्यक्षांनी अशाप्रकारे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.रविवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व आ. मितेश भांगडिया प्रामुख्याने उपस्थित होते. भारताने कधीही पाकिस्तानवर युद्ध लादले नाही. परंतु पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. १९६५ च्या युद्धात पाकिस्तानचे काय हाल झाले हे सर्व जगाने पाहिले. परंतु जर काश्मीरच्या मुद्यावर वेळीच तोडगा काढण्यात आला असता तर आज त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले नसते. आज त्या जखमेचा नासूर झाला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आम्ही वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर आपला शेजारी अजूनही काश्मीरचा राग आळवतोय. आता मात्र या मुद्यावर कणखर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. हे भिजत पडलेले घोंगडे वाळविण्यासाठी नेत्यांना प्रवृत्त करण्याची वेळ आली आहे आणि आताचे नेते जर असे करत असतील तर जनतेने त्यांना समर्थन करावे, असे त्या म्हणाल्या. देशाला योग्य नेतृत्व असले की त्याचे समर्थन करण्याची आवश्यकता असते. लालबहादूर शास्त्री यांच्यामागे पूर्ण देश उभा होता. त्यामुळे योग्य निर्णय घेणाऱ्यांच्या नेहमी पाठीशी उभे रहावे असे प्रतिपादन केले. (प्रतिनिधी)काश्मीरमुळे होते सैनिकांचे स्मरणकेवळ युद्धकाळात सैनिकांची आठवण होते व इतर वेळी ते विस्मृतीत जातात असे बोलले जाते. पण, भारतात हे चित्र जरासे वेगळे असून बर्फाखाली धगधगणाऱ्या काश्मीरमुळे आपण सातत्याने सैनिकांचे स्मरण करतो. देशातील सैनिक सीमेवर एकटा लढत असला तरी त्याच्या पाठीमागे संपूर्ण देश असतो. नवीन पिढीमध्ये राष्ट्रभक्तीचे संस्कार पेरले पाहिजेत, असेही सुमित्रा महाजन म्हणाल्या.