शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे विभागाची निवासस्थाने जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:08 IST

बाबा टेकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांचे वास्तव्य असलेल्या निवासस्थानाची इमारत सध्या अखेरच्या घटका माेजत आहे. ...

बाबा टेकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांचे वास्तव्य असलेल्या निवासस्थानाची इमारत सध्या अखेरच्या घटका माेजत आहे. सुमारे ४० वर्षे जुन्या इमारतीत बहुतांश कर्मचारी आजही वास्तव्यास आहेत. परंतु ही निवासस्थाने जीर्ण झाल्याने याठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे कुणाचेच लक्ष जाऊ नये, यावर आश्चर्य व्यक्त हाेत आहे.

सन १९८० मध्ये सावनेर येथे पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. या कार्यालयाच्या इमारतीमागील भागात शासनाने कर्मचाऱ्यांच्या निवास्थानाची व्यवस्था केली. येथील १७ क्वाॅर्टरमध्ये कर्मचारी कुटुंबासह राहतात. परंतु निवासस्थान इमारतीची खस्ता अवस्था झाल्याने काहींनी क्वाॅर्टर साेडून भाड्याच्या घरात राहणे पसंत केले. तर घरभाडे परवडत नसल्याने काही कर्मचारी मात्र नाईलाजाने जीर्ण क्वाॅर्टरमध्ये जीव मुठीत घेऊन राहत आहेत. औद्याेगिक वसाहत, वेकाेलि तसेच इतर माेठ्या कंपन्या असल्याने सावनेर शहरात घरभाडे अधिक आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना निवासासाठी अधिक भुर्दंड पडताे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे नवीन क्वाॅर्टर उपलब्ध करून देण्याबाबत अनेकदा मागणी केली. परंतु याबाबत अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने जीर्ण इमारतीच्या वरच्या माळ्यावर कर्मचारी राहत आहेत. या निवासस्थानाच्या भिंतींना भेगा गेल्या असून, इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे येथे एखाद्या वेळी अपघाताचा धाेका निर्माण होऊ शकतो.

....

एक काेटीची थकबाकी

पाटबंधारे विभागाचा खर्च हा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील वसुलीवर अवलंबून असल्याचे सांगण्यात आले. वसुली हाेत नसल्याने अडचण हाेते. या उपविभागांतर्गत १० ते १५ वर्षांपासून जवळपास एक काेटी रुपयाची पाणीपट्टीची थकबाकी आहे.

....

वरिष्ठांकडे पत्रव्यवहार

कर्मचाऱ्यांच्या क्वाॅर्टरच्या दैनावस्थेबाबत सावनेर पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता नरेंद्र निमजे यांच्याकडे विचारणा केली असता, निवासस्थानाच्या समस्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु सहा महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही याकडे अद्यापही कानाडाेळाच केला जात आहे. ही बाब वरिष्ठांच्या अखत्यारित आहे. पाणीपट्टीची वसुली हाेत नसल्याने विभाग खर्च करीत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.